शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

विशेष लेख: रतन टाटा, देश तुमच्याप्रति अखंड कृतज्ञ राहील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

Ratan Tata: रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे, त्यांचे ऋण फिटणार नाही!

नरेंद्र मोदी(पंतप्रधान) 

रतन टाटाजी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येकाला त्यांचे नसणे कायम तीव्रतेने जाणवत राहील. प्रस्थापित उद्योगपती, होतकरू उद्योजक आणि मेहनती व्यावसायिक सर्वांनीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पर्यावरणाप्रति सजगता आणि परोपकाराला वाहून घेतलेल्या प्रत्येकालाही तितकेच दुःख झाले. देशच काय, सारे जगही हळहळले.

युवकांसाठी रतन टाटा  प्रेरणास्थान होते. स्वप्ने साकारायची असतात आणि करुणा, विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते, याचा धडाच त्यांनी तरुण पिढीला दिला.  भारतीय उद्योजकतेची सर्वोत्कृष्ट परंपरा त्यांनी जोपासली. प्रामाणिकपणा, सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मूल्यांप्रति ठाम कटिबद्धता हे त्यांचे जीवनध्येयच होते..  त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आदर, सचोटी आणि विश्वासार्हता  जपत जगभरात यशाची नवी शिखरे  गाठली. तरीही अतिशय विनम्रतेने त्यांनी हे यश स्वीकारले.  

इतरांची स्वप्ने साकारण्यासाठी आधार देणे हा रतन टाटा यांचा  एक अनोखा गुण होता. भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे  मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जात असत. युवा उद्योजकांच्या आशा-आकांक्षा त्यांनी जाणल्या आणि  भारताच्या भविष्याला आकार देण्याची त्यांची क्षमता ओळखली. रतन टाटा यांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा  पुरस्कार केला आणि भारतीय उद्योगाने जागतिक मापदंड स्थापित करावेत, असा आग्रह धरला. बोर्डरूम किंवा फक्त आपल्या सहकाऱ्यांपुरती त्यांची महानता मर्यादित नव्हती. सर्व मानवतेप्रति त्यांची  परोपकारी दृष्टी होती. प्राण्यांप्रति त्यांचे अपार प्रेम सर्वपरिचित आहे. कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने, रतन टाटा यांची देशभक्ती संकटाच्या काळात तेजाने झळाळून उठली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल त्यांनी झपाट्याने पुन्हा उभे केले.  भारत दहशतवादाला नकार देत एकजुटीने उभा आहे, हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिले. 

व्यक्तिगतरीत्या मला अनेक वर्षांपासून त्यांचा स्नेह मिळाला. आम्ही गुजरातमध्ये सोबत काम केले. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, यातील अनेक प्रकल्पांवर त्यांचा खूप जीव होता. काही आठवड्यांपूर्वी, मी स्पेनचे अध्यक्ष  पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत बडोदा येथे होतो आणि आम्ही संयुक्तपणे सी-२९५ विमाने बनवणाऱ्या संकुलाचे उद्घाटन केले. रतन टाटा यांनीच यावर काम सुरू केले होते. त्यांची अनुपस्थिती आम्हाला फारच जाणवली हे वेगळे सांगायला नको.

रतन टाटा हे पत्रलेखक म्हणूनही माझ्या स्मरणात आहेत. ते वारंवार मला निरनिराळ्या मुद्द्यांवर पत्र लिहीत असत. मग ते प्रशासनाचे विषय असोत, सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असो किंवा निवडणूक विजयानंतर अभिनंदनाच्या शुभेच्छा असोत. मी केंद्र सरकारमध्ये गेल्यावरही आमचा निकटचा संवाद कायम राहिला आणि ते  राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार राहिले. रतन टाटा यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला दिलेला पाठिंबा विशेषत्वाने माझ्या हृदयाच्या जवळ आहे. भारताच्या प्रगतीसाठी सामूहिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि साफसफाई अत्यावश्यक आहे हे समजून ते या लोकचळवळीचे मौखिक पुरस्कर्ते बनले. 

आरोग्यसेवा आणि विशेषत: कर्करोगाविरुद्धची लढाई हे त्यांना महत्त्वाचे वाटणारे दोन विषय.  दोन वर्षांपूर्वीच आसाममध्ये आम्ही दोघांनी मिळून कर्करोग रुग्णालयांचे  उद्घाटन केले होते. ‘आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे आरोग्यसेवेसाठी समर्पित करायची आहेत’, असे तेव्हा त्यांनी बोलून दाखवले होते. समाजातील दुर्बळांच्या/असुरक्षितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच न्याय्य असल्याचा त्यांना विश्वास होता.

जेव्हा जेव्हा रतन टाटा यांची आठवण निघेल, तेव्हा तेव्हा त्यांनी कल्पिलेल्या समाजाचे चित्र नजरेसमोर उभे राहील.. असा समाज, जिथे उद्योग-व्यवसाय केवळ संपत्तीनिर्मितीची नव्हे सत्कार्याला आधार देणारी केंद्रे असतील, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्य असेल आणि जिथे प्रगती ही सर्वांचे कल्याण आणि आनंदाच्या मापाने मोजली जाईल...

रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली... त्यामध्ये ते निरंतर वास करून राहतील. भारत देशामध्ये अक्षय ऊर्जेचे एक केंद्र तयार केल्याबद्दल देशातल्या पुढच्या पिढ्याही त्यांच्या कृतज्ञ असतील.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाNarendra Modiनरेंद्र मोदी