शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

अमृतकाल सुरू आहे, शुभ बोला! संसदीय बोला!!

By shrimant mane | Updated: July 16, 2022 07:59 IST

पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य, महागाई, बेरोजगारी, आत्महत्या, खासगीकरण वगैरे शब्द निदान अजून तरी असंसदीय ठरविलेले नाहीत, हे काय कमी आहे का?

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांत सुरू होतेय. नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान, जोडूनच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक! स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे आणि केंद्र सरकारच्या भाषेत सांगायचे तर अमृतकाल सुरू आहे. लोकसभा व राज्यसभा सचिवालयाने कदाचित विचार केला असेल, की अशा पवित्र अमृतसमयी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशुभ भाषा नको, असंसदीय शब्दांमधील वादविवाद नकोत. सारे कसे शुभ, शुद्ध व पवित्र असायला हवे. बाकी सदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्ष प्रबळ हवा वगैरे सुभाषिते आहेतच. म्हणून सालाबादप्रमाणे दोन्ही सभागृहांच्या सचिवालयाने आक्षेपार्ह शब्दांचा एक कोश जारी केला. त्यावर विरोधकांनी आकाशपाताळ एक केले आहे. 

जुमलाजीवी, तानाशाह, फेकू, नौटंकी, विनाशपुरुष, बालबुद्धी, ढोंग, शकुनी, जयचंद, खून की खेती, कोविड स्प्रेडर, ढिंढोरा पिटना, असत्य, अहंकार, भ्रष्ट, उल्टा चोर कोतवाल को डांटे वगैरे शब्द, शब्दसमूह आणि वाक्प्रचार वापरायचे नसतील तर मग सरकारवर टीका तरी कशी करायची, असा त्यांचा सवाल आहे.  पाठोपाठ संसद परिसरात धरणे देता येणार नाहीत्, निदर्शने करता येणार नाहीत्, असे निर्देशही देण्यात आले आहेत. परिणामी, विराेधकांना नवे हत्यार मिळाले आहे. तोंडावर पट्ट्या बांधून सभागृहात प्रवेश करता येईल, परंतु, त्याच स्थितीत बसून तर राहता येणार नाही. गाेंधळ घातला जाईलच. ते पाहून असा अर्थ निघू शकेल, की असंसदीय शब्दांवर निर्बंध आहेत, असंसदीय वर्तनावर नाहीत.

लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांचे म्हणणे,  अशा शब्दांची पुस्तिका प्रकाशित करणे ही १९५९ पासूनची एक नियमित संसदीय प्रक्रिया आहे. अशा शेकडो, हजारो शब्दांचा तब्बल अकराशे पानांचा संग्रह आहे. आधी दर दहा वर्षांनी त्यात दुरुस्ती केली जायची. आता ती दरवर्षी होते. शब्द वापरण्यावर निर्बंध वगैरे नाहीत. शेवटी कामकाजात कोणता शब्द संसदीय व कोणता असंसदीय, हे ठरविण्याचे सर्वाधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना आहेत.  शब्द कोणत्या संदर्भाने वापरला यावर कामकाजातून गाळायचा की ठेवायचा हे ठरेल. तेव्हा, पीठासीन अधिकारी निष्पक्ष असतात, यावर विरोधकांचा विश्वास नाही का? 

सरकारवर अशी टीका होईल तर मग प्रोपगंडा यंत्रणा आणि सोशल मीडियावरील वॉरिअर्स, ट्रोल्स कसे मागे राहतील? तेदेखील विरोधकांवर तुटून पडले आहेत. राजस्थान व छत्तीसगड विधिमंडळानेही अशीच पुस्तिका प्रकाशित केल्याचा बचाव सुरू आहे. 

आता थोडे दुसऱ्या बाजूने विचार करा. असभ्य व असंसदीय शब्दांचा वापर करण्यावर अंकुश असेलच तर तो सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंवर असेल. केवळ विरोधकांनाच नियम लागू आहेत असे नाही. मग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना वापरलेली स्नानगृहाची उपमा किंवा शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडविताना वापरलेला आंदोलनजीवी शब्द, राहुल गांधींच्या आंखमिचौलीवर केलेल्या  खाणाखुणा असा उपमा, अलंकार, उपहास वगैरेंचा शोध लावलाच होता ना. आताही गेल्या ७५ वर्षांतील देशाच्या दुर्दशेसाठी पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत तमाम काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरताना  काहीतरी नवे शोधले जाइलच ना! तेव्हा, विरोधकांनीही प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. 

व्याकरणातील उपमा, अलंकार एकदा नजरेखालून घालावेत, वाचन वाढवावे, दरवेळी नवे रूपक शोधावे. प्रयत्न करायला काय हरकत आहे? नाहीतरी पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य, महागाई, बेरोजगारी, आत्महत्या, डॉलर, रुपया, निर्गुंतवणुकीकरण, खासगीकरण, कंपनी वगैरे शब्द निदान अजून तरी असंसदीय ठरविलेले नाहीत!

 

टॅग्स :ParliamentसंसदGovernmentसरकार