शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष: पाण्याचा हिशोब ठेवणारा द्रष्टा ऑडिटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:38 IST

नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले !

मुलखावेगळी माणसेदिनकर गांगलनगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले ! जलसंवर्धन जेवढे महत्त्वाचे, तेवढीच उपलब्ध पाणी पुरवून-पुरवून वापरण्याची दृष्टी महत्त्वाची हे त्यांना कळले. तोच मुद्दा घेऊन त्यांनी गेल्या बारा-पंधरा वर्षांत प्रचाराचे रान उठवले आहे. नुसत्या ‘बजेटिंग’वर साठ कार्यशाळा घेतल्या. त्याचबरोबर पाणी या द्रव्याचा सर्वांगीण अभ्यास केला. ते त्या विषयावर किमान साडेतीन तास अखंड भाषण करू शकतात.- एकाही श्रोत्याला कंटाळा येत नाही. उलट, अनेक माणसे पाणी बचतीस प्रवृत्त होतात. त्यांनी त्या भाषणातील चार-चार ओळींच्या ग्राफिटी तयार केल्या आणि व्हॉट्सॲपवरून साडेतीन हजार लोकांना पाठवल्या. एकाही माणसाने वर्षभरात तो ‘ग्रुप’ सोडला नाही !

ते रोटरी सभासद आहेत. त्यांनी पुणे डिस्ट्रिक्टच्या एकशे नऊ क्लबना जलप्रबोधनाने पाणी बचत मोहिमेत जोडून घेतले. त्यातून गेल्या सात वर्षांत पुणे शहराबरोबरच एकशे सेहेचाळीसपेक्षा अधिक गावांत पाणीसंबंधात कार्य उभे राहिले आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायातील अर्थ मूव्हिंग मशीन एक वर्षभर वेगवेगळ्या गावांना पाणीसंबंधित कार्यासाठी विनामूल्य दिले, त्यातून सात गावे त्या मशीनच्या मदतीने जलस्वयंपूर्ण झाली !

त्यांनी वृत्तपत्रांत दीडशेहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यातून ‘जलनायक’सारखे पुस्तक तयार झाले. त्यांनी पाण्यावरच गावोगावी सहाशेपेक्षा अधिक भाषणे केली आहेत. यूट्यूबवर त्यांचे पाणी प्रबोधनावर चाळीस कार्यक्रम आहेत. ताजा ‘कॅन्सर ट्रेन’ हा कार्यक्रम हृदय व मेंदू फाडून टाकतो. पंजाबमधील भटिंडा ते राजस्थानातील जयपूर ही ट्रेन कॅन्सर पेशंट्सची भरलेली असते. ती कहाणी सांगता-सांगता सतीश खाडे कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यातही शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे प्रमाण जास्त का? तर त्याचे कारण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर हे पटवून देतात. म्हणजे जेथे पाणी पुरेसे आहे तेथेही माणूस शहाणपणाने वागत नाही. तो त्या पाण्याचा वापर करून रोग फैलाव करत राहतो.

सतीश यांनी केलेले अभ्यास मोठमोठे आहेत. त्यांनी चार हजार आठशे दहा लोकांकडून प्रश्नावली भरून घेतली व ते निष्कर्ष राष्ट्रीय परिषदेत मांडले. तेथे त्या निबंधाचे कौतुक झाले. त्यांनी एकशे बावीस गावांचे ‘वॉटर ऑडिट’ गावकऱ्यांकडून करवून घेतले आणि त्या गावांना त्यांची जलस्थिती पटवून दिली. त्यांना पर्यावरण रक्षकसारखे सात प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार लाभले आहेत.

जलसप्ताहासारखे कार्यक्रम योजून लोकांना आकृष्ट करण्याचे तंत्रही सतीश यांनी अचूक अवलंबले आहे. तेथे जलप्रबोधनाविषयी कार्यक्रम होतात, रोटरी वॉटर अवॉर्ड, जलदुर्गा असे पुरस्कार दिले जातात. वॉटर ऑलिंपियाड भरवून मुलांना त्या वयातच जलसाक्षर केले जाते. कारण उद्याच्या पाणीटंचाईची झळ त्यांनाच जास्त सहन करावी लागणार आहे!

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रAhmednagarअहमदनगर