शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
3
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
4
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
5
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
6
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
7
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
8
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
9
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
10
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
11
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
12
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
13
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
14
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
15
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
16
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
17
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
18
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
19
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
20
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:34 IST

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत.

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत. सध्याच्या लोकसभेत भाजपाचे ७३ खासदार उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे तीन पक्ष भाजपाविरुद्ध एकेकट्याने लढले. त्या लढतीत विरोधकांच्या झालेल्या मतविभाजनाच्या बळावर भाजपास त्यांचे एवढे उमेदवार निवडून आणणे जमले. नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षोपक्षांची स्थिती अशीच राहिली. त्या बळावर गोरखपूरचे महंत योगी आदित्यनाथ ३१४ आमदारांशी मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले. परवा झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी आणि बहुजन समाज हे दोनच पक्ष भाजपाविरूद्ध संघटित झाले आणि त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याच मतदार संघात धूळ चारली. २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांत हे दोनच पक्ष एकत्र आले आणि त्यांना आपली मते परस्परांना देता आली तर भाजपाच्या उत्तर प्रदेशातील जागा ५० ने कमी होऊन त्यांची त्या राज्यातील आजची ७३ ही खासदारसंख्या अवघी २३ वर येईल. काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत तेव्हा असेल तर ही आकडेवारी आणखीही खाली जाईल. गोरखपूर आणि फुलपूरच्या पोटनिवडणुकांचा खरा धडा हा आहे आणि त्यामुळे त्याची भाजपाने धास्ती घेतली आहे. देशातील धर्मनिरपेक्ष शक्ती नुसत्या एकत्र आल्या तरी त्या भाजपाला सत्तेवरून पायउतार करू शकतील, असे शरद पवार व अन्य नेते का म्हणतात, ते यातून कळण्याजोगे आहे. आकडेप्रमुखांनी २०१४ च्या निवडणुकीत समाजवादी व बहुजन समाज या पक्षांनी उत्तर प्रदेशातील ८० ही जागांची मते एकत्र करून ही आकडेवारी सिद्ध केली आहे. या आकडेवारीला जनमानसाचा असलेला आधार बिहारच्या अरेरका लोकसभा क्षेत्रानेही मिळवून दिला आहे. त्या राज्यात पूर्वी नितीशकुमारांचा जदयु आणि लालूप्रसादांचा राजद हे पक्ष एकत्र येऊन लढले व त्यांनी त्या राज्याच्या विधानसभेत दोन तृतीयांशाहून अधिक जागा मिळविल्या. पुढल्या काळात नितीशकुमारांनी भाजपाचा हात धरून लालूप्रसादांना लाथाडले. नुसते लाथाडलेच नाही तर ते तुरुंगात जातील, याचीही व्यवस्था केली. आता लालूप्रसाद तुुरुंगात आणि त्यांचा पक्ष एकाकी आहे. तरीही त्यांचा उमेदवार भाजपाला धूळ चारून या राज्यात विजयी झाला असेल तर भाजपाने व मोदींनी काळाची बदललेली पावले ओळखली पाहिजेत. आदित्यनाथांना मुख्यमंत्रिपदावर येऊन एकच वर्ष झाले. मोदींनी साडेतीन वर्षे पंतप्रधानपदावर काम केले. मात्र एवढ्या अल्पावधीत आदित्यनाथांची अहंता त्यांच्यातील संन्याशास पराभूत करून गेली आणि सगळा भाजपा ‘हा मोदींचा उत्तराधिकारी आहे’ असे म्हणू लागला. मोदींचा वट तर असा की ट्रम्प आणि झिपिंगपाठोपाठ आता आपणच असा त्यांचाही अविर्भाव राहिला. प्रत्येकास अभिमान जोपासण्याचा हक्क आपल्या घटनेने दिला आहे. त्यामुळे त्यांना स्वत:विषयी काय वाटावे हे कळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी जनतेने काय समजायचे ते समजण्याचा अधिकार तिलाही आहे. मोदींचे सरकार तीन वर्षांत आणि आदित्यनाथांचे सरकार एक वर्षात जनतेपासून किती दूर गेले आणि त्यांनी त्यांच्या छुप्या अजेंड्याखाली लोकांना दडपण्याचा केवढा प्रयत्न केला, त्याचे उत्तर त्याविषयी उमटलेल्या प्रतिक्रियेच्या या आकडेवारीतून मिळणारे आहे. पुढाºयांना काही गोष्टी समजल्या तरी ते त्या बराच काळ मनावर घेत नाहीत. म्हणून सांगायचे, की अजून सावरा, दीड वर्षाचा कालावधी तुमच्या हाती आहे आणि जमलेच तर संघातील तुमच्या प्रचारकांनाही ते सांगा. कारण, त्यांचे अहंकार तुमच्या अहंताहून अधिक भारी आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक