शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
2
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
3
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
4
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
5
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
7
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
8
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
9
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
10
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
11
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
12
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
13
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
14
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
15
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
16
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
17
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
18
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
19
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
20
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी बीटी घालवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:46 IST

गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतकरी वा शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातही आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले आहेत. विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांची संख्या तर कितीतरी पट अधिक आहे. एका अर्थाने हे सगळे बीटी कपाशीचे बळी आहेत. कपाशीचे सर्वाधिक नुकसान करणाºया बोंडअळीला प्रतिबंध करणारे बियाणे म्हणून बीटी कपाशीची प्रचंड भलावण केल्या गेली. प्रारंभीच्या काळात बीटी बियाण्यांमुळे शेतकºयांचा कीटकनाशकांवरील खर्च कमी झालाही; पण लवकरच बीटी कपाशीवरही बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसू लागला. त्यामुळे पुन्हा एकदा कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली. यावर्षी तर प्रतिकूल पर्जन्यमान व हवामानामुळे बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. परिणामी मनाई असलेल्या व अपवादात्मक स्थितीत वापरावयाच्या अतिजहाल कीटकनाशकांची बेसुमार फवारणी झाली आणि त्याचाच परिपाक मोठ्या प्रमाणातील मृत्यूंच्या रूपाने समोर आला आहे. वास्तविक बीटी कपाशीचे भारतात आगमन झाले त्यावेळीच डॉ. वंदना शिवांसारख्या पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध केला होता; परंतु त्यांना कुणी जुमानले नाही. बीटी कपाशी बियाणे अपयशी सिद्ध झाल्याची कबुली, ते बियाणे भारतात आणणाºया बहुराष्ट्रीय कंपनीने २०१० मध्येच दिली होती. गुलाबी बोंडअळीने स्वत:मध्ये बीटी प्रतिबंधक क्षमता विकसित केल्याचे सदर कंपनीने आनुवंशिक अभियांत्रिकी मान्यता समिती म्हणजेच जीईएसीला अधिकृतरीत्या कळविले होते. बीटी बियाण्याच्या अपयशाचा दृश्य परिणाम हा आहे, की २००६ च्या तुलनेत २०१३ मध्ये कीटकनाशकांचा वापर जवळपास तिप्पट झाला होता. उपलब्ध आकडेवारीनुसार २००६ मध्ये देशात एकूण ४६०० मेट्रिक टन कीटकनाशकांचा वापर झाला, तर २०१३ मध्ये तो ११५९८ मेट्रिक टनांवर पोहचला. बीटी कपाशीचे अपयश सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की गत काही वर्षात राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा बनलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्येही बीटी कपाशीची भूमिका आहे. उपलब्ध आकडेवारी व वस्तुस्थितीचे विश्लेषण असे दाखविते, की ज्या भागात बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्याच भागांमध्येच मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, सरकारने आता तरी या जीवघेण्या बियाण्यांवर अविलंब बंदी लादावी!

टॅग्स :Farmerशेतकरी