शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुरे झाले सोहळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:08 IST

समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता

मिलिंद कुलकर्णीखान्देशात विज्ञानाचा जागर सध्या सुरु आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने प्रारंभी शहादा, शिरपूर, जळगाव आणि फैजपूर या चार ठिकाणी आविष्कार संशोधन स्पर्धा घेतली. यातील विजेत्यांना विद्यापीठात दोन दिवसीय प्रदर्शन व स्पर्धा उपक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. उच्च शिक्षणात संशोधनाला महत्त्व देण्यासाठी विद्यापीठाचा हा उपक्रम अभिनंदनीय असाच आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात संशोधनवृत्ती जोपासली जावी म्हणून तालुका आणि जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शने ठिकठिकाणी सुरु आहे. विद्यार्थी त्याठिकाणी वेगवेगळी उपकरणे, संशोधन प्रकल्प मांडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासन, उच्च व शालेय शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या माध्यमातून विज्ञान, संशोधनाविषयी जाणीवजागृती व्हावी, यासाठी हे उपक्रम होत आहेत.हे सगळे छान छान सुरु असताना दोन प्रश्न सतावतात. विज्ञानाविषयी जागृतीसाठी हे उपक्रम होत असताना समाजात विज्ञाननिष्ठा का वाढत नाही? अजूनही अंधश्रध्दांचा प्रभाव आणि पगडा का कायम आहे? अंधश्रध्दा निर्मूलनाविषयी तसेच जादूटोणाप्रतिबंधक कायदा करावा म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन संघटनेसारख्या संस्थांना का लढा द्यावा लागत आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही.परवाच आपल्याच विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि खान्देशपूत्र डॉ.एस.एफ.पाटील यांनी पुण्यात व्यक्त केलेली याचविषयाशी संबंधित खंत अंतर्मुख करणारी आणि एकंदर शिक्षणव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी आहे. फर्ग्यूसन गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात डॉ.पाटील म्हणाले की, आपल्या देशात उद्योग, विज्ञान तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षणपध्दती विकसीत झाली नाही. औद्योगिक क्षेत्र व शिक्षण क्षेत्रामध्ये संवाद नाही. आपल्याकडील संशोधनही निराशाजनक आहे. जागतिक पातळीवर आपले मानांकन खाली येत आहे. सी.व्ही.रामन यांच्यानंतर एकाही शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही.एकीकडे समाजात विज्ञाननिष्ठा वाढत नाही आणि शिक्षणक्षेत्रात संशोधनाचा दर्जा सुमार आहे, असाच निष्कर्ष तूर्त तरी काढता येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, विज्ञान प्रदर्शनापासून तर आविष्कार संशोधन स्पर्धांपर्यंत उपक्रम आम्ही शालेयपातळीपासून तर विद्यापीठांपर्यंत आयोजित करीत असतो. त्यावर शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असते. मग या उपक्रमांमधून नेमके काय हाती पडते? केवळ सोहळे साजरे करण्यासाठी आणि वार्षिक उपचार पूर्ण केल्याचे समाधान मिळविण्यासाठी तर हे उपक्रम होत नाहीत ना? त्या उपक्रमाचा दर्जा, त्यातील संशोधन प्रकल्पांमधील गुणवत्ता, त्याची उपयोगिता याविषयी मूल्यांकन होत आहे काय? त्याचा आढावा घेतला जात आहे काय? आणि हे सगळे होत असेल तर आमचा संशोधनाचा दर्जा का उंचावत नाही? समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वेगवेगळ्या विषयांवर राष्टÑीय परिषदा घेण्यासाठी मोठा निधी महाविद्यालये आणि विद्यापीठांना देण्यात येतो. या परिषदांना उपस्थित राहणे, संशोधन अहवाल सादर करणे यासाठी प्राध्यापकांना मानांकनाचे गुण देण्यात येतात. त्यावर प्राध्यापकांची वेतनवाढ निश्चित होत असते. त्यामुळे परिषदांना उपस्थिती चांगली असते, पण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या परिषदा होतात. त्यातून काय हाती लागते, याविषयी एकदा फेरआढावा घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव