शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: रतन टाटा, देश तुमच्याप्रति अखंड कृतज्ञ राहील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

Ratan Tata: रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे, त्यांचे ऋण फिटणार नाही!

नरेंद्र मोदी(पंतप्रधान) 

रतन टाटाजी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येकाला त्यांचे नसणे कायम तीव्रतेने जाणवत राहील. प्रस्थापित उद्योगपती, होतकरू उद्योजक आणि मेहनती व्यावसायिक सर्वांनीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पर्यावरणाप्रति सजगता आणि परोपकाराला वाहून घेतलेल्या प्रत्येकालाही तितकेच दुःख झाले. देशच काय, सारे जगही हळहळले.

युवकांसाठी रतन टाटा  प्रेरणास्थान होते. स्वप्ने साकारायची असतात आणि करुणा, विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते, याचा धडाच त्यांनी तरुण पिढीला दिला.  भारतीय उद्योजकतेची सर्वोत्कृष्ट परंपरा त्यांनी जोपासली. प्रामाणिकपणा, सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मूल्यांप्रति ठाम कटिबद्धता हे त्यांचे जीवनध्येयच होते..  त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आदर, सचोटी आणि विश्वासार्हता  जपत जगभरात यशाची नवी शिखरे  गाठली. तरीही अतिशय विनम्रतेने त्यांनी हे यश स्वीकारले.  

इतरांची स्वप्ने साकारण्यासाठी आधार देणे हा रतन टाटा यांचा  एक अनोखा गुण होता. भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे  मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जात असत. युवा उद्योजकांच्या आशा-आकांक्षा त्यांनी जाणल्या आणि  भारताच्या भविष्याला आकार देण्याची त्यांची क्षमता ओळखली. रतन टाटा यांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा  पुरस्कार केला आणि भारतीय उद्योगाने जागतिक मापदंड स्थापित करावेत, असा आग्रह धरला. बोर्डरूम किंवा फक्त आपल्या सहकाऱ्यांपुरती त्यांची महानता मर्यादित नव्हती. सर्व मानवतेप्रति त्यांची  परोपकारी दृष्टी होती. प्राण्यांप्रति त्यांचे अपार प्रेम सर्वपरिचित आहे. कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने, रतन टाटा यांची देशभक्ती संकटाच्या काळात तेजाने झळाळून उठली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल त्यांनी झपाट्याने पुन्हा उभे केले.  भारत दहशतवादाला नकार देत एकजुटीने उभा आहे, हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिले. 

व्यक्तिगतरीत्या मला अनेक वर्षांपासून त्यांचा स्नेह मिळाला. आम्ही गुजरातमध्ये सोबत काम केले. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, यातील अनेक प्रकल्पांवर त्यांचा खूप जीव होता. काही आठवड्यांपूर्वी, मी स्पेनचे अध्यक्ष  पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत बडोदा येथे होतो आणि आम्ही संयुक्तपणे सी-२९५ विमाने बनवणाऱ्या संकुलाचे उद्घाटन केले. रतन टाटा यांनीच यावर काम सुरू केले होते. त्यांची अनुपस्थिती आम्हाला फारच जाणवली हे वेगळे सांगायला नको.

रतन टाटा हे पत्रलेखक म्हणूनही माझ्या स्मरणात आहेत. ते वारंवार मला निरनिराळ्या मुद्द्यांवर पत्र लिहीत असत. मग ते प्रशासनाचे विषय असोत, सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असो किंवा निवडणूक विजयानंतर अभिनंदनाच्या शुभेच्छा असोत. मी केंद्र सरकारमध्ये गेल्यावरही आमचा निकटचा संवाद कायम राहिला आणि ते  राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार राहिले. रतन टाटा यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला दिलेला पाठिंबा विशेषत्वाने माझ्या हृदयाच्या जवळ आहे. भारताच्या प्रगतीसाठी सामूहिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि साफसफाई अत्यावश्यक आहे हे समजून ते या लोकचळवळीचे मौखिक पुरस्कर्ते बनले. 

आरोग्यसेवा आणि विशेषत: कर्करोगाविरुद्धची लढाई हे त्यांना महत्त्वाचे वाटणारे दोन विषय.  दोन वर्षांपूर्वीच आसाममध्ये आम्ही दोघांनी मिळून कर्करोग रुग्णालयांचे  उद्घाटन केले होते. ‘आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे आरोग्यसेवेसाठी समर्पित करायची आहेत’, असे तेव्हा त्यांनी बोलून दाखवले होते. समाजातील दुर्बळांच्या/असुरक्षितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच न्याय्य असल्याचा त्यांना विश्वास होता.

जेव्हा जेव्हा रतन टाटा यांची आठवण निघेल, तेव्हा तेव्हा त्यांनी कल्पिलेल्या समाजाचे चित्र नजरेसमोर उभे राहील.. असा समाज, जिथे उद्योग-व्यवसाय केवळ संपत्तीनिर्मितीची नव्हे सत्कार्याला आधार देणारी केंद्रे असतील, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्य असेल आणि जिथे प्रगती ही सर्वांचे कल्याण आणि आनंदाच्या मापाने मोजली जाईल...

रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली... त्यामध्ये ते निरंतर वास करून राहतील. भारत देशामध्ये अक्षय ऊर्जेचे एक केंद्र तयार केल्याबद्दल देशातल्या पुढच्या पिढ्याही त्यांच्या कृतज्ञ असतील.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाNarendra Modiनरेंद्र मोदी