शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 06:00 IST

काहीही करून शेतकरी आंदोलनाच्या भूमीत भाजपला पाय रोवायचे आहेत. दारे उघडी असल्याने भगवा रंग काँग्रेसमध्ये मिसळून विरत चालला आहे.

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पंजाबात भगव्या छावणीने दारे केवळ सताड उघडली नसून त्यांच्या बिजागऱ्याही उचकटून टाकल्या आहेत. अमित शाह यांची ‘दारे उघडी’ हे धोरण केवळ डावपेच नसून ती भाजपमधलीच एक अस्वस्थ पोकळी आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमधील अनुभवानंतर भाजपसमोर एकच पर्याय आहे :  तुम्हाला एखाद्या व्यवस्थेशी सामना करता येत नसेल, तर ती व्यवस्था चालवणारी माणसेच विकत घ्या!  परंतु, पंजाब भाजपतील बुजूर्ग मंडळी मात्र यामुळे अस्वस्थ झाली आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’ या मंत्राचा जप करत त्यांनी कित्येक वर्षे घालवली. आता त्यांना जाग आली तेव्हा ‘भाजप काँग्रेसयुक्त’ झालेला दिसतो आहे. 

सुनील जाखड यांच्या अंगात काँग्रेसच्या शतकी परंपरेची गुणसूत्रे वाहत आली; त्यांच्याकडे आता भाजपची सूत्रे गेली आहेत. रवनीत सिंग बिट्टू  फुटून आले ते थेट केंद्रीय मंत्रिमंडळातच शिरले.  ‘महाराजा’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला सगळा काँग्रेसी दरबारच कमळाच्या छावणीत आणून ठेवला. दिल्लीचा संदेश स्पष्ट आहे- ‘जिंकणे म्हणजेच निष्ठा’. खासगी कंपन्या ज्याप्रमाणे गुणवान माणसे शोधतात, तसा शोध चालला आहे. मग त्यात जीवरक्षक आधार हवा असलेले ‘आप’मधले बंडखोर खासदार असोत किंवा वाऱ्याची दिशा ओळखणारे अकाली दलातले बुजुर्ग असोत; त्यांच्यासाठी स्वागताच्या पायघड्या घालण्यात आल्या.  आसाम मॉडेलच; पण आणखी ताकद भरून पंजाबात आणलेले. गुवाहाटीत मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ पाहिले तर त्यात पूर्वाश्रमीच्या काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांची मांदियाळी दिसते. पंजाब आता त्याच रस्त्याने धावत निघाला आहे. पक्षाच्या पडत्या काळात भाजपबरोबर राहणाऱ्या बुजुर्गांना मात्र कडवट घोट गिळावे लागत आहेत. काँग्रेसच्या हाताशी त्यांनी उभे आयुष्य दावा मांडला होता; त्याच हातात आता त्यांना कमळ पाहावे लागते आणि त्यांचे आदेश ऐकावे लागतात. काहीही करून शेतकरी आंदोलनाच्या भूमीत भाजपला पाय रोवायचे आहेत. दारे उघडी आणि महत्त्वाकांक्षा पक्क्या असल्याने  मूळचा भगवा रंग आता काँग्रेसमध्ये मिसळून विरत चालला आहे. 

राहुल गांधी यांची केरळमध्ये गुगली 

‘राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास महिला मुख्यमंत्री झालेली पाहायला मला आवडेल’ असे म्हणून राहुल गांधी यांनी केरळमध्ये एक राजकीय गुगली टाकली. राहुल यांनी सोनिया गांधी इस्पितळात असताना त्यांना आलेला अनुभव निवडणूक प्रचारात कथन केला. केरळमधील एक परिचारिका आपल्या आईची किती बारकाईने काळजी घेते, याविषयी त्यांनी सांगितले. ‘केरळमधली ती परिचारिका दर तासाला येऊन माझ्या आईला तपासून जायची. अशा हजारो कुटुंबांना त्यांच्या संकटकाळात त्यांनी दिलासा दिला असेल,’ असे राहुल म्हणाले. 

अर्थात हे त्यांचे भावनिक आवाहन असले तरी त्यात राजकारणसुद्धा आहे. त्यांच्या या विधानामुळे के. सी. वेणुगोपाळ, रमेश चैन्नीथाला, व्ही. डी. सतीशन यांच्यासारखे ज्येष्ठ काँग्रेस नेते अस्वस्थ झाले. केरळ काँग्रेसमध्ये महिला नेत्यांची संख्या फारशी नाही. पक्ष लढवत असलेल्या ९५ जागांपैकी आठ किंवा नऊ ठिकाणी महिला उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राहुल यांना जे वाटते ते आणि वस्तुस्थिती यातला फरक उघड दिसतो. ज्यांची नावे घेतली जातात त्यात खासदार हिबी एडन यांचे नाव आहे. मात्र, त्या निवडणूक रिंगणात नाहीत. शनिमोल उस्मान, बिंदू कृष्णा, उमा थॉमस यांच्याही नावाची चर्चा आहे. शिवाय माजी खासदार आणि दलित नेत्या रम्या हरिदास यांचाही उल्लेख होतो. तूर्तास राहुल गांधी यांनी टाकलेला गुगली गडी बाद करील की नाही हे निकालाच्या वेळी आणि समोर येणाऱ्या आकडेवारीवर ठरेल.

अरिफ मोहम्मद ढाक्यात..?

बांगलादेशमध्ये राजदूत म्हणून ज्येष्ठ राजकीय नेत्याला पाठवण्याचा विचार मोदी सरकार गांभीर्याने करत आहे. तसे घडल्यास नवा पायंडा पडेल. उच्चायुक्त म्हणून राजकीय नेत्यांचा विचार व्हायला सुरुवात होईल. परवापर्यंत बिहारचे राज्यपाल असलेले अरिफ मोहम्मद खान यांच्या नावाची चर्चा ढाक्यासाठी सुरू आहे. राज्यपाल पदावरून त्यांना जावे लागल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले होते. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदावरून जातील हे ज्या दिवशी ठरले, त्याच दिवशी त्यांना पदावरून हटवण्यात आले. अलीकडेच राष्ट्रीय सेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर मथुरेत अरिफ मोहम्मद खान दिसले होते. एखादा बंगाली बोलणारा राजदूत निवडला जाईल अशीही चर्चा आहे. बांगलादेशमध्ये झालेले राजकीय स्थित्यंतर आणि तारिक रहमान नवे पंतप्रधान झाले असताना तिथल्या नव्या उच्चायुक्तपदाची चर्चा सुरू झाली आहे. सध्याचे तेथील राजदूत प्रणय कुमार वर्मा लवकरच निवृत्त होत आहेत.

harish.gupta@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Punjab BJP embraces Congress leaders, diluting saffron ideology: Analysis.

Web Summary : Punjab BJP welcomes Congress leaders, unsettling veterans. Assam model replicated, prioritizing victory. Rahul Gandhi's 'woman CM' remark stirs Kerala Congress. Arif Mohammad Khan eyed for Bangladesh envoy post.
टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPunjabपंजाब