शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

प्लॅस्टिकबंदीची तयारी राज्य सरकारने चालविली खरी पण अंमलबजावणीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:59 IST

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न डोळ्यामोर ठेवून, राज्यात गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिकबंदीची तयारी राज्य सरकारने चालविली आहे.

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न डोळ्यामोर ठेवून, राज्यात गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिकबंदीची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. त्यासाठी मंत्रालयासह सर्व सरकारी कार्यालयांत प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालून, पहिले पाऊल टाकल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली खरी, पण यात सर्वांत मोठे आव्हान आहे ते अंमलबजावणीचे. मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रातील २००५च्या महापुराला जबाबदार असलेल्या घटकांत प्लॅस्टिकचा वाटा सर्वात मोठा होता. तेव्हापासून प्लॅस्टिकवर बंदीच्या घोषणा झाल्या, पण अंमलबजावणी नाही. अगदी दूध, तेलाच्या पाउचवर कशी बंदी घालता येईल, याची चर्चा झाली, तसेच गुटखा, पानमसाल्यासह मुखवासाच्या वेगवेगळ्या सॅशेंवर बंदीचा मानस जाहीर झाला. नाले तुंबून वाहतूक खोळंबल्याचे लक्षात आल्यावर, रेल्वेने सर्व स्थानकांत प्लॅस्टिकबंदीची घोषणा केली, तेव्हा सामाजिक नेत्यांनीच फेरीवाल्यांचा, विकेत्यांचा कळवळा घेत ती हाणून पाडली. आताही उत्पादकांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे, पण ही घोषणा झाल्यापासूनच याला पर्याय काय, हा प्रश्न विचारला जात आहे. जवळपास ५६० कोटींची उलाढाल असलेली पिण्याच्या पाण्याची बाजारपेठ जशी मोठ्या प्रमाणात बाटल्यांवर अवलंबून आहे, तशीच पिशव्या, ग्लास, मोठ्या बरण्यांतूनही हे पाणी विकले जाते. फिल्टरमधील शुद्ध पाण्यावर अनेकांचा विश्वास नसतो. त्यांना अधिक जीवनसत्त्वे, खनिजे, फळांचा अर्क, अधिक प्राणवायू घातलेले पाणी प्यायला हवे असते. एकदा बाटलीबंद पाण्यावर बंदी घातली की, त्यातून अशा पाण्याला सवलत देणार का, याचे उत्तर सरकारने दिलेले नाही. यातील ९० टक्के बाटल्यांचा आम्ही पुनर्वापर करतो, असा या कंपन्यांचा दावा आहे. तो खरा मानला, तर सरकारचा बंदीचा प्रस्ताव अंमलबजावणीपूर्वीच डळमळीत होईल. भारतात प्रत्येक व्यक्ती किमान दहा किलो प्लॅस्टिक वापरते, असे समोर आले आहे. त्यात पिशव्या, ग्लास, सॅशे, प्लेट, इतर वस्तूंचा वाटा मोठा आहे, शिवाय थर्माकोल, पॅकिंगच्या वस्तू, वैद्यकीय उपचारातील साहित्य, वेगवेगळ््या उपकरणांत वापरले जाणारे प्लॅस्टिक हाही स्वतंत्र विषय आहे. त्यामुळे बंदी घालण्यापूर्वी या प्रत्येक घटकाला पर्याय उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारला पेलावे लागेल. नाहीतर अनेक पळवाटा निघतील. बंदी घालण्यापूर्वी त्या वस्तूचे उत्पादन थांबवा, अशी मागणी पर्यावरणवादी करतात, त्यात तथ्य आहे. त्यामुळे उत्पादनबंदीच्या कायदेशीर बाजूही तपासाव्या लागतील. जनजागृतीच्या जाहिराती आणि दंडाची रक्कम पाचपट केली, म्हणून हा प्रश्न सुटणारा नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी