शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?

By अतुल कुलकर्णी | Updated: September 1, 2025 09:56 IST

राज्यभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या परिसरात राहणारी हजारो कोकणी माणसं गणपतीला कोकणात जातात.

अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई 

राज्यभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या परिसरात राहणारी हजारो कोकणी माणसं गणपतीला कोकणात जातात. नोकरी सोडावी लागली तरी चालेल, पण गणपतीला जाणारच या श्रद्धेने, भावनेने लोक कोकणात जातात. या काळात रेल्वेची तिकिटे हाऊसफुल होतात. खासगी बस चालवणारे तिकिटांचे दर कित्येक पटींनी वाढवतात. दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांचे हाल होतात. तरीही प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही. रेल्वेने गाड्यांचे नियोजन केले. जास्तीच्या गाड्या सोडल्या तर मोठ्या प्रमाणावर ही अडचण दूर होऊ शकते. मात्र तेही केले जात नाही. गेल्या वर्ष- दोन वर्षांपासून कोकणवासीयांसाठी राजकीय नेत्यांनी मोफत बस देणे सुरू केले. या बस कोकणात सोडून निघून येतात. येताना तुम्ही तुमचे या असे सांगितले जाते. त्यासाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या डेपोंमधून जास्ती बस मागविल्या जातात. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. त्याला फुकट काही मिळावे अशी अपेक्षा नसते. मात्र गणपतीला त्याला कोकणात जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसेल तर त्याला नाईलाजाने या फुकटच्या व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो. हे ठरवून केले जाते का..? पण विचार कोण करतो..?

त्याची हीच मजबुरी राजकारण्यांनी ओळखली. स्वाभिमानी कोकणी माणसाला मजबुरीने का असेना मोफत बससेवेतून कोकणात जाण्याची वेळ आणली गेली. सरकारने ज्या काळात, ज्या भागात जास्त बस लागतात त्या भागात व्यवस्था करून दिली तर ती कोणाला नको वाटेल. पण अशा फुकट गोष्टी देण्यामुळे आपली लोकप्रियता वाढते. लोकांशी आपला थेट कनेक्ट निर्माण होतो, ही भावना दिवसेंदिवस वाढीस लागल्यामुळे सगळेच नेते या सोप्या प्रसिद्धीच्या मागे लागले. भाजपने हजार बसची व्यवस्था केली. त्यापेक्षा जास्त बसेसची व्यवस्था शिंदे यांच्या शिवसेनेने केली. या बससाठी किती पैसे लागले असतील? हा पैसा कुठून आला? असे प्रश्न कोणाला पडत नाहीत. पडले तर कोणी विचारायच्या भानगडीत पडत नाही. मात्र ही फुकटची सवय दुधारी शस्त्रासारखी आपल्यावरच कधीतरी उलटेल असे या नेत्यांना वाटत नाही का..? पण विचार कोण करतो..?

यावर्षी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी इतर डेपोंमधील बस मोठ्या प्रमाणावर मागविण्यात आल्या. त्या बसेसनी मुंबईच्या वेगवेगळ्या विभागात राहणाऱ्या कोकणवासीयांना नेण्याचे काम केले. ज्या आगारातून या बसेस आल्या तिथल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बस उरल्या नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. एका भागातल्या लोकांना त्यांच्या गावी जायचे म्हणून दुसऱ्या भागातल्या बस काढून द्यायच्या. त्या भागातल्या लोकांना वाऱ्यावर सोडायचे हे कसले नियोजन..? त्या भागातल्या लोकांनी सणावाराच्या काळात प्रवास करायचा नाही का? अनेक ड्रायव्हर विदर्भ, मराठवाड्यातून आले. त्यांना कोकणातचे रस्ते माहीत नसल्यामुळे त्यांचे मार्ग चुकले. त्याचा फटका कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बसला. अनेकांना २४ तासांहून जास्त काळ बसमध्येच बसून राहावे लागले. अशा विषयावर चर्चा करून मार्ग काढायला हवेत... पण विचार कोण करतो..?

अनेक राजकारणी आपापल्या जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन करतात. आपल्या आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो, लाखो रुग्ण तपासले गेले असे ते कौतुकाने सांगतात. मात्र ज्या जिल्ह्यात अशा आरोग्य शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळतो त्या जिल्ह्यातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले आहे हे लख्खपणे समोर येते. आरोग्यमंत्र्यांनी कितीही चांगले काम करायचे ठरवले, तरी खालची यंत्रणा त्यांना साथ देत नसेल तर मार्ग कसा निघणार? प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयात पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत. सोयी आहेत तर डॉक्टर नाहीत. दोन्ही गोष्टी आहेत तर इमारत चांगली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालय सर्व सोयींनी, व्यवस्थेने सुसज्ज आहे असा एकही जिल्हा महाराष्ट्रात नाही. मोफत बस देणे काय किंवा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे काय... सगळे काही फुकट मिळू शकते याची सवय लावणे कधीतरी राजकारण्यांपेक्षा महाराष्ट्राला घेऊन बुडेल... पण विचार कोण करतो..?

मध्यंतरी सत्ताधारी पक्षाचे एक आमदार भेटले. त्यांनी जे सांगितले ते धक्कादायक आहे. आमच्या पक्षाच्या आमदारांना जे अपेक्षित आहे तसेच अधिकाऱ्यांनी करावे. एखाद्या आमदाराला त्याच्या मतदारसंघातील अतिक्रमण हटवायचे असेल तर ते पूर्ण ताकदीनिशी काढून टाका. एखाद्याला अतिक्रमण राहू द्यायचे असेल तर ते तसेच राहू द्या, अशा सूचना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या परिसरातील महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्या नेत्यांनी सांगितले. एकट्या मुंबईत ३६ आमदार आहेत. याचा अर्थ ३६ आमदारांच्या ३६ तऱ्हा. ते सांगतील ते नियम..! अशाने मुंबईचे वाटोळे व्हायला फार काळ लागणार नाही. मतदारसंघनिहाय जर प्रशासनाला स्वतःच्या भूमिकेत असे बदल सतत करावे लागत असतील तर या शहराची अवस्था कशी असेल याचा विचार ज्याचा त्याने करावा... पण विचार कोण करतो..? 

मेंदू गहाण ठेवून प्रत्येकानेच वागायचे ठरवले असेल, प्रत्येकाने ‘स्व’च्या पलीकडे कसलाही विचार करायचे नाही असे ठरवले असेल, माझी व्यक्तिगत लोकप्रियता कशी वाढेल या पलीकडे कोणाकडेही विचार नसेल, आधी मी मजबूत होईन, मग कोणत्या पक्षात जायचे ते मी ठरवेन ही जर प्रत्येकाची भूमिका असेल, लोकांना फुकट देण्याची सवय लावा मग आपण सांगू ते लोक ऐकतील ही वृत्ती असेल तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत..? पण विचार कोण करतो..?

टॅग्स :state transportएसटीGanesh Chaturthiगणेश चतुर्थी