शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पुरे झाले सोहळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:08 IST

समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता

मिलिंद कुलकर्णीखान्देशात विज्ञानाचा जागर सध्या सुरु आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने प्रारंभी शहादा, शिरपूर, जळगाव आणि फैजपूर या चार ठिकाणी आविष्कार संशोधन स्पर्धा घेतली. यातील विजेत्यांना विद्यापीठात दोन दिवसीय प्रदर्शन व स्पर्धा उपक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. उच्च शिक्षणात संशोधनाला महत्त्व देण्यासाठी विद्यापीठाचा हा उपक्रम अभिनंदनीय असाच आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात संशोधनवृत्ती जोपासली जावी म्हणून तालुका आणि जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शने ठिकठिकाणी सुरु आहे. विद्यार्थी त्याठिकाणी वेगवेगळी उपकरणे, संशोधन प्रकल्प मांडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासन, उच्च व शालेय शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या माध्यमातून विज्ञान, संशोधनाविषयी जाणीवजागृती व्हावी, यासाठी हे उपक्रम होत आहेत.हे सगळे छान छान सुरु असताना दोन प्रश्न सतावतात. विज्ञानाविषयी जागृतीसाठी हे उपक्रम होत असताना समाजात विज्ञाननिष्ठा का वाढत नाही? अजूनही अंधश्रध्दांचा प्रभाव आणि पगडा का कायम आहे? अंधश्रध्दा निर्मूलनाविषयी तसेच जादूटोणाप्रतिबंधक कायदा करावा म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन संघटनेसारख्या संस्थांना का लढा द्यावा लागत आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही.परवाच आपल्याच विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि खान्देशपूत्र डॉ.एस.एफ.पाटील यांनी पुण्यात व्यक्त केलेली याचविषयाशी संबंधित खंत अंतर्मुख करणारी आणि एकंदर शिक्षणव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी आहे. फर्ग्यूसन गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात डॉ.पाटील म्हणाले की, आपल्या देशात उद्योग, विज्ञान तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षणपध्दती विकसीत झाली नाही. औद्योगिक क्षेत्र व शिक्षण क्षेत्रामध्ये संवाद नाही. आपल्याकडील संशोधनही निराशाजनक आहे. जागतिक पातळीवर आपले मानांकन खाली येत आहे. सी.व्ही.रामन यांच्यानंतर एकाही शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही.एकीकडे समाजात विज्ञाननिष्ठा वाढत नाही आणि शिक्षणक्षेत्रात संशोधनाचा दर्जा सुमार आहे, असाच निष्कर्ष तूर्त तरी काढता येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, विज्ञान प्रदर्शनापासून तर आविष्कार संशोधन स्पर्धांपर्यंत उपक्रम आम्ही शालेयपातळीपासून तर विद्यापीठांपर्यंत आयोजित करीत असतो. त्यावर शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असते. मग या उपक्रमांमधून नेमके काय हाती पडते? केवळ सोहळे साजरे करण्यासाठी आणि वार्षिक उपचार पूर्ण केल्याचे समाधान मिळविण्यासाठी तर हे उपक्रम होत नाहीत ना? त्या उपक्रमाचा दर्जा, त्यातील संशोधन प्रकल्पांमधील गुणवत्ता, त्याची उपयोगिता याविषयी मूल्यांकन होत आहे काय? त्याचा आढावा घेतला जात आहे काय? आणि हे सगळे होत असेल तर आमचा संशोधनाचा दर्जा का उंचावत नाही? समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वेगवेगळ्या विषयांवर राष्टÑीय परिषदा घेण्यासाठी मोठा निधी महाविद्यालये आणि विद्यापीठांना देण्यात येतो. या परिषदांना उपस्थित राहणे, संशोधन अहवाल सादर करणे यासाठी प्राध्यापकांना मानांकनाचे गुण देण्यात येतात. त्यावर प्राध्यापकांची वेतनवाढ निश्चित होत असते. त्यामुळे परिषदांना उपस्थिती चांगली असते, पण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या परिषदा होतात. त्यातून काय हाती लागते, याविषयी एकदा फेरआढावा घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव