शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

By meghana.dhoke | Published: July 01, 2023 10:40 AM

Ayodhya: ‘आदिपुरुष’मधले टपोरी संवाद, आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना आठवली अयोध्येत भेटलेली साधीभोळी माणसं!

- मेघना ढोके(संपादक, लोकमत सखी डिजिटल)

अयोध्येत शरयूकाठचं एक दृश्य विलक्षण मोहक आणि तितकंच भावुक असतं. तिथं भेटणारी अयोध्यावासी माणसं सांगतात, ‘रामजी के समय की यहाँ आज दो चिजे है, एक ये नाम, अयोध्याजी और दुसरी शरयूजी!’ 

त्याच शरयू काठी राम की पौडी अर्थात घाटावर मोठे स्क्रीन लागलेले दिसतात. स्क्रीनवर रामायण सुरू असतं.  (रामानंद सागरकृत टीव्ही सिरिअल). तिन्ही सांजेलाच नाही, तर अगदी सकाळी आणि दुपारी उन्हातही देशातून कुठकुठून आलेली माणसं  घाटावर बसून ते रामायण पाहत असतात. रडत असतात, हुंदक्यांचे आवाज ऐकू येतात.

लव-कुश गात असतात, ‘हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्रीराम की..’ विलक्षण असतं वातावरण! गोरगरीब साधी माणसं भान हरपून तो पडदा पाहतात. कथा सांगता सांगता लव-कुश गाण्यातून जाब विचारत असतात, जेव्हा माँ सीतेला बोल लावण्यात आला,  तेव्हा कुठे होतात तुम्ही अयोध्यावासी? कुठे होती राजमातांची ममता, कुठे होते ज्ञानी गुरुजन, कुठे होते सगळे भाऊबंद? 

जणू कुणी आज आपल्यालाच जाब विचारतं आहे असं वाटून माणसं शरमेनं मान खाली घालून बसतात, रडतात.  अयोध्येतली आणि अयोध्येबाहेरची, बहुतांश देशातल्या हिंदी पट्ट्यात जगणारी माणसं अयोध्येतल्या दहा दिवसांत भेटली. या शहरात राहणाऱ्यांसाठीही प्रभू श्रीरामाची रूपं वेगवेगळी आहेत. रामजन्मभूमीतले रामलला, कनक भवनातले ‘सरकार’ आणि घरोघर ठाकूरजींच्या रूपात असलेलेही “श्रीराम”!

आपण स्वत: जेवणापूर्वी ठाकूरजींना काय ‘भोग’ लावायचा याची काळजी माणसांना असते.  काही घरात तर आर्थिक चणचणही असते; पण तरीही घाटांवरच्या गल्ल्यांत, पंडे असणाऱ्या कुटुंबात, मठ-मंदिरात कुठंही जा, श्रद्धा एकच, ‘ठाकूरजी अपनी व्यवस्था खूद करते है!’ 

अगदी कोरोनाकाळात जेव्हा या तीर्थक्षेत्री गावात कुणी येऊ शकत नव्हतं तेव्हाही आपल्या पोटापाण्यापेक्षा इथं माणसांना चिंता होती की ठाकूरजींना भोग लागला पाहिजे!  अयोध्येतली माणसं ठाकूरजींकडे पाहून जगतात. भोग-प्रसाद, बालभोग, कच्चा प्रशाद-पक्का प्रशाद यशाशक्ती आधी त्यांना देतात. म्हणतात, ‘संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है? यहीं तो जीवन की माया है!’ - चर्चा काहीही सुरू असो, उत्तरादाखल रामजींच्या जीवनातला एखादा दाखला येतोच.

आपली सुख-दु:खं आपण भोगायची, त्यासाठी देवाला संकटात घालायचं नाही या समजुतीनं जगणारी माणसं अनेक गोष्टी विनातक्रार सहज स्वीकारतात. जगणं जसं आहे तसं स्वीकारण्याचा समंजस सहजभाव माणसांच्या वागण्या-बोलण्यात ठायीठायी भेटतो.

जगण्याच्या अडचणी कुठे कुणाला चुकल्या म्हणा! पण श्रीरामाच्या भूमीतल्या माणसांचा भरवसा फक्त दोघांवरच. एक रामजी, दुसरे हनुमानजी.  श्रद्धेनं घरातल्या ठाकूरजींची तर पोटच्या बाळासारखी काळजी घेतली जाते, नैवेद्य दाखवण्याच्या वेळा सांभाळल्या जातात आणि काही अडलं, दुखलंखुपलं, अडचण आली तर मदत मागायला वडीलधाऱ्यांना भेटावं तसं रामाला - ‘कनक सरकार’ किंवा हनुमान गढीवर जाऊन हनुमानाकडे ‘सरकार’ म्हणून अर्जी दिली जाते.

शरयूकाठी चिरपुरातन नित्य नूतन एकच गोष्ट आहे असं साधीभोळी माणसं मानतात ! ती म्हणजे अयोध्या आणि रामकथा. इथं गोरगरीब माणसांच्या रोजच्या आयुष्यातही व्यावहारिक शहाणपण आणि जगण्याचा समंजस स्वीकार इतका सहज आहे की शहरी धामधुमीच्या स्पर्धात्मक जगाला ते सारं अजब वाटावं. अविश्सनीयही. 

हे सारं आठवलं कारण ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निमित्तानं झालेली चर्चा. त्या सिनेमातले टपोरी संवाद, सदा आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना अयोध्येत भेटणारी साधीभोळी माणसं आठवली. शरयूच्या काठचं ते जग पडद्यावरच्या ‘व्हीएफएक्स’सारखं चकाचक ग्लॅमरस अजिबात नाही; पण समाधानी-साधं आणि समंजस मात्र नक्की आहे..    meghana.dhoke@lokmat.com

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरAdipurushआदिपुरूष