शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

अन्वयार्थ | विशेष लेख: माझे स्वप्न आहे... जगातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 06:46 IST

ध्यान म्हणजे केवळ गूढ साधना नाही,  ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ध्यान म्हणजे केवळ एकाग्रताही नव्हे; ते विसर्जन आहे. सोडून देण्याची कला आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकर

शांत व्यक्ती एक शांत समाज निर्माण करते, श्वासागणिक. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि तणावमुक्त, हिंसामुक्त जग निर्माण करणे, हे माझ्यासाठी सर्वांत सुंदर स्वप्न आहे. ध्यान ही भारताच्या आध्यात्मिक परंपरेशी जोडलेली प्राचीन साधना आहे, जी हिमालयातील ऋषींच्या ध्यानधारणेच्या आणि काशीच्या पवित्र नगरीतील कथांमुळे प्रेरणा देत आली आहे. 

अशांत मन हे ध्यान नव्हे. सध्याच्या क्षणी असलेलं मन ध्यान आहे. मन जेव्हा कोणतीही हयगय किंवा अपेक्षा करत नाही, तेव्हा ते ध्यान आहे. मन जेव्हा निर्मळ होतं, तेव्हा ते ध्यान आहे. ध्यान म्हणजे केवळ गूढ साधना नाही, तर ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ध्यान म्हणजे केवळ एकाग्रताही नव्हे; ते विसर्जन आहे. सोडून देण्याची कला आहे. जेव्हा मन त्याच्या नैसर्गिक लयीत स्थिर होतं, तेव्हा स्पष्टता प्रकट होते आणि एक गहनशांतता उदयास येते.

ध्यान हे केवळ आरामाचे तंत्रही नाही. ती वर्तमान क्षणात जगण्याची कला आहे, ज्याद्वारे मन सतर्क आणि शांत राहते. ध्यान आपल्याला शांततेने आणि लक्षपूर्वक आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करते, अडथळे दूर करते आणि आपली अंतःसाधनेची क्षमता उघडते. ध्यानाचा उद्देश म्हणजे आतून शांतता आणि बाहेरून स्फूर्ती निर्माण करणे. ध्यानाच्या माध्यमातून भारतभर  परिवर्तनाची लाट सुरू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अनेक  स्वयंसेवक दुष्काळग्रस्त गावांमध्ये परतले आणि परिवर्तन घडवून आणले. नद्यांचे पुनरुज्जीवन, नापीक जमिनी पुनर्संचयित करणे यांसारख्या उपक्रमांद्वारे हे तरुण ग्रामीण भारताची कथा नव्याने लिहीत आहेत. आठ राज्यांतील ७० पेक्षा अधिक नद्या आणि प्रवाह पुनरुज्जीवित झाले आहेत, ज्याचा परिणाम २० दजार गावांमधील ३.४५ कोटी लोकांवर झाला आहे.

ध्यानाची ही शक्ती केवळ व्यक्तींपुरती मर्यादित नाही, तर फूट पडलेल्या राष्ट्रांना एकत्र आणण्यासाठी सुद्धा ध्यानाच्या शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. जिथे पाच दशकांहून अधिक काळ सशस्त्र संघर्ष चालू होता, अशा कोलंबियामध्ये  संवाद आणि ध्यानाच्या हस्तक्षेपामुळे वर्षानुवर्षे साठलेल्या द्वेषाला विराम मिळाला. यामुळे FARCने युद्धविराम जाहीर केला आणि लोकशाही व्यवस्था स्वीकारली. इराक, सीरिया आणि श्रीलंका यांसारख्या युद्धग्रस्त प्रदेशांमध्ये, ध्यानाने दीड लाखांहून अधिक युद्धग्रस्तांना सांत्वना दिली आहे. निर्वासित आणि आघातग्रस्त पीडितांना साध्या श्वसन तंत्राद्वारे आशा आणि उपचार मिळाले, ज्यामुळे त्यांच्या अदृश्य जखमा आनंदात परिवर्तित झाल्या.

विविध समुदायांमध्ये संवाद आणि समजूत वाढविण्याच्या प्रयत्नांना येणारे यश दाखवून देते की अगदी विपरित परिस्थितीतही ध्यान  स्पष्टता, करुणा आणि आनंद निर्माण करते. ध्यान केवळ मन शांत करत नाही, तर एक उच्च दृष्टिकोन देते, ज्यामुळे नेते आणि समुदाय खोलवर रुजलेल्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन टिकाऊ शांततेसाठी कार्य करण्यास सक्षम होतात.

ध्यानाने आता कॉर्पोरेट बोर्ड रूमपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत स्थान मिळविले आहे. Google आणि Microsoft यांसारख्या कंपन्यांनी उत्पादकता वाढीबरोबरच कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम स्वीकारले आहेत.  जपानच्या संसदेमध्येही अलीकडेच योग क्लबची स्थापना झाली आहे. कारागृहांमध्ये ध्यानाने हजारो कैद्यांना नवीन संधी दिली आहे. प्रिझन SMART कार्यक्रमाद्वारे  ६० देशांतील आठ लाखांहून अधिक कैद्यांनी हिंसेच्या चक्रातून मुक्तता मिळविली आणि आपली माणुसकी पुन्हा शोधून काढली आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जग उन्नत करत असता. 

खरेतर तुमच्या जन्मापूर्वीपासून तुम्ही ध्यान करीत आहात... जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात काहीही न करता केवळ अस्तित्वात होतात, तेच ध्यान आहे. प्रत्येक माणसामध्ये त्या अत्यंत आरामदायी अवस्थेकडे जाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असतेच.

टॅग्स :Meditationसाधना