शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

सोनियांच्या सूचना अनाठायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 07:52 IST

‘लॉकडाऊन’मुळे इतर उद्योगांप्रमाणेच माध्यमांचे कंबरडेही मोडलेले असताना व अनेक अडचणींना तोंड देत देशातील वृत्तपत्रे आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची शर्थ करत असताना सोनिया गांधी यांनी सरकारी जाहिराती बंद करण्याची केलेली सूचना अप्रस्तूत आहे.

कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करताना देशात एकदिलाचे व सहकार्याचे वातावरण असावे या स्तुत्य हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी केवळ आपलेच घोडे पुढे न दामटता सर्वांना सूचना करण्याचेही आवाहन केले. देशातील ५२ खासदारांसह सर्वांत मोठा विरोधी असलेल्या कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींना तत्परतेने पत्र पाठवून पाच सूचना केल्या. सर्वच पातळीवर सरकारी खर्चात काटकसर करणे, हे त्यांच्या सूचनांचे मुख्य सूत्र होते. सोनिया गांधींचा हा विचार योग्यच आहे. मात्र, त्याचा एक मार्ग म्हणून सरकारने सर्व माध्यमांना जाहिराती देणे दोन वर्षे बंद करावे, ही त्यांनी केलेली सूचना अनाठायीच नव्हे, तर धक्कादायकही आहे. या सूचनेवर होत असलेली टीका रास्तच आहे.

‘लॉकडाऊन’मुळे इतर उद्योगांप्रमाणेच माध्यमांचे कंबरडेही मोडलेले असताना व अनेक अडचणींना तोंड देत वृत्तपत्रे आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची शर्थ करत असताना सोनिया गांधी यांनी ही सूचना करावी, हे आणखीनच अप्रस्तूत आहे. कदाचित मोदींना मिळणाऱ्या प्रसिद्धीला अंकुश आणण्यासाठीही सोनियाजींनी ही सूचना केली असावी, पण याने मोदींपेक्षा वृत्तपत्रे अधिक घायाळ होणार आहेत, याचे भान त्यांना राहिले नाही. माध्यमसम्राट रुपर्ट मर्डोक यांनाही आर्थिक टंचाईमुळे आपले वृत्तपत्र बंद करावे लागले होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. सेन्सॉरशिप व वृत्तपत्रांविरुद्ध जाहिरातींचा अस्त्र म्हणून वापर याने आणीबाणीत काँग्रेसचे हात एकदा पोळलेले आहेत. पक्षाच्या गौरवशाली इतिहासातील तो काळाकुट्ट कालखंड विसरण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असताना त्याच पक्षाच्या अध्यक्षांनी आपल्या अंगावर एकदा उलटलेले कोलित देशहितासाठी केलेल्या सूचनेच्या स्वरूपात मोदींच्या हाती द्यावे हे नक्कीच गैर आहे. लोकशाहीशी बांधीलकी सांगणाºया पक्षाच्या प्रमुखाची ही सूचना वृत्तपत्रांच्या मुळावर येणारीच नव्हे, तर लोकशाहीलाही मारक आहे. कोणत्याही जिवंत, सळसळत्या लोकशाहीचा निर्भीड वृत्तपत्रे हा आत्मा असतो हे जगन्मान्य सत्य आहे. खरं तर लोकशाहीचे खरे स्वरूप वृत्तपत्रांच्या आरशातूनच प्रकट होत असते. म्हणून तर भारतीय राज्यघटनेने उघडपणे लिहिले नसले तरी वृत्तपत्रांना शासनव्यवस्थेचा चौथा स्तंभ मानले जाते. सत्ताधाऱ्यांना अडचणीच्या वेळी वृत्तपत्रे नकोशी वाटतात, पण आपल्या फायद्यासाठी वृत्तपत्रांचे गोडवे गायला हेच सत्ताधारी पुढे असतात. विरोधक असोत की सत्ताधारी, दोघांचेही वृत्तपत्रांशिवाय पान हालत नाही; परंतु वृत्तपत्रांची लोकशाहीतील भूमिका एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. वृत्तपत्रे समाजाचा ‘जागल्या’ या नात्याने सत्ताधाºयांवर अंकुश ठेवण्याचे मोलाचे कामही करतात. स्वच्छ, पारदर्शी व्यवहार व माहितीची दोन्ही बाजूंनी मोकळेपणाने देवाण-घेवाण हा लोकशाहीचा प्राण आहे. लोकशाहीची ही प्राणज्योत वृत्तपत्रांमुळेच सतत तेवत राहते. देशावर संकट येवो अथवा देशात आनंदाचे उधाण येवो वृत्तपत्रे तटस्थपणे आपले काम करतच असतात.

आताच्या कोरोना महामारीच्या बिकट काळातही वृत्तपत्रे आणि त्यांचे पत्रकार स्वत:च्या आरोग्याला धोका पत्करून हे कर्तव्य यथार्थपणे पार पाडत आहेत. हल्लीच्या अनिर्बंध समाजमाध्यमांच्या सुसाट जगात वृत्तपत्रांची अपरिहार्य गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. समाज-माध्यमांत आकंठ बुडलेली व्यक्तीही शेवटी खºया-खोट्याची शहानिशा करण्यासाठी छापील बातमीच प्रमाण मानते, यातच सगळं आले. वृत्तपत्रे हा केवळ नफ्या-तोट्याच्या हिशेबावर केला जाणारा व्यवसाय नाही. व्यापक लोकहित हे एकमेव उद्दिष्ट डोळ््यांपुढे ठेवून सामाजिक बांधीलकीने घेतलेला तो एक वसा आहे. तरीही वृत्तपत्रांतील पत्रकारांचे पगार वेतन बोर्डाच्या माध्यमांतून सरकार ठरवत असते. वृत्तपत्रे जाहिरात आणि खपाच्या गणितावर चालविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. डिजिटल मीडियाने छापील वृत्तपत्रांपुढे अस्तित्वाचे आव्हान उभे केले आहे. सरकार हा वृत्तपत्रांचा सर्वांत मोठा जाहिरातदार असतो. हे सर्व विचारात घेऊन सोनिया गांधी यांनी आपली ही सूचना फेरविचार करून मागे घ्यायला हवी.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या