शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

'ढाई किलो'चा हात, मारधाड आणि मसाला! बॉक्स ऑफिसवर धो-धो चालणारा 'गदर-२'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 07:39 IST

'गदर' सारखा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतका धो-धो कसा चालतो? याचं आश्चर्य वाटत असेल, तर तुमची पिटातल्या अस्सल प्रेक्षकाशी ओळख नाही।

अमोल उदगीरकर, चित्रपट समीक्षक

'ओम शांती ओम' सिनेमातला एक प्रसंग. एका प्रायोगिक दिग्दर्शकाच्या (सतीश शाह) चित्रपटाच्या सेटवर चित्रपटाचा निर्माता (अर्जुन रामपाल) येतो. रुबाबदार निर्मात्याच्या मागे दिग्दर्शक धावपळ करत असतो. दिग्दर्शक सांगत असतो, 'मैने सीन के शूट में एक ऋत्विक घटक अँगल लगाया है और एक सत्यजित रे अँगल.' निर्माता एकदम झटकन मागे वळतो आणि दिग्दर्शकाला आज्ञावजा सूचना करतो, 'एक मनमोहन देसाई अँगल भी लगाना दादा. आखिरमें वोही काम आयेगा.' भारतात 'मास मसाला' चित्रपट आणि प्रायोगिक सिनेमा यांच्यात एक छोटंसं शीतयुद्ध गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यावर दिग्दर्शक फराह खानने केलेलं हे मार्मिक भाष्य. भारतीय प्रेक्षकांनी आपल्या आवडीचं वजन नेहमी मास मसाला चित्रपटांच्या पारड्यात टाकलं आहे. त्यात पण मारधाड असणाऱ्या अॅक्शन चित्रपटांवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम. हे प्रेम फिल्म फेस्टिव्हलला जाणाऱ्या, युरोपियन सिनेमांवर प्रेम करणाऱ्या 'एलिटिस्ट' वर्गाला समजत नाही. ह्या शीतयुद्धाला सिनेमा ही कला आहे की धंदा आहे या मतभेदाची पण एक किनार आहे. 'ढाई किलोका हाथ' असलेल्या सनी पाजीचा 'गदर २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धो-धो चालत असताना या वर्गाला खूप आश्चर्य वाटतंय. एखादा सिनेमा आवडणं किंवा न आवडणं हे खूपच सापेक्ष असतं, पण बॉक्स ऑफिसचे आकडे नाकारता येत नाहीत. 'गदर-२' चं दणदणीत बॉक्स ऑफिस यश पण नाकारता येणार नाही.

'पुष्पा'मधला 'झुकेगा नही साला' म्हणणारा नायक असेल, 'केजीएफ'मधला राकट दणकट रॉकी भाई असेल, 'गदर' मधला तारा सिंग असेल किंवा कुठलेही पडदा व्यापून दशांगुळे उरणारे मास अॅक्शन नायक असतील; त्यांच्या मूळ प्रेरणा आहेत सत्तरच्या दशकातल्या अमिताभ बच्चनने साकारलेल्या अँग्री यंग मॅनमध्ये.. बच्चनपूर्व युगात हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता नायक प्रेमगीत गाणारे, नायिकेच्या विरहात व्याकूळ, आदर्श मुलगा प्रियकर, कवी वृत्तीचे असत. बच्चनच्या नायकाने हे सगळे प्रस्थापित साचे तोडून मोडून फेकून दिले. बच्चनचा नायक हा अचाट आणि अतार्किक कारनामे करणारा, एकाच वेळेस अनेक गुंडांना लोळवणारा, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा आणि पडद्यावरच्या वैयक्तिक आयुष्यात मुळीच परफेक्ट नसणारा असा होता, बच्चनचे त्या काळात गाजलेले सिनेमे रजनीकांतने रिमेक केले आणि हे मास मसाला फिल्मचं लोण दक्षिणेत पण पोहोचलं. त्यातून रजनीकांत, चिरंजीवी, मामुटी यांनी स्वतःचा असा मास मसाला नायक उभा केला. सत्तर आणि ऐंशीचं दशक अनिर्बंधपणे बच्चनने गाजवलं. त्यात धर्मेंद्र, दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक करणार जितेंद्र, विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती यांनी पण अॅक्शन चित्रपट करायला सुरुवात केली. जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनिल कपूर आणि सनी देओल यांनाही मुख्यत्वे अॅक्शन सिनेमाचाच आधार होता. नव्वदच्या दशकात पण रोमँटिक आणि अॅक्शन सिनेमे हातात हात घालून चालत.

यात मोठ्या प्रमाणात बदल झाला तो २००१ नंतर. २००१ नंतर 'अर्बन रॉम कॉम'चा काळ सुरू झाला. शहरीकरणाच्या प्रक्रियेने चांगलाच जोर धरल्यानंतरच्या भारतात जागतिक सिनेमांशी, मालिकांशी ओळख झालेला मध्यमवर्ग उदयाला आला. त्याचा खिसाही गरम होता. या वर्गाला केंद्रस्थानी ठेवून 'मल्टिप्लेक्स संस्कृती उदयाला आली. परदेशस्थ भारतीय आणि मालदार देशी मध्यमवर्गाला आकर्षित करण्याचे प्रयत्न बॉलीवूडने जोरात सुरू केले. एखादा 'गजनी', एखादा 'सिंघम' आणि एखादा 'दबंग' मध्येच यायचा; पण मासी अॅक्शन हीरोज आणि सिनेमे मागे पडायला लागले होते.

या दरम्यान ग्रामीण-निमशहरी भागातला एकनिष्ठ प्रेक्षक, सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमे बघणारा श्रमिक यांच्याकडे बॉलीवूडचं दुर्लक्ष झालं. मसाला फिल्म्सवर प्रेम असणाऱ्या या वर्गाला बॉलीवूडने पूर्ण वाऱ्यावर सोडलं. या प्रेक्षकांना पुन्हा थिएटरात आणण्याचं काम केलं 'बाहुबली', 'पुष्पा', 'केजीएफ', 'कांतारा' या दक्षिणेकडच्या सिनेमांनी! या दाक्षिणात्य सिनेमांच्या डब व्हर्जन्सला तुफान गर्दी होऊ लागली, कारण दाक्षिणात्य सिनेमा आणि त्यातल्या नायकांनी पिटातल्या, ग्रामीण-निमशहरी भागातल्या प्रेक्षकांशी असणारी आपली नाळ तुटू दिली नाही.

कोरोना काळातल्या अस्थिर आणि असुरक्षित दिवसांनंतर प्रेक्षकांमध्ये मनोरंजक सिनेमांबद्दल जे आकर्षण पुन्हा निर्माण झालं आहे त्याचं द्योतक म्हणजे शाहरुख खानचा 'पठाण' आणि आता सनी देओलचा 'गदर-२" यांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा धो-धो प्रतिसाद ! बच्चनचा 'अँग्री यंग मॅन' उदयाला आला तेव्हा स्वातंत्र्यानंतरचा भ्रमनिरास देशभरात पसरलेला होता. या कोंडमाऱ्याला सलीम जावेद यांनी अमिताभ बच्चनच्या माध्यमातून वाचा फोडली.

सध्याचं देशातलं वातावरण प्रचंड ध्रुवीकरणाने भारलेले आहे. विरुद्ध राजकीय भूमिका असणाऱ्याला शत्रू समजण्याची पद्धत रूढ झाली आहे. या तगमगीतून दोन अडीच तासांची सुटका देणारा, तर्क खुंटीवर टांगणारा मास अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना आपलं गोंधळलेलं एकटेपण सिनेमागृहातल्या अंधारात विरघळवून टाकण्यात मदत करत असावा 'गदर-२' इतका चालण्यामागचं हे आणखी एक कारण.

amoludgirkar@gmail.com

 

टॅग्स :Sunny Deolसनी देओलbollywoodबॉलिवूड