शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

प्लॅस्टिकबंदीची तयारी राज्य सरकारने चालविली खरी पण अंमलबजावणीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:59 IST

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न डोळ्यामोर ठेवून, राज्यात गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिकबंदीची तयारी राज्य सरकारने चालविली आहे.

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न डोळ्यामोर ठेवून, राज्यात गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिकबंदीची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. त्यासाठी मंत्रालयासह सर्व सरकारी कार्यालयांत प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालून, पहिले पाऊल टाकल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली खरी, पण यात सर्वांत मोठे आव्हान आहे ते अंमलबजावणीचे. मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रातील २००५च्या महापुराला जबाबदार असलेल्या घटकांत प्लॅस्टिकचा वाटा सर्वात मोठा होता. तेव्हापासून प्लॅस्टिकवर बंदीच्या घोषणा झाल्या, पण अंमलबजावणी नाही. अगदी दूध, तेलाच्या पाउचवर कशी बंदी घालता येईल, याची चर्चा झाली, तसेच गुटखा, पानमसाल्यासह मुखवासाच्या वेगवेगळ्या सॅशेंवर बंदीचा मानस जाहीर झाला. नाले तुंबून वाहतूक खोळंबल्याचे लक्षात आल्यावर, रेल्वेने सर्व स्थानकांत प्लॅस्टिकबंदीची घोषणा केली, तेव्हा सामाजिक नेत्यांनीच फेरीवाल्यांचा, विकेत्यांचा कळवळा घेत ती हाणून पाडली. आताही उत्पादकांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे, पण ही घोषणा झाल्यापासूनच याला पर्याय काय, हा प्रश्न विचारला जात आहे. जवळपास ५६० कोटींची उलाढाल असलेली पिण्याच्या पाण्याची बाजारपेठ जशी मोठ्या प्रमाणात बाटल्यांवर अवलंबून आहे, तशीच पिशव्या, ग्लास, मोठ्या बरण्यांतूनही हे पाणी विकले जाते. फिल्टरमधील शुद्ध पाण्यावर अनेकांचा विश्वास नसतो. त्यांना अधिक जीवनसत्त्वे, खनिजे, फळांचा अर्क, अधिक प्राणवायू घातलेले पाणी प्यायला हवे असते. एकदा बाटलीबंद पाण्यावर बंदी घातली की, त्यातून अशा पाण्याला सवलत देणार का, याचे उत्तर सरकारने दिलेले नाही. यातील ९० टक्के बाटल्यांचा आम्ही पुनर्वापर करतो, असा या कंपन्यांचा दावा आहे. तो खरा मानला, तर सरकारचा बंदीचा प्रस्ताव अंमलबजावणीपूर्वीच डळमळीत होईल. भारतात प्रत्येक व्यक्ती किमान दहा किलो प्लॅस्टिक वापरते, असे समोर आले आहे. त्यात पिशव्या, ग्लास, सॅशे, प्लेट, इतर वस्तूंचा वाटा मोठा आहे, शिवाय थर्माकोल, पॅकिंगच्या वस्तू, वैद्यकीय उपचारातील साहित्य, वेगवेगळ््या उपकरणांत वापरले जाणारे प्लॅस्टिक हाही स्वतंत्र विषय आहे. त्यामुळे बंदी घालण्यापूर्वी या प्रत्येक घटकाला पर्याय उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारला पेलावे लागेल. नाहीतर अनेक पळवाटा निघतील. बंदी घालण्यापूर्वी त्या वस्तूचे उत्पादन थांबवा, अशी मागणी पर्यावरणवादी करतात, त्यात तथ्य आहे. त्यामुळे उत्पादनबंदीच्या कायदेशीर बाजूही तपासाव्या लागतील. जनजागृतीच्या जाहिराती आणि दंडाची रक्कम पाचपट केली, म्हणून हा प्रश्न सुटणारा नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी