शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

कामाच्या ताणाचे बळी टाळायचे असतील, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 12:34 IST

मुद्द्याची गोष्ट : अर्न्स्ट अँड यंग (ईयू) या प्रतिष्ठित कंपनीत कामाला असणारी चार्टर्ड अकाउंटंट अना सबास्टीयन पेरियल या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्यानंतर यावर चर्चा सुरू आहे. सोबतच तिच्या अंत्यसंस्कारांना कंपनीचा एकही माणूस न जाणे याचीही लोक चर्चा करीत आहेत. जीव राहिला तरच करिअर करता येईल, असा सल्ला देताना काही जण दिसत आहेत. त्यानिमित्त...

डॉ. हमीद दाभोलकरमनोविकार तज्ज्ञ परिवर्तन संस्था

पुण्यात नुकतीच अना सबास्टीयन पेरीयल या २६ वर्षांच्या मुलीचा अतिकामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. आपल्या आजूबाजूला वाढलेल्या कामासंबंधी ताणाच्या प्रश्नाने किती गंभीर स्वरूप धारण केले आहे, याचा हा निर्देशांक आहे. सततची स्पर्धा, दुसऱ्याशी तुलना करत राहणे, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून सतत यशाच्या मागे धावत राहण्याचा प्रयत्न करणरी समाजाची मानसिकता यामधून एक अत्यंत घातक आणि जीवघेणी व्यवस्था आपण निर्माण करत आहोत, हे परत एकदा अधोरेखित झाले आहे. हा प्रश्न केवळ अना आणि तिच्या कंपनीपुरता मर्यादित नाही. आपल्या आजूबाजूला या ताणाच्या चक्रात अडकलेले असंख्य लोक आपल्याला रोज दिसतात. आपल्यापैकी देखील अनेक जण अशा तणावपूर्ण परिस्थितीत रोज भरडले जात असतील, म्हणून या विषयी आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन बघायला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे.

आपण सर्व सध्या भोवळ येईल, अशा गतीने आयुष्य जगतो आहोत. दैनंदिन जीवनामधील विरंगुळा व विश्रांतीच्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. सातत्याने कष्ट करायची तयारी असलेल्या वर्गासाठी कधी नव्हे एवढ्या विविध संधी सध्या दृष्टीक्षेपात आल्या आहेत. संधीची उपलब्धता हे एक दुधारी शस्त्र आहे. वैयक्तिक आयुष्यात एका मर्यादेपेक्षा जास्त संधी या मानवी मनाला गोंधळात टाकतात. तसेच, उपलब्ध संधी साधण्यासाठी मोठ्या जनसमूहात चुरस असल्यामुळे आयुष्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये एक टोकाची स्पर्धात्मकता दिसून येते. 

आणखी कशाने येतोय ताण?

आपल्या आयुष्यात समाधानाने जगण्यापेक्षा पैसा, गाडी, बंगला, महागडे कपडे, फोन या सगळ्या भौतिक गोष्टींना अवास्तव महत्त्व देणारी मानसिकता निर्माण झाली आहे.

एका बाजूला आयुष्यामध्ये सातत्याने वेगाने धावणे, ते करीत असतानाच उपलब्ध असंख्य पर्यायांमधून आपल्याला हवे ते पर्याय निवडणे ही गोष्ट निश्चितच ताणदायक आहे.

त्याचबरोबर जर आयुष्याच्या सार्थकतेचे भानदेखील गमावले गेले असेल, तर जी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, ती सध्या आपण समाज म्हणून अनुभवतो आहोत.

जवळच्या नाते संबंधांमधील विसाव्याच्या जागा या परिस्थितीमध्ये आपल्याला आधार देणाऱ्या ठरत असतात. बदलत्या जीवनशैलीमध्ये नातेसंबंधांची वीणदेखील उसवू लागल्यामुळे या हक्काच्या जागादेखील कमी होत चालल्या आहेत.

अतिकामाचा गौरव हे वर्ककल्चर काय कामाचे?

अनेक आयटी व इतर कंपन्या कर्मचाऱ्यांकडे केवळ एक साधन म्हणून बघत असतात. सातत्याने कामाचा दबाव वाढवणारे आणि अतिकाम करण्याचा गौरव करणारे एक वर्ककल्चर जाणीवपूर्वक तयार केले जाते. म्हणूनच नारायण मूर्ती यांच्यासारखे लोक हे कामाचे तास आठवड्याला सत्तर पेक्षा अधिक करण्याची मागणी करतात. साहजिक आहे की अना व तिच्यासारखे असंख्य जीव त्यात भरडले जातात. या सगळ्या गोष्टींमधून निर्माण होणारे ताण लक्षात घेता काही देश हे कामाची वेळ सोडून कर्मचाऱ्यांना संपर्क करणे हे कायद्याने प्रतिबंधित करू लागले आहेत. यंदा जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहातील थीमदेखील ‘कामाच्या ठिकाणी येणारा ताण कसा कमी करावा’ या विषयाला धरून आहे.

‘सिर सलामत तो पगडी पचास’ हे कायम लक्षात असावे...

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या विषयी सजग असणे हे केवळ मानवी हक्क  दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर ज्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य संवर्धनावर भर देतात त्यांना या धोरणांचा दीर्घकालीन प्रवासात आर्थिक पातळीवर देखील फायदा होतो, असे दिसून येत आहे.

कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाला योग्य प्रकारे नकार देण्याचे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. शेवटी जर कंपनी आपल्या आरोग्याचा विचार करत नसेल, तर आपण तरी कंपनीच्या यशाचा किती विचार करावा, हा प्रश्न पडणे अजिबात चुकीची गोष्ट नाही.

वेळ पडल्यास कमी खर्चात, कमी महत्त्वाकांक्षी राहून समाधानी आयुष्य जगण्याची ‘ओल्डफॅशन’ जीवन पद्धती इथे आपल्या कामी येऊ शकते! ‘सिर सलामत तो पगडी पचास’ हे आपण विसरता कामा नये.

जर आपले भावनिक स्वास्थ्य अतिरिक्त कामाने बिघडते आहे, असे लक्षात येत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात कमीपणा समजू नये. आपले प्राधान्यक्रम तपासून त्यात बदल करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. 

टॅग्स :Puneपुणे