शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

फोन टॅपिंग : पोलिसी आचारसंहितेच्या पालनाचे धारिष्ट्य हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 07:18 IST

वरिष्ठांच्या चुकीच्या निर्देशांना विरोध करण्याचे धारिष्ट्य दाखविले गेले नाही, तर नेमके काय घडू शकते, हे फोन टॅपिंग प्रकरणातून समोर आले आहे.

रवींद्र राऊळ, उपवृत्तसंपादकलोकमत, मुंबई

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मोबाइल बेकायदा टॅप  केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात  नुकतेच पावणेसातशे पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या आचारसंहितेची चौकट मोडल्याने वातावरण दूषित होत पोलीस विभागाबाबत साशंकता कशी निर्माण होते, हे या घटनेतून दिसून येते. भविष्यात यापासून पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांनी बोध घ्यावा, असेच हे प्रकरण म्हणता येईल.

फोन टॅपिंगचा हा गुन्हा दाखल होण्यापासून ते आरोपपत्र दाखल होण्याच्या आतापर्यंतच्या साऱ्या टप्प्यांमध्ये रश्मी शुक्ला दोषी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. टेलिग्राफ अॅक्ट आणि आयटी अॅक्टनुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात या प्रकरणाचा ऊहापोह होऊन त्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईलच. २०१९ साली रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी खासदार संजय राऊत यांच्याऐवजी संतोष रहाटे आणि एकनाथ खडसे यांच्या नावाच्या जागी खडसे, नाईक अशी बनावट नावे वरिष्ठांकडे सादर केली होती. या दोन व्यक्ती गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे भासवून फोन टॅपिंगसाठी परवानगी मिळवण्यात आली आणि त्याआधारे संजय राऊत यांचा फोन ६७, तर एकनाथ खडसे यांचा फोन ६० दिवस टॅप करण्यात आला होता. त्याचबरोबर आणखीही काही नेत्यांचे फोन अशाच प्रकारे टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी पुण्यात दाखल आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील पोलीस दलाच्या यंत्रणेबाबतचा चुकीचा संदेश देशभरात पसरला.

या फोन टॅपिंगमुळे वादळ उठण्याचे कारण म्हणजे, राजकीय हेतूनेच हे फोन टॅप करण्यात आल्याचा मुख्य आरोप आहे. या आरोपात तथ्य असावे अशीच परिस्थितीही दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे ज्या रश्मी शुक्ला यांनी सपशेल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सादर करून वरिष्ठांकडून फोन टॅपिंगची मंजुरी मिळवली, त्या रश्मी शुक्ला यांना त्या माहितीची आवश्यकता आणि ती मिळवण्याचे अधिकार होते का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त म्हणून त्यांना हे सारे उपद्व्याप करण्याची गरज नव्हती, असे  खुद्द पोलीस अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात येत आहे. गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांना केवळ राजकीय आंदोलने, हालचाली अशा प्रकारची माहिती सरकारला सादर करावयाची एवढेच त्यांच्या कामाचे स्वरूप. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याशी जोडलेली या विभागाची यंत्रणा त्यांच्या दिमतीला होती.

जर कुणाच्या गुन्हेगारी कृत्यांची अथवा कारवायांची माहिती त्यांच्या विभागाला मिळालीच, तर ती संबंधित विभागाला अथवा त्या विभागाच्या प्रमुखाला कळवण्याचा शिरस्ता आहे. राज्य गुप्तवार्ता विभाग स्वत: कोणतीही कारवाई करीत नाही. असे असताना रश्मी शुक्ला या स्वत: संजय राऊत यांच्या फोनवरील संभाषण ऐकायच्या, अशी अन्य पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष काढण्यात आली आहे. ज्या काळात फोन टॅप करण्यात आले तो काळ राजकीय धामधुमीचा होता. त्यावरून या फोन टॅपिंगकांडामागे राजकीय कनेक्शन होते, असा निष्कर्ष काढला गेला तर आश्चर्य वाटू नये. कारण सर्वसामान्यांच्या दृष्टीने कोणतीही अभद्र युती सिद्ध होण्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नसते, तर वस्तुस्थितीजन्य घटनाच त्याला पुष्टी देत असतात.

फोन टॅपिंगची ही कृती एक गुन्हेगारी घटना असल्याचे दिसून येते. तत्कालीन मुख्य सचिव संजय कुमार यांनी लोकप्रतिनिधींच्या मोबाइल फोनचे टॅपिंग करायचे नाही, असे सक्त आदेश दिले होते. त्यामुळेच नावे बदलून फोन टॅपिंगची परवानगी मिळवण्यात आली. एका सहायक पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आली तेव्हा त्यांनी शुक्ला यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी जुमानले नाही. त्यावरून पोलीस अधिकारी कसे राजकारण्यांच्या कच्छपि लागतात, हे दिसून येते. गेल्या काही दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण अथवा गुन्हेगारीचे राजकीयीकरण म्हणा, होत गेले. त्यानंतरच्या काळात पोलीस आणि राजकीय नेते असेही एक सूत्र तयार झाले. यातून अधूनमधून भल्या अथवा बुऱ्या घटना घडत असतात आणि त्याचे तरंगही उठत असतात.

पोलीस अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या कोणत्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्या सूचनांकडे काणाडोळा करावा, याचे भान ठेवणे आवश्यक असते हेच या निमित्ताने दिसून आले आहे. केवळ गुन्हा दाखल करून आणि प्रकरण न्यायालयात पाठवून या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला, असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून आपली आचारसंहिता पाळण्याची सजगता दाखवण्याची आवश्यकता आहे. कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यासाठी सत्ताधारी पक्ष अथवा लोकप्रतिनिधींच्या विधायक सूचनांचे अवश्य पालन करताना कुठल्या सूचनेमागे अनिष्ट हेतू तर नाही ना, हेही ध्यानात घ्यायला हवे. पोलीस मॅन्युअलच्या सूचनांचे तंतोतंत पालन करताना  वरिष्ठांच्या चुकीच्या निर्देशांना विरोध करण्याचे धारिष्ट्य दाखवण्याचे दिवस आले आहेत. अन्यथा रश्मी शुक्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता टाळता येणार नाही.