शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

पुरे झाले सोहळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:08 IST

समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता

मिलिंद कुलकर्णीखान्देशात विज्ञानाचा जागर सध्या सुरु आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने प्रारंभी शहादा, शिरपूर, जळगाव आणि फैजपूर या चार ठिकाणी आविष्कार संशोधन स्पर्धा घेतली. यातील विजेत्यांना विद्यापीठात दोन दिवसीय प्रदर्शन व स्पर्धा उपक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. उच्च शिक्षणात संशोधनाला महत्त्व देण्यासाठी विद्यापीठाचा हा उपक्रम अभिनंदनीय असाच आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात संशोधनवृत्ती जोपासली जावी म्हणून तालुका आणि जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शने ठिकठिकाणी सुरु आहे. विद्यार्थी त्याठिकाणी वेगवेगळी उपकरणे, संशोधन प्रकल्प मांडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासन, उच्च व शालेय शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या माध्यमातून विज्ञान, संशोधनाविषयी जाणीवजागृती व्हावी, यासाठी हे उपक्रम होत आहेत.हे सगळे छान छान सुरु असताना दोन प्रश्न सतावतात. विज्ञानाविषयी जागृतीसाठी हे उपक्रम होत असताना समाजात विज्ञाननिष्ठा का वाढत नाही? अजूनही अंधश्रध्दांचा प्रभाव आणि पगडा का कायम आहे? अंधश्रध्दा निर्मूलनाविषयी तसेच जादूटोणाप्रतिबंधक कायदा करावा म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन संघटनेसारख्या संस्थांना का लढा द्यावा लागत आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही.परवाच आपल्याच विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि खान्देशपूत्र डॉ.एस.एफ.पाटील यांनी पुण्यात व्यक्त केलेली याचविषयाशी संबंधित खंत अंतर्मुख करणारी आणि एकंदर शिक्षणव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी आहे. फर्ग्यूसन गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात डॉ.पाटील म्हणाले की, आपल्या देशात उद्योग, विज्ञान तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षणपध्दती विकसीत झाली नाही. औद्योगिक क्षेत्र व शिक्षण क्षेत्रामध्ये संवाद नाही. आपल्याकडील संशोधनही निराशाजनक आहे. जागतिक पातळीवर आपले मानांकन खाली येत आहे. सी.व्ही.रामन यांच्यानंतर एकाही शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही.एकीकडे समाजात विज्ञाननिष्ठा वाढत नाही आणि शिक्षणक्षेत्रात संशोधनाचा दर्जा सुमार आहे, असाच निष्कर्ष तूर्त तरी काढता येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, विज्ञान प्रदर्शनापासून तर आविष्कार संशोधन स्पर्धांपर्यंत उपक्रम आम्ही शालेयपातळीपासून तर विद्यापीठांपर्यंत आयोजित करीत असतो. त्यावर शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असते. मग या उपक्रमांमधून नेमके काय हाती पडते? केवळ सोहळे साजरे करण्यासाठी आणि वार्षिक उपचार पूर्ण केल्याचे समाधान मिळविण्यासाठी तर हे उपक्रम होत नाहीत ना? त्या उपक्रमाचा दर्जा, त्यातील संशोधन प्रकल्पांमधील गुणवत्ता, त्याची उपयोगिता याविषयी मूल्यांकन होत आहे काय? त्याचा आढावा घेतला जात आहे काय? आणि हे सगळे होत असेल तर आमचा संशोधनाचा दर्जा का उंचावत नाही? समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वेगवेगळ्या विषयांवर राष्टÑीय परिषदा घेण्यासाठी मोठा निधी महाविद्यालये आणि विद्यापीठांना देण्यात येतो. या परिषदांना उपस्थित राहणे, संशोधन अहवाल सादर करणे यासाठी प्राध्यापकांना मानांकनाचे गुण देण्यात येतात. त्यावर प्राध्यापकांची वेतनवाढ निश्चित होत असते. त्यामुळे परिषदांना उपस्थिती चांगली असते, पण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या परिषदा होतात. त्यातून काय हाती लागते, याविषयी एकदा फेरआढावा घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव