शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

ऊसदराची कोंडी फोडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:04 IST

महाराष्ट्रातील कृषिपूरक उद्योगांपैकी साखर उद्योग हा एक प्रमुख आहे. त्याची उलाढाल सुमारे ६० हजार कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगातून साखरेचे उत्पादन वाढले असल्याने भाव पडले आहेत. परिणामी, साखर उद्योगच अडचणीत आला आहे.

महाराष्ट्रातील कृषिपूरक उद्योगांपैकी साखर उद्योग हा एक प्रमुख आहे. त्याची उलाढाल सुमारे ६० हजार कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगातून साखरेचे उत्पादन वाढले असल्याने भाव पडले आहेत. परिणामी, साखर उद्योगच अडचणीत आला आहे. शेतकऱ्याच्या मालाची निर्धारित किंमत निश्चित करायची मागणी असल्याने, उसासाठी वाजवी व किफायतशीर भाव केंद्र सरकारने ठरवून दिला आहे. महाराष्ट्रात तो वेगवेगळ्या विभागात साखर उत्पन्नाच्या उताºयावर निश्चित होतो. शेतकºयांना उसाचा मोबदला म्हणून द्यायचा भाव निश्चित झाला. मात्र, साखरेचे भाव सातत्याने पडत असल्याने, वाजवी व किफायतशीर भाव देण्याचे बंधन साखर कारखान्यांना पाळणे अशक्य होऊ लागले आहे. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या, त्यामध्ये प्रथमच साखरेचा भावही निश्चित केला. प्रतिक्विंटल २,९०० रुपयांपेक्षा कमी भावाने साखर खरेदी-विक्री करायची नाही, असे बंधन घालण्यात आले. साखरेच्या बाजारातील पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बफरस्टॉकसुद्धा करण्यात आला. निर्यात वाढवून साखर बाहेर जाईल आणि भाव वाढतील, म्हणून अनुदान योजनाही जाहीर केली. इथेनॉलचे दरही वाढवून दिले. मात्र, साखरेचे भाव बांधून देताना कच खाल्ली. तो केवळ २,९०० रुपये प्रतिक्विंटलच ठरविला गेला. या दराने साखर विकली, तर उसाचा जो वाजवी आणि किफायतशीर भाव ठरवून दिला आहे, तो देणे साखर कारखान्यांना शक्य नाही. चालू हंगामात १० टक्के उतारा असणाºया उसाला किमान आधारभूत भाव २,९५० रुपये प्रतिटन निश्चित केला आहे. तोदेखील एकरकमी देण्याचे बंधन आहे. महाराष्ट्रात सरासरी हा उतारा असतो. पुणे आणि कोल्हापूर विभागात १२ ते १३ टक्के असतो. या विभागातील भाव हा प्रतिटन ३,२१७ रुपयांपर्यंत जातो. सध्याचा साखरेचा बाजारभाव पाहता ते शक्य नाही. सरकारने जो वाजवी आणि किफायतशीर भाव निश्चित केला आहे आणि कायद्याने एकरकमी देण्याचे बंधन आहे तेवढे द्या, अशी माफक मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. कारण गतवर्षी ऊस गळीत हंगाम सुरू झाला, तेव्हा साखरेचा भाव प्रतिक्विंटल ३,५०० रुपये होता. त्यामुळे उसाला ठरविलेला भाव देणे शक्य झाले. मात्र, हंगाम सुरू झाल्यावर दोनच महिन्यांत साखरेचे भाव पडत गेले. ते प्रतिक्विंटल सुमारे हजार रुपयाने पडले. अनेक साखर कारखान्यांनी एकरकमी पहिला हप्ता दिला नाही. अजूनही गतवर्षीच्या हंगामातील राज्यात सुमारे १६५ कोटी रुपये शेतकºयांना द्यायचे आहेत. त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. कायद्याने जे बंधनकारक आहे, तेवढे तरी द्या, ही मागणीही मान्य करायला साखर कारखानदार तयार नाहीत. कारण बाजारपेठ नियंत्रणाखाली नाही. यासाठीच प्रतिक्विंटल २,९०० रुपयांऐवजी ३,५०० रुपये भाव निश्चित करा, ही कारखानदारांची मागणी रास्त आहे. साखर उद्योग हा शेतमालाला किमान आधारभूत भाव देतो, शेतमजुरांना हंगामी काम देतो, सरकारच्या तिजोरीत भर टाकतो, त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगमालेतील सर्वांत यशस्वी अशी साखर उद्योगाची ख्याती आहे. शेतकरी संघटनांच्या राजकारणाकडे न पाहता, हा उद्योग टिकला पाहिजे. शेतकºयांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळावा, यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालून ऊसदराची कोंडी फोडायला हवी. महाराष्ट्रात जवळपास शंभर साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून हंगामाची तयारी केली आहे. आपले घरदार आणि गाव सोडून रानावनात झोपड्या बांधून तोडणी मजूर आले आहेत. त्याच्या हाताला काम नाही. या वर्षी मान्सून कमी झाला आहे.परतीचा पाऊसही बरसलाच नाही. परिणामी, महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. अशा परिस्थितीत शेतातील उभा ऊस लवकर गाळून पाण्याची बचत करता येऊ शकेल. यासाठी तातडीने हंगाम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. उत्तर प्रदेशने यावर तोडगा म्हणून सहा हजार कोटींचे पॅकेज दिले. त्यानुसार, फडणवीस सरकारनेही धाडसी निर्णय घ्यायला हवा.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेती