शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:34 IST

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत.

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत. सध्याच्या लोकसभेत भाजपाचे ७३ खासदार उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे तीन पक्ष भाजपाविरुद्ध एकेकट्याने लढले. त्या लढतीत विरोधकांच्या झालेल्या मतविभाजनाच्या बळावर भाजपास त्यांचे एवढे उमेदवार निवडून आणणे जमले. नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षोपक्षांची स्थिती अशीच राहिली. त्या बळावर गोरखपूरचे महंत योगी आदित्यनाथ ३१४ आमदारांशी मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले. परवा झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी आणि बहुजन समाज हे दोनच पक्ष भाजपाविरूद्ध संघटित झाले आणि त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याच मतदार संघात धूळ चारली. २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांत हे दोनच पक्ष एकत्र आले आणि त्यांना आपली मते परस्परांना देता आली तर भाजपाच्या उत्तर प्रदेशातील जागा ५० ने कमी होऊन त्यांची त्या राज्यातील आजची ७३ ही खासदारसंख्या अवघी २३ वर येईल. काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत तेव्हा असेल तर ही आकडेवारी आणखीही खाली जाईल. गोरखपूर आणि फुलपूरच्या पोटनिवडणुकांचा खरा धडा हा आहे आणि त्यामुळे त्याची भाजपाने धास्ती घेतली आहे. देशातील धर्मनिरपेक्ष शक्ती नुसत्या एकत्र आल्या तरी त्या भाजपाला सत्तेवरून पायउतार करू शकतील, असे शरद पवार व अन्य नेते का म्हणतात, ते यातून कळण्याजोगे आहे. आकडेप्रमुखांनी २०१४ च्या निवडणुकीत समाजवादी व बहुजन समाज या पक्षांनी उत्तर प्रदेशातील ८० ही जागांची मते एकत्र करून ही आकडेवारी सिद्ध केली आहे. या आकडेवारीला जनमानसाचा असलेला आधार बिहारच्या अरेरका लोकसभा क्षेत्रानेही मिळवून दिला आहे. त्या राज्यात पूर्वी नितीशकुमारांचा जदयु आणि लालूप्रसादांचा राजद हे पक्ष एकत्र येऊन लढले व त्यांनी त्या राज्याच्या विधानसभेत दोन तृतीयांशाहून अधिक जागा मिळविल्या. पुढल्या काळात नितीशकुमारांनी भाजपाचा हात धरून लालूप्रसादांना लाथाडले. नुसते लाथाडलेच नाही तर ते तुरुंगात जातील, याचीही व्यवस्था केली. आता लालूप्रसाद तुुरुंगात आणि त्यांचा पक्ष एकाकी आहे. तरीही त्यांचा उमेदवार भाजपाला धूळ चारून या राज्यात विजयी झाला असेल तर भाजपाने व मोदींनी काळाची बदललेली पावले ओळखली पाहिजेत. आदित्यनाथांना मुख्यमंत्रिपदावर येऊन एकच वर्ष झाले. मोदींनी साडेतीन वर्षे पंतप्रधानपदावर काम केले. मात्र एवढ्या अल्पावधीत आदित्यनाथांची अहंता त्यांच्यातील संन्याशास पराभूत करून गेली आणि सगळा भाजपा ‘हा मोदींचा उत्तराधिकारी आहे’ असे म्हणू लागला. मोदींचा वट तर असा की ट्रम्प आणि झिपिंगपाठोपाठ आता आपणच असा त्यांचाही अविर्भाव राहिला. प्रत्येकास अभिमान जोपासण्याचा हक्क आपल्या घटनेने दिला आहे. त्यामुळे त्यांना स्वत:विषयी काय वाटावे हे कळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी जनतेने काय समजायचे ते समजण्याचा अधिकार तिलाही आहे. मोदींचे सरकार तीन वर्षांत आणि आदित्यनाथांचे सरकार एक वर्षात जनतेपासून किती दूर गेले आणि त्यांनी त्यांच्या छुप्या अजेंड्याखाली लोकांना दडपण्याचा केवढा प्रयत्न केला, त्याचे उत्तर त्याविषयी उमटलेल्या प्रतिक्रियेच्या या आकडेवारीतून मिळणारे आहे. पुढाºयांना काही गोष्टी समजल्या तरी ते त्या बराच काळ मनावर घेत नाहीत. म्हणून सांगायचे, की अजून सावरा, दीड वर्षाचा कालावधी तुमच्या हाती आहे आणि जमलेच तर संघातील तुमच्या प्रचारकांनाही ते सांगा. कारण, त्यांचे अहंकार तुमच्या अहंताहून अधिक भारी आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक