शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आता तरी बीटी घालवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:46 IST

गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतकरी वा शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातही आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले आहेत. विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांची संख्या तर कितीतरी पट अधिक आहे. एका अर्थाने हे सगळे बीटी कपाशीचे बळी आहेत. कपाशीचे सर्वाधिक नुकसान करणाºया बोंडअळीला प्रतिबंध करणारे बियाणे म्हणून बीटी कपाशीची प्रचंड भलावण केल्या गेली. प्रारंभीच्या काळात बीटी बियाण्यांमुळे शेतकºयांचा कीटकनाशकांवरील खर्च कमी झालाही; पण लवकरच बीटी कपाशीवरही बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसू लागला. त्यामुळे पुन्हा एकदा कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली. यावर्षी तर प्रतिकूल पर्जन्यमान व हवामानामुळे बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. परिणामी मनाई असलेल्या व अपवादात्मक स्थितीत वापरावयाच्या अतिजहाल कीटकनाशकांची बेसुमार फवारणी झाली आणि त्याचाच परिपाक मोठ्या प्रमाणातील मृत्यूंच्या रूपाने समोर आला आहे. वास्तविक बीटी कपाशीचे भारतात आगमन झाले त्यावेळीच डॉ. वंदना शिवांसारख्या पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध केला होता; परंतु त्यांना कुणी जुमानले नाही. बीटी कपाशी बियाणे अपयशी सिद्ध झाल्याची कबुली, ते बियाणे भारतात आणणाºया बहुराष्ट्रीय कंपनीने २०१० मध्येच दिली होती. गुलाबी बोंडअळीने स्वत:मध्ये बीटी प्रतिबंधक क्षमता विकसित केल्याचे सदर कंपनीने आनुवंशिक अभियांत्रिकी मान्यता समिती म्हणजेच जीईएसीला अधिकृतरीत्या कळविले होते. बीटी बियाण्याच्या अपयशाचा दृश्य परिणाम हा आहे, की २००६ च्या तुलनेत २०१३ मध्ये कीटकनाशकांचा वापर जवळपास तिप्पट झाला होता. उपलब्ध आकडेवारीनुसार २००६ मध्ये देशात एकूण ४६०० मेट्रिक टन कीटकनाशकांचा वापर झाला, तर २०१३ मध्ये तो ११५९८ मेट्रिक टनांवर पोहचला. बीटी कपाशीचे अपयश सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की गत काही वर्षात राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा बनलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्येही बीटी कपाशीची भूमिका आहे. उपलब्ध आकडेवारी व वस्तुस्थितीचे विश्लेषण असे दाखविते, की ज्या भागात बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्याच भागांमध्येच मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, सरकारने आता तरी या जीवघेण्या बियाण्यांवर अविलंब बंदी लादावी!

टॅग्स :Farmerशेतकरी