शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Student: सावधान! विद्यार्थ्यांवर वाढते आहे डिजिटल पाळत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 05:50 IST

Digital surveillance: बहुतांश विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे डिजिटल उपकरणे वापरणं, हा त्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग झाला आहे. कोविडच्या काळात विद्यार्थी - निरीक्षण सॉफ्टवेअर अनेक शाळांनी वापरले होते. मोठ्या डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांच्या  वैयक्तिक माहितीचे संकलन आणि त्यानंतरचा वापर (अनेकदा संमतीशिवाय), माहितीचे  संरक्षण आणि गोपनीयतेला धोका निर्माण करतो.

- डॉ. दीपक शिकारपूर (उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भुतो न भविष्यति’ असा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे आणि तो वाढतच  जाणार आहे. २०२२ नंतर न्यू नॉर्मल जीवन पद्धती आपल्याला अनुभवायची आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ हे आवडो वा न आवडो, पण आता अनेकांच्या हळूहळू अंगवळणी पडलं आहे. यामुळे सतत ऑनलाईन असणे हे अनेकांचे वास्तव आहे.

बहुतांश विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे डिजिटल उपकरणे वापरणं, हा त्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग झाला आहे. कोविडच्या काळात विद्यार्थी - निरीक्षण सॉफ्टवेअर अनेक शाळांनी वापरले होते. मोठ्या डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांच्या  वैयक्तिक माहितीचे संकलन आणि त्यानंतरचा वापर (अनेकदा संमतीशिवाय), माहितीचे  संरक्षण आणि गोपनीयतेला धोका निर्माण करतो. ही माहिती कशा प्रकारे वापरली जाते, यावर काहीच बंधन नाही. चुकून जर ही माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली तर पुढील परिणामांची जबाबदारी कुणाची (शाळेची, पालकांची का विद्यार्थ्यांची) यावर विचार होणे आवश्यक आहे. 

सध्या अनेक शाळा काही सेवा देयकांचे सॉफ्टवेअर वापरत आहेत. हे सेवा देयक अनेक प्रकारची माहिती गोळा करत आहेत. (अनेकांचा हेतू स्तुत्य आहे.) शैक्षणिक दर्जा सुधार व विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अनेक पालक उत्साहाने डिजिटल शिक्षण पद्धतीत सहभागी झाले आहेत. पण भारतात, शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या नियमनाच्या अनुपस्थितीमुळे शैक्षणिक संस्था व त्यांनी नियुक्त केलेल्या सेवा देयकांच्या सेवेत संदिग्धता, अस्पष्टता आणि माहितीची विषमता निर्माण झाली आहे. गोपनीयता, माहितीची सुरक्षित हाताळणी हे मुद्दे किती शाळा, पालक जागरूकतेने पाहतात? अनेक विकसित देशांत सतत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती जाणण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले जात आहे.

भारतातही जिथे पालकांचे (वेळ नसल्याने) पाल्यावर नियंत्रण नाही तिथे शाळेची जबाबदारी वाढत आहे. आजच्या पिढीला संवादमाध्यमी तंत्रज्ञान अगदी लहानपणापासूनच हाताळण्याची संधी मिळाली आहे.  त्यामुळे तरूणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. बऱ्याचदा निव्वळ उत्सुकतेपायी त्यांच्याकडून संशयास्पद साइट्स उघडल्या जातात (ॲन्टिव्हायरसने धोक्याचा इशारा दिल्यानंतरदेखील!) परिणामी त्यांच्या वापरातील संगणकीय प्रणालींमध्ये विविध व्हायरस, मालवेअर, स्पायवेअर घुसवणे सोपे जाते. फेसबुकवरून बदनामी किंवा ऑनलाइन व्यवहारांतील फसवणूक यामध्येही त्यामुळेच अल्पवयीनांचे प्रमाण पुष्कळच आहे. विद्यार्थ्यांवरील ही डिजिटल पाळत अतिशय धोकादायक आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणStudentविद्यार्थी