शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 10:12 IST

आपल्या आयुष्यात सदैव सोबत असतो, आपल्या जखमांवर मलम लावतो तो लतादीदींचा आवाज... आज लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने...

सुनील देवधरभाजपचे राष्ट्रीय सचिव,आंध्रप्रदेश सहप्रभारीमला आठवतं, मी लहान होतो; माझे वडील रोज सकाळी रेडिओ लावत. भजन-गाणी कानावर पडत. मग चित्रहार पाहण्याची उत्सुकता असे. तेव्हापासून कधी मी त्या एका आवाजाच्या प्रेमात पडलो कळलंही नाही. त्याकाळी ऑडिओ कॅसेट मिळत, दुर्मीळ गाणी मी कुठून कुठून मिळवून ऐकत असे. मोहंमदअली रोडवर काही दर्दी लोक होते, त्यांच्याकडे जुनी गाणी मिळत. १९४५ पासूनच्या प्रत्येक दशकातली गाणी माझ्याकडे होती, त्या गाण्यातला आवाज एकच : लता मंगेशकर. 

पुढे मी विद्यानिधी हायस्कूलमध्ये नोकरीला लागलो. संगीतकार उत्तम सिंग यांचा मुलगा व मुलगी तिथं शिकत. त्यांच्या घरी जाऊन मुलांची शिकवणी घेणार का, असं मला विचारण्यात आलं. मी जाऊ लागलो, मनात एकच होतं उत्तम सिंग यांना सांगू्न कधीतरी आपल्याला लतादीदींना भेटता यावं. तशी मी त्यांना विनंतीही केली. त्याकाळी ‘‘मैने प्यार किया’’ गाजला होता. संगीतकार राम लक्ष्मण यांच्याकडे उत्तम सिंग सहायक होते. एक दिवस मला म्हणाले, सातवा आसमान सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला लतादीदी येत आहेत. या लवकर, भेटवतो!’’ 

मी लगोलग माझी स्कूटर काढून निघालो. नेमकं तेव्हाच शिकवणीची फी असलेलं पाकीट मिळालं, ते खिशात टाकलं. पाच मिनिटं ओझरती भेट झाली. त्यांना मी सांगितलं की, मी तुमचा मोठा फॅन आहे. मला तुमची दोन हजार गाणी तोंडपाठ आहेत. त्या मनापासून हसल्या. सही घ्यायची तर कागदही नव्हता, शेवटी फीच्या पाकिटावर सही घेऊन आलो.

काळ पुढे सरकला, पण लतादीदींची गाणी सोबत होती, पुढे मी ईशान्य भारतात संघाच्या कामासाठी गेलो. फार वर्षांनी त्रिपुरात भाजपाची सत्ता आली, माझ्या नावाची तेव्हा महाराष्ट्रात थोडीबहुत चर्चा होती. योगेश खडीकर, लतादीदींचे भाचे, त्यांना म्हटलं, ‘‘दीदींची भेट मिळेल का?’’- १५ मिनिटं वेळ मिळाला.  पेडर रोडवर जाता येताना जे प्रभूकुंज अत्यंत भक्तीने केवळ पाहिलं होतं, तिथे पोचलो.. बोलता बोलता म्हटलं, तुमचा आवाज नसता तर आमचं आयुष्य किती नीरस झालं असतं...‘हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..’ त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या.

गाण्यांची वैशिष्ट्यं, खास जागा यावर गप्पा निघाल्या.  तू जहां जहां चलेगा या गाण्याच्या केवळ मुखड्याला त्यांनी कशी चाल दिली होती हे दीदींनी सांगितलं. ‘‘संगम’’ सिनेमातल्या ‘‘ओ मेरे सनम’’ गाण्यातला आलाप कसा शंकर-जयकिशन यांच्याशी झालेल्या चर्चेतून स्वत:च दिला तो किस्सा सांगितला. (हे मी एकदा गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं. लतादीदींच्या गाण्याचे ते ही मोठे चाहते आहेत. तर ते  म्हणाले, ‘‘वो आलाप तो उस गाने की जान है ’’)  निघता निघता दीदींनी मला एक सुरेल भेट दिली, म्हणाल्या ‘खूप कळतं हो देवधर तुम्हाला गाण्यातलं..’ याहून मोठी पावती माझ्यासाठी काय असेल? 

आपल्या कुणाच्याही आयुष्यात अनेक चढउतार येतात, सुख- दु:ख असतात, विजय-पराजय असतात, त्या साऱ्यात सोबत असतो लतादीदींचा आवाज. त्यांचा आवाज ऐकला की मूड बदलतो. एकेक गाणं औषधासारखं काम करतं. त्यांच्या आवाजात ही जखमेवर मलम लावण्याची अद्भुत ताकद आहे, माणसाला बरं करतो तो आवाज.. मी आधी बंगाली, मग आता माझ्या कामासाठी  तेलगू शिकलो. कोणत्याही भाषेतली लतादीदींची गाणीही ऐकताना वाटतं की त्यांच्या आवाजाला भाषेच्या मर्यादाच नाहीत. तेलगू भाषेतल्या ‘संथानम’ सिनेमातली अंगाई आहे, निदूरा पोरा तम्मुडा.. त्या गाण्यात सुकून आहे.. भाषा कोणतीही असतो...आवाज फक्त लतादीदींचा असतो...आता त्या नाहीत, पेडर रोडवरुन जाताना प्रभूकुंजच्या पहिल्या मजल्याकडे लक्ष जातं. आणि त्यांचंच गाणं आठवतं, हमारे बाद अब महफ़िल मैं अफ़साने बयान होगे, बहारे हम को ढूँढेगी, ना जाने हम कहाँ होगे..

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर