शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अध्यायाचा प्रारंभ

By रवी टाले | Updated: December 28, 2019 12:00 IST

ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणल्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे एका नव्या युगात प्रवेश करणार आहे आणि त्याचे अनेक दृश्य परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत.

ठळक मुद्दे सध्या भारतात मालगाड्या ताशी सरासरी २५ किलोमीटर वेगाने धावतात.मालगाड्यांच्या वेगात चौपटीने होऊ घातलेली वाढ भारतीय रेल्वेचे चित्र आमुलाग्र बदलवू शकते!दोन समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांचे काम हाती घेण्याचे सुतोवाच करण्यात आले.

भारतीय रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाचे, म्हणजेच ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे सफल परीक्षण गुरुवारी पार पडले आणि एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. नव्या अध्यायाचा प्रारंभ यासाठी, की सध्या भारतात मालगाड्या ताशी सरासरी २५ किलोमीटर वेगाने धावतात. गुरुवारी पार पडलेल्या परीक्षणादरम्यान मालगाडीने चक्क ताशी शंभर किलोमीटर वेग गाठला होता. मालगाड्यांच्या वेगात चौपटीने होऊ घातलेली वाढ भारतीय रेल्वेचे चित्र आमुलाग्र बदलवू शकते!भारताने १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगिकार केला आणि त्याच सुमारास माहिती तंत्रज्ञान उद्योगानेही चांगलेच बाळसे धरले. या दोन्ही घडामोडींचा परिपाक म्हणून भारताने विकासाच्या एका नव्या पर्वात प्रवेश केला. तोपर्यंत तीन ते चार टक्क्यांच्या दरम्यान घुटमळणारा विकास दर सहा ते सात टक्क्यांच्या घरात पोहचला. सध्याच्या घडीला विकासाचा वेग बराच मंदावला असला, तरी तो तसा कायमस्वरुपी राहणार नाही आणि पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन वेगाने धावू लागेल, हे निश्चित आहे. कोणतीही अर्थव्यवस्था वेगाने वाढत असते, तेव्हा कच्च्या व पक्क्या मालाच्या वाहतुकीमध्ये वाढ होणे स्वाभाविकच असते. तशी ती भारतातही झाली. दुर्दैवाने वाढती माल वाहतूक हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे प्रारंभी लक्ष दिले गेले नव्हते. त्यामुळे एकीकडे महामार्गांची दुर्दशा झाली, तर दुसरीकडे रेल्वेमार्गांवर कोंडी वाढली.भारतात रेल्वेचे आगमन झाल्यापासून प्रवासी व मालवाहू गाड्या एकाच मार्गावरून धावतात. वाहतूक कमी होती तोपर्यंत ते चालून गेले; मात्र प्रवासी आणि माल वाहतुकीमध्ये वाढ झाल्यामुळे हल्ली रेल्वेमार्गांवर प्रचंड कोंडी होत आहे. परिणामी एकीकडे मागणी व गरज असूनही प्रवासी रेल्वेगाड्यांची संख्या वाढवता येत नाही, तर दुसरीकडे माल गंतव्य स्थळी पोहचण्यातही विलंब होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अखेर अकराव्या पंचवार्षिक योजनेत पूर्व आणि पश्चिम अशा दोन समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांचे काम हाती घेण्याचे सुतोवाच करण्यात आले.पश्चिम समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदरापासून उत्तर प्रदेशमधील दादरीपर्यंत, तर पूर्व समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग पंजाबमधील लुधियानापासून पश्चिम बंगालमधील दानकुनीपर्यंत असेल. याशिवाय २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण आणि पूर्व किनारपट्टी असे नामकरण करण्यात आलेल्या आणखी तीन समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांच्या उभारणीची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्त दक्षिण-पश्चिम असे नामाभिधान करण्यात आलेल्या आणखी एका समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाच्या उभारणीचेही नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग सुवर्ण चतुष्कोन मालवाहू रेल्वेमार्ग योजनेचा भाग असतील.गुरुवारी चाचणी घेण्यात आलेला मार्ग पश्चिम समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाचा भाग होता. एकूण १६७६ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा ३५० किलोमीटर लांबीचा टप्पा तयार झाला असून, लवकरच त्यावरून मालगाड्या धावायला प्रारंभ करतील. भारतात सध्याच्या घडीला प्रवाशी व मालगाड्या एकाच मार्गावर धावतात. त्यातही मालगाड्यांचा सरासरी वेग ताशी अवघा २५ किलोमीटर प्रती तास एवढाच आहे. परिणामी मालगाड्या प्रवासी गाड्यांच्या मार्गात अवरोध निर्माण करतात. प्रवासी गाड्यांना पुढे काढण्यासाठी मालगाड्यांना रोखून धरावे लागते. त्यामुळे माल गंतव्य स्थळी पोहचण्यात अतोनात विलंब होतो. परिणामी व्यापारी व उद्योजक नाराज होतात. शिवाय प्रवासी गाड्याही पूर्ण वेगाने चालवता येत नाहीत. या पाशर््वभूमीवर समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. एकदा का हे मार्ग पूर्ण झाले, की प्रवासी व मालवाहू या दोन्ही प्रकारच्या गाड्यांच्या सरासरी वेगात चांगलीच वाढ होईल. शिवाय मालगाड्या हटल्यामुळे विद्यमान रेल्वेमार्गांवर आणखी प्रवासी गाड्या चालविता येतील. त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल.समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांवर केवळ विजेवर चालणाऱ्या इंजिनच वापरले जातील आणि या मालगाड्या सरासरी ताशी शंभर किलोमीटरच्या वेगाने धावतील. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यात सक्षम होतील. समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांवरील मालगाड्या शंभर टक्के विजेचाच वापर करणार असल्याने डिझेल इंजिनमुळे होणारे प्रदुषण कमी होऊन, पॅरिस करारान्वये भारताने प्रदुषण कपातीचे जे लक्ष्य मान्य केले आहे ते साध्य करण्यासही मदत होईल. नव्या तंत्रज्ञानाचा विकास, सध्याच्या घडीला फार यशस्वी न ठरलेल्या रो रो सेवेचा यशस्वी विस्तार, असे अनेक अनुषंगिक लाभदेखील समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांमुळे होणार आहेत. थोडक्यात, ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणल्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे एका नव्या युगात प्रवेश करणार आहे आणि त्याचे अनेक दृश्य परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वे