शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

यश सर्वव्यापी होवो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:20 IST

देशाच्या विविध भागांतून गुणवान खेळाडू पुढे येत असल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा निकोप झाल्यास, तसेच निर्णयांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय क्रिकेट संघ साता समुद्रापारदेखील सातत्यपूर्ण यशाची चव चाखू शकेल.

पुणे हे अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षीदार असलेले शहर आहे. रविवारी क्रीडा क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना येथे घडली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट सामना जिंकून मायदेशात सलग ११ मालिका विजय मिळविण्याचा दुर्लभ विश्वविक्रम भारतीय संघाने पुण्यात केला. जिथे एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तिथे सलग ११ मालिका जिंकणे खचितच अभिमानास्पद आहे. फिरकीच्या जोरावर घरच्या मैदानावर सामने जिंकणारा संघ, अशी आपली ओळख होती. ती आता मागे पडली आहे.

पुण्यात वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांचे घेतलेले प्रत्येकी १० बळी, हा त्याचा पुरावा ठरावा. खेळाडूंनी सांघिक भावनेने केलेल्या खेळाला या यशाचे श्रेय द्यायला हवे. ‘प्रत्येक खेळाडू हा वैयक्तिक स्वार्थ न बाळगता संघाला विजयी करण्याच्या भावनेने खेळतो,’ या कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्यात तथ्य जाणवते. २०१३ ते २०१९ या काळातील हे यश मिळवून देण्यासाठी योगदान असलेल्या सर्वांचे यानिमित्ताने अभिनंदन करायला हवे. मानवी स्वभाव हे न सुटलेले कोडे आहे. एखादी गोष्ट साध्य झाली, की आपले मन त्यापुढील अपेक्षा बाळगायला सुरुवात करते. या वृत्तीचा भारतीय क्रिकेटमधील आताच्या यशासोबत संदर्भ जोडायचा म्हटल्यास, अशी अपेक्षा यथोचित ठरते. मायदेशात आपण मालिका विजयांचा विश्वविक्रम केलाय. यशाची हीच पताका आता साता समुद्रापार, सर्व खंडांत फडकायला हवी. ते साध्य करण्याची धमक टीम इंडियात नक्कीच आहे. सव्वाशे-एकशेतीस कोटींच्या आपल्या देशात सर्वच जण क्रिकेटतज्ज्ञ आहेत, असे गमतीने म्हटले जाते. १९८३ च्या विश्वविजेतेपदानंतर रेडिओ, टीव्ही तसेच आक्रमक जाहिरात पद्धतीमुळे सर्वसामान्य माणसाला हा खेळ कळायला लागला... आणि नंतर आपलासाही वाटला. यामुळे विदेशात सातत्याने यश मिळविण्यासाठी काय करावे लागेल, हे सामान्य माणूसही सांगेल. ते गुपित नक्कीच नाही. विदेशांतील वातावरणाशी जुळवून घेताना थोडेफार कमी-जास्त होणारच. शेवटी कितीही प्रयत्न करतो म्हटले, तरी निसर्गासमोर मानवी क्षमतांना मर्यादा ही येतेच; पण चेंडू उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्ट्यांवर टिकाव धरण्याची तसेच याच खेळपट्ट्यांचा लाभ उचलून प्रतिस्पर्ध्यांचे २० बळी घेण्याची क्षमता, यात आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये पाहिजे तसे सातत्य नाही. आपले मुख्य अस्त्र असलेली फिरकी गोलंदाजीही विदेशांत म्हणावी तशी घातक ठरत नाही. खरी मेख आहे ती इथे. अर्थात, भविष्यात हे चित्र बदलण्याची चिन्हे नक्कीच दिसत आहेत.

१० महिन्यांनंतर कसोटी संघात परतल्यावर आफ्रिकेविरुद्ध ६ बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादव सामन्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट बोलून गेला. ‘संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. संधी मिळाली की चमकदार कामगिरी करून, आपले संघातील स्थान टिकविण्याची क्षमता अनेक गोलंदाजांमध्ये आहे. मिळालेली संधी साधली नाही तर आपली जागा घेण्यास इतर खेळाडू सज्ज आहेत, हे मला माहीत होते. त्यामुळे मी जीव ओतून गोलंदाजी केली. शिवाय, फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचा फायदा झाला,’ असा त्याच्या बोलण्याचा मथितार्थ होता. देशाच्या विविध भागांतून गुणवान खेळाडू पुढे येत असल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा अधिक निकोप झाल्यास तसेच निर्णयांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय क्रिकेट संघ साता समुद्रापारदेखील सातत्यपूर्ण यशाची चव चाखू शकेल. यासाठी क्रिकेटचे प्रशासन सांभाळणाºया संघटनेने नुसता पैसा कमावणे, हेच एकमेव ध्येय असल्याचा समज सोडून जबाबदारी स्वीकारायला हवी.

भारतीय संस्कृतीत प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या काळात संघटनेत मोठे बदल होत आहेत. देशाची एकहाती सत्ता सांभाळणाºया घटकाकडे सूत्रे जाणार असल्याने या संघटनेच्या संचलनात शिस्त तसेच सुसूत्रता येईल आणि त्याचा फायदा होऊन टीम इंडियाच्या यशाचा सूर्य सर्वव्यापी होईल, अशी अपेक्षा मंगलमय सणाच्या पार्श्वभूमीवर बाळगायला हरकत नाही.