शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

यश सर्वव्यापी होवो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:20 IST

देशाच्या विविध भागांतून गुणवान खेळाडू पुढे येत असल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा निकोप झाल्यास, तसेच निर्णयांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय क्रिकेट संघ साता समुद्रापारदेखील सातत्यपूर्ण यशाची चव चाखू शकेल.

पुणे हे अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षीदार असलेले शहर आहे. रविवारी क्रीडा क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना येथे घडली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट सामना जिंकून मायदेशात सलग ११ मालिका विजय मिळविण्याचा दुर्लभ विश्वविक्रम भारतीय संघाने पुण्यात केला. जिथे एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तिथे सलग ११ मालिका जिंकणे खचितच अभिमानास्पद आहे. फिरकीच्या जोरावर घरच्या मैदानावर सामने जिंकणारा संघ, अशी आपली ओळख होती. ती आता मागे पडली आहे.

पुण्यात वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांचे घेतलेले प्रत्येकी १० बळी, हा त्याचा पुरावा ठरावा. खेळाडूंनी सांघिक भावनेने केलेल्या खेळाला या यशाचे श्रेय द्यायला हवे. ‘प्रत्येक खेळाडू हा वैयक्तिक स्वार्थ न बाळगता संघाला विजयी करण्याच्या भावनेने खेळतो,’ या कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्यात तथ्य जाणवते. २०१३ ते २०१९ या काळातील हे यश मिळवून देण्यासाठी योगदान असलेल्या सर्वांचे यानिमित्ताने अभिनंदन करायला हवे. मानवी स्वभाव हे न सुटलेले कोडे आहे. एखादी गोष्ट साध्य झाली, की आपले मन त्यापुढील अपेक्षा बाळगायला सुरुवात करते. या वृत्तीचा भारतीय क्रिकेटमधील आताच्या यशासोबत संदर्भ जोडायचा म्हटल्यास, अशी अपेक्षा यथोचित ठरते. मायदेशात आपण मालिका विजयांचा विश्वविक्रम केलाय. यशाची हीच पताका आता साता समुद्रापार, सर्व खंडांत फडकायला हवी. ते साध्य करण्याची धमक टीम इंडियात नक्कीच आहे. सव्वाशे-एकशेतीस कोटींच्या आपल्या देशात सर्वच जण क्रिकेटतज्ज्ञ आहेत, असे गमतीने म्हटले जाते. १९८३ च्या विश्वविजेतेपदानंतर रेडिओ, टीव्ही तसेच आक्रमक जाहिरात पद्धतीमुळे सर्वसामान्य माणसाला हा खेळ कळायला लागला... आणि नंतर आपलासाही वाटला. यामुळे विदेशात सातत्याने यश मिळविण्यासाठी काय करावे लागेल, हे सामान्य माणूसही सांगेल. ते गुपित नक्कीच नाही. विदेशांतील वातावरणाशी जुळवून घेताना थोडेफार कमी-जास्त होणारच. शेवटी कितीही प्रयत्न करतो म्हटले, तरी निसर्गासमोर मानवी क्षमतांना मर्यादा ही येतेच; पण चेंडू उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्ट्यांवर टिकाव धरण्याची तसेच याच खेळपट्ट्यांचा लाभ उचलून प्रतिस्पर्ध्यांचे २० बळी घेण्याची क्षमता, यात आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये पाहिजे तसे सातत्य नाही. आपले मुख्य अस्त्र असलेली फिरकी गोलंदाजीही विदेशांत म्हणावी तशी घातक ठरत नाही. खरी मेख आहे ती इथे. अर्थात, भविष्यात हे चित्र बदलण्याची चिन्हे नक्कीच दिसत आहेत.

१० महिन्यांनंतर कसोटी संघात परतल्यावर आफ्रिकेविरुद्ध ६ बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादव सामन्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट बोलून गेला. ‘संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. संधी मिळाली की चमकदार कामगिरी करून, आपले संघातील स्थान टिकविण्याची क्षमता अनेक गोलंदाजांमध्ये आहे. मिळालेली संधी साधली नाही तर आपली जागा घेण्यास इतर खेळाडू सज्ज आहेत, हे मला माहीत होते. त्यामुळे मी जीव ओतून गोलंदाजी केली. शिवाय, फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचा फायदा झाला,’ असा त्याच्या बोलण्याचा मथितार्थ होता. देशाच्या विविध भागांतून गुणवान खेळाडू पुढे येत असल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा अधिक निकोप झाल्यास तसेच निर्णयांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय क्रिकेट संघ साता समुद्रापारदेखील सातत्यपूर्ण यशाची चव चाखू शकेल. यासाठी क्रिकेटचे प्रशासन सांभाळणाºया संघटनेने नुसता पैसा कमावणे, हेच एकमेव ध्येय असल्याचा समज सोडून जबाबदारी स्वीकारायला हवी.

भारतीय संस्कृतीत प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या काळात संघटनेत मोठे बदल होत आहेत. देशाची एकहाती सत्ता सांभाळणाºया घटकाकडे सूत्रे जाणार असल्याने या संघटनेच्या संचलनात शिस्त तसेच सुसूत्रता येईल आणि त्याचा फायदा होऊन टीम इंडियाच्या यशाचा सूर्य सर्वव्यापी होईल, अशी अपेक्षा मंगलमय सणाच्या पार्श्वभूमीवर बाळगायला हरकत नाही.