शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

विशेष लेख: रतन टाटा, देश तुमच्याप्रति अखंड कृतज्ञ राहील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

Ratan Tata: रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे, त्यांचे ऋण फिटणार नाही!

नरेंद्र मोदी(पंतप्रधान) 

रतन टाटाजी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येकाला त्यांचे नसणे कायम तीव्रतेने जाणवत राहील. प्रस्थापित उद्योगपती, होतकरू उद्योजक आणि मेहनती व्यावसायिक सर्वांनीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पर्यावरणाप्रति सजगता आणि परोपकाराला वाहून घेतलेल्या प्रत्येकालाही तितकेच दुःख झाले. देशच काय, सारे जगही हळहळले.

युवकांसाठी रतन टाटा  प्रेरणास्थान होते. स्वप्ने साकारायची असतात आणि करुणा, विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते, याचा धडाच त्यांनी तरुण पिढीला दिला.  भारतीय उद्योजकतेची सर्वोत्कृष्ट परंपरा त्यांनी जोपासली. प्रामाणिकपणा, सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मूल्यांप्रति ठाम कटिबद्धता हे त्यांचे जीवनध्येयच होते..  त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आदर, सचोटी आणि विश्वासार्हता  जपत जगभरात यशाची नवी शिखरे  गाठली. तरीही अतिशय विनम्रतेने त्यांनी हे यश स्वीकारले.  

इतरांची स्वप्ने साकारण्यासाठी आधार देणे हा रतन टाटा यांचा  एक अनोखा गुण होता. भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे  मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जात असत. युवा उद्योजकांच्या आशा-आकांक्षा त्यांनी जाणल्या आणि  भारताच्या भविष्याला आकार देण्याची त्यांची क्षमता ओळखली. रतन टाटा यांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा  पुरस्कार केला आणि भारतीय उद्योगाने जागतिक मापदंड स्थापित करावेत, असा आग्रह धरला. बोर्डरूम किंवा फक्त आपल्या सहकाऱ्यांपुरती त्यांची महानता मर्यादित नव्हती. सर्व मानवतेप्रति त्यांची  परोपकारी दृष्टी होती. प्राण्यांप्रति त्यांचे अपार प्रेम सर्वपरिचित आहे. कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने, रतन टाटा यांची देशभक्ती संकटाच्या काळात तेजाने झळाळून उठली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल त्यांनी झपाट्याने पुन्हा उभे केले.  भारत दहशतवादाला नकार देत एकजुटीने उभा आहे, हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिले. 

व्यक्तिगतरीत्या मला अनेक वर्षांपासून त्यांचा स्नेह मिळाला. आम्ही गुजरातमध्ये सोबत काम केले. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, यातील अनेक प्रकल्पांवर त्यांचा खूप जीव होता. काही आठवड्यांपूर्वी, मी स्पेनचे अध्यक्ष  पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत बडोदा येथे होतो आणि आम्ही संयुक्तपणे सी-२९५ विमाने बनवणाऱ्या संकुलाचे उद्घाटन केले. रतन टाटा यांनीच यावर काम सुरू केले होते. त्यांची अनुपस्थिती आम्हाला फारच जाणवली हे वेगळे सांगायला नको.

रतन टाटा हे पत्रलेखक म्हणूनही माझ्या स्मरणात आहेत. ते वारंवार मला निरनिराळ्या मुद्द्यांवर पत्र लिहीत असत. मग ते प्रशासनाचे विषय असोत, सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असो किंवा निवडणूक विजयानंतर अभिनंदनाच्या शुभेच्छा असोत. मी केंद्र सरकारमध्ये गेल्यावरही आमचा निकटचा संवाद कायम राहिला आणि ते  राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार राहिले. रतन टाटा यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला दिलेला पाठिंबा विशेषत्वाने माझ्या हृदयाच्या जवळ आहे. भारताच्या प्रगतीसाठी सामूहिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि साफसफाई अत्यावश्यक आहे हे समजून ते या लोकचळवळीचे मौखिक पुरस्कर्ते बनले. 

आरोग्यसेवा आणि विशेषत: कर्करोगाविरुद्धची लढाई हे त्यांना महत्त्वाचे वाटणारे दोन विषय.  दोन वर्षांपूर्वीच आसाममध्ये आम्ही दोघांनी मिळून कर्करोग रुग्णालयांचे  उद्घाटन केले होते. ‘आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे आरोग्यसेवेसाठी समर्पित करायची आहेत’, असे तेव्हा त्यांनी बोलून दाखवले होते. समाजातील दुर्बळांच्या/असुरक्षितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच न्याय्य असल्याचा त्यांना विश्वास होता.

जेव्हा जेव्हा रतन टाटा यांची आठवण निघेल, तेव्हा तेव्हा त्यांनी कल्पिलेल्या समाजाचे चित्र नजरेसमोर उभे राहील.. असा समाज, जिथे उद्योग-व्यवसाय केवळ संपत्तीनिर्मितीची नव्हे सत्कार्याला आधार देणारी केंद्रे असतील, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्य असेल आणि जिथे प्रगती ही सर्वांचे कल्याण आणि आनंदाच्या मापाने मोजली जाईल...

रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली... त्यामध्ये ते निरंतर वास करून राहतील. भारत देशामध्ये अक्षय ऊर्जेचे एक केंद्र तयार केल्याबद्दल देशातल्या पुढच्या पिढ्याही त्यांच्या कृतज्ञ असतील.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाNarendra Modiनरेंद्र मोदी