शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दिल्लीश्वरांनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवलीय मोठी जबाबदारी; आता काँग्रेस रडारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 07:43 IST

सोनिया गांधी काँग्रेसबरोबरच यूपीएचेही अध्यक्षपद सोडू इच्छितात, अशी चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार दिल्लीत मोठी जबाबदारी घेऊ शकतात!

हरीष गुप्ता,नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

महाराष्ट्रातील सत्तेचा किल्ला ढासळल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आता कदाचित दिल्लीतल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाकडे नजर वळवतील, अशी शक्यता दिसते. पवार आजच्या घडीला सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. सर्व समविचारी पक्षांशी आपण समन्वय साधावा, अशी विनंती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना आधीच केलेली आहे. राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार निवडण्यात पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या दिल्लीमध्ये कुजबुज अशी आहे, की सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडू इच्छितात. त्यामुळे पवार यांचे लक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाकडे आहे.

सोनिया तेही पद सोडतील अशी त्यांना आशा आहे. काँग्रेसमधल्या अंतस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रारंभी शरद पवार यांनी आघाडीचे निमंत्रक म्हणून काम करावे, अशी सूचना सोनिया गांधींनी याआधीच केलेली आहे. पण पवारांचे मन अजूनही महाराष्ट्रात गुंतलेले असल्यामुळे त्यांनी याला तयारी दर्शविलेली नाही. तरी विरोधी पक्षांचे म्हणून जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात, त्यात ते आपली सक्रिय भूमिका मात्र बजावत असतात. 

लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पवार मुंबईऐवजी आता दिल्लीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे दिसते. मात्र, महाराष्ट्रातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या कामात लक्ष घालणे त्यांनी चालू ठेवावे, असा राज्यातल्या राष्ट्रवादी नेत्यांचा आग्रह आहे. जवळपास दोन वर्षे मागच्या आसनावर बसून पवारच मविआ सरकारचा गाडा हाकत होते. परंतु नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रातल्या काँग्रेसला मात्र पवार नेते म्हणून नको आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आता फार काही शिल्लक राहिलेले नाही. विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांच्या हातात सारी सूत्रे गेली आहेत आणि ते त्यांचा अधिकार नक्कीच गाजवतील. 

भाजपचे मिशन महाराष्ट्र२०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पक्षाचा पाया आणखीन मजबूत करण्यासाठी काँग्रेसमधला एखादा मराठा नेता गळाला लावण्याच्या प्रयत्नात सध्या भाजप आहे. काही काँग्रेस आमदार आले तरी त्यांना चालणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या १५ आमदारांचे मन वळवण्यात मात्र भाजपला काहीही रस नाही.

त्याचे कारण आता तो शिवसेनेचा अंतर्गत मामला झाला आहे. भाजपला काँग्रेस पक्ष मात्र आणखी कमकुवत करावयाचा आहे. इतर राज्यात तर  त्यांचे ते प्रयत्न चाललेच आहेत. सगळीकडचे शक्तिमान प्रादेशिक नेते आपल्याकडे ओढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातला असा नेता शोधण्याची मोहीम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना याची कल्पना आहे. विश्वास ठरावाच्या वेळी वेळेवर न पोहोचू शकलेले आणि राज्यसभेच्या वेळी क्रॉस वोटिंग  करणारे सात आमदार पक्षाने शोधून काढले. भाजपच्या रडारवर असलेला हा नेताही त्यात आहे. मोहन प्रकाश यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले आहेत. पण अंतस्थ सूत्रांच्या म्हणण्यानुसार श्रेष्ठींना हा नेता कोण हे माहीत असतानाही हे घडले, यातून धडा घेतला पाहिजे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकमतशी बोलताना म्हणाले, ‘चुका करणाऱ्या आमदारांविरुद्ध  कारवाई करण्याची वेळ आली आहे!’

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या वेळी मतदान कसे करावे, हे ठरवण्यासाठी पक्षाने इंग्लंडमधल्या काही तज्ज्ञांची मदत घेतली होती, असा गौप्यस्फोटही चव्हाण यांनी केला. पक्षाच्या प्रत्येक आमदारासाठी एक कोड देण्यात आला होता. चव्हाण म्हणतात, ‘मतदान कोणी केले नाही, हे श्रेष्ठींना या कोडमुळे कळलेले आहे!’- तसे असेल, तर मग पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नुसती चौकशी करण्यात काय अर्थ? अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, माधवराव जवळगावकर आणि शिरीष चौधरी हे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उशिरा पोहोचले होते. या आठपैकी सात जणांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी क्रॉस वोटिंग केले आहे. तीन आमदारांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी आधी घेतली होती.

जे उरले ते १९ कोण ?भाजपने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी  दिल्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २१ जूनला जाहीर केले. पक्षाने वीस उमेदवारांमधून मुर्मू यांची निवड केली, असेही त्यांनी सांगितले. मग अर्थातच राहिलेले १९ उमेदवार कोण, असा प्रश्न आता चर्चेत आहे. संसदीय मंडळाने ज्या १९ नावांचा विचार केला होता; त्यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे नाव होते. शिखांचे ते ज्येष्ठ नेते असून, पंतप्रधान मोदी एकेकाळी त्यांना भारताचे नेल्सन मंडेला म्हणत. या सर्वोच्च पदासाठी बादल यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे भाजपने २०१४ साली सूचित केले होते, याची आठवण अकाली दल नेत्यांनी भाजपला करून दिली. बादल यांच्यासंबंधी आश्वासन कोणी दिले होते? - असे विचारले असता त्यांनी एका ज्येष्ठ भाजप नेत्याचे नाव घेतले. तो नेता आज हयात नाही. 

भारताच्या माजी सरन्यायाधीशांच्या नावाचाही विचार झाला असे म्हणतात. या घटनात्मक पदासाठी आपल्याही नावाचा विचार होऊ शकतो, असे त्यांनीच एकदा सूचित केले होते. तेलंगणाच्या राज्यपाल तामिलसाई सुंदर राजन आणि तीन इतर आदिवासी महिलांच्या नावांचाही विचार झाला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे तेलंगणातले आहेत. त्यांच्याही नावाचा विचार झाला. काही राज्यपालांचीही नावे घेतली गेली. त्यात दीर्घ अनुभव असलेले कलराज मिश्रा आणि थावरचंद गेहलोत यांचाही समावेश होता.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस