शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

दगड मारण्यास कारण की....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 10:34 AM

लोकलवर दगड मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमल्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने केली. त्यानंतर लोकलवर दगडफेक होण्याच्या घटनात वाढ झाली.

विनायक पात्रुडकर

लोकलवर दगड मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमल्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने केली. त्यानंतर लोकलवर दगडफेक होण्याच्या घटनात वाढ झाली. हा योगायोग म्हणावा की रेल्वे प्रशासनाला दिलेले खुले आवाहन. अशा घटना घडण्याला रेल्वे प्रशासनदेखील  जबाबदार आहे हे नव्याने सांगायला नको. गेल्या काही वर्षांत मुंबईवर झालेले अतिक्रमणही या घटनांना पोषक ठरले आहे. रेल्वे हद्दीत एक फेरफटका मारला तरी तेथील सुरक्षारक्षक हटकतात आणि याच हद्दीच्या शेजारी अनधिकृत झोपड्या उभ्या आहेत. बहुतांश रेल्वे स्थानक, रूळांशेजारी झोपड्यांचे जाळे आहे. या अनधिकृत झोपड्यांना वीज, पाणी मिळते़ त्यामुळे अशा झोपड्यांची आकडेवारी दुप्पटीने, तिप्पटीने वाढली आहे.  याला अर्थातच राजकीय नेत्यांचे, स्थानिक गुंडांचे व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. येथे राहणारे कोण आहेत, हे शोधले तर बहुतांश परप्रांतीय आहेत. हा भेदभाव स्थानिक व परप्रांतीय असा नाही, तर गरीबी व श्रीमंती असाही केला जातो आहे. त्यात समाधान मानणे हे प्रत्येकालाच जमत नाही.

मानवी प्रवृत्तीची सतत धडपड सुरू असते काही ना काही मिळवण्याची. या स्पर्धेत नैराश्य येते. अपयशाचे खापर फोडण्यासाठी कोणी तरी हवा असतो. अशा परिस्थितीतून समाजकंटक तयार होतात व लोकलवर दगड फेकण्याच्या घटना घडतात. अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने वारंवार दिले आहेत. त्यानुसार कारवाई देखील होते़ ही कारवाई तात्पूरती असते़ काही दिवसांनी पुन्हा तेथे झोपड्या उभ्या राहतात. गेली चार दशके या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. अधिकारी कितीही शिस्तीचा असो त्याची कारवाई कधीही यशस्वी झाली नाही. एवढच काय तर घाटकोपर स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झोपड्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. त्याला पोलिसांपासून सर्वांचेच अभय आहे. असे प्रकार रेल्वे रूळाशेजारी सुरू असतील तर समाज घातक घटना कशा रोखल्या जाणार, असा प्रश्न आहे. 

प्रवासात हवा घेण्यासाठी रेल्वे प्रवासी दरवाजात उभे असतात. हवा घेण्याच्या नादात एक दगड येतो आणि गंभीर दुखापत करतो.  मात्र अशा घटना थांबायला हव्यात व ती सर्वस्वी जबाबदारी रेल्वेचीच आहे. संपूर्ण देशात मुंबईतून सर्वाधिक महसूल रेल्वेला मिळतो. तरीही मुंबईकरांना सोयी सुविधा मिळत नाहीत़ किमान प्रवाशांना प्रवासात दगड लागणार नाही, याची तरी काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवी. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण जगातील पर्यटक येथे येतात. त्यामुळे लाजेखातर तरी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवयाला हवी. कारण परदेशात अशा घटना घडत नाहीत, हे वेगळे सांगायला नको. तेव्हा प्रवाशांचे हित व सुरक्षा रेल्वेने जपायला हवी.

 

टॅग्स :localलोकलMumbaiमुंबईcentral railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे