शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आई-वडिलांची जबाबदारी नको, फक्त त्यांचा पैसा हवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 05:27 IST

आई-वडील नकोत; पण त्यांची संपत्ती हवी, या नव्या मनोवृत्तीला न्यायालयांनी सातत्याने चाप लावला आहे. एकाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा!

- अ‍ॅड. असीम सरोदे, संविधान विश्लेषक, कायदेतज्ज्ञआई-वडील हयात असेपर्यंत मुलांना त्यांच्या संपत्तीवर कोणताही हक्क सांगता येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील एका कुटुंबाच्या निमित्ताने नुकताच दिला. म्हातारपणी केवळ हाताशी पुंजी असल्याने (असली तरच) ज्यांची दखल घेतली जाते व संपत्ती आपल्या हातात आली की ज्यांना बेदखल होण्याची भीती असते अशा अनेक असंघटित आई-वडिलांना थेट व भक्कम आधार देणारा निर्णय न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिला आहे; पण  या न्यायनिर्णयाचे महत्त्व केवळ इतकेच  नाही तर समाजातील बदलत्या नितीमूल्यांमध्ये उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित नातेसंबंध व त्यात कमजोर होत जाणाऱ्या नात्याला माणुसकीचा हात देण्याचा संवेदनशील प्रयत्न काळानुरूप आवश्यक असलेली कृती म्हणून सुद्धा या निर्णयाकडे बघावे लागेल. 

जोपर्यंत आई-वडील हयात आहेत, तोपर्यंत मुले आई-वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात, असे वारसा हक्क कायद्यात कुठेही लिहिलेले नाही, असेही न्यायालयाने यावेळी सुनावले. न्यायालय म्हणाले, “आई जिवंत आहे, वडील जिवंत आहेत. अशा स्थितीत नात्याने मुलगा असलात तरी तुमचा वडिलांच्या मालमत्तेवर शून्य हक्क आहे. वडिलांना त्यांची मालमत्ता विकण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. ते त्यांची मालमत्ता विकू शकतात. सामायिक घर आहे म्हणून पालक जिवंत असले तरी त्या मालमत्तेवर माझाही हक्क आहे, हा  मुलाचा दावा हास्यास्पद आहे. तो त्यांचा मुलगा आहे म्हणून आई-वडिलांच्या नावे असलेले कोणतेही घर हे सामायिक घर होत नाही, तसेच आई-वडील जिवंत असेपर्यंत मुलगा मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही.”- ज्येष्ठ नागरिक व पालकांना संरक्षण देणारा कायदा २००७ साली अस्तित्वात येण्याचे कारणच कुटुंबातील  म्हाताऱ्या लोकांना अडगळीत टाकणे, त्यांची संपत्ती हडप करून त्यांना वंचितपणाचे व दुर्लक्षित जीवन जगायला बाध्य करणे थांबविणे असा होता; पण हा कायदा म्हणजे दात नसलेला वाघ ठरला. तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्यांना या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार दिल्याने या कायद्याचे असणे कुणाच्याच उपयोगाचे ठरले नाही. पैसा आणि उपयोगिता अश्या व्यवहारिक पातळीवर नातेसंबंधांना फरफटत आणून अन्यायग्रस्त करण्याच्या समाजातील नवीनतम दुर्गुणाला उत्तर म्हणून तयार झालेल्या सामाजिक कायद्यांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक व पालकांचा निर्वाह व कल्याण संदर्भातील कायदा २००७! हा कायदा कुणालाच प्रभावीपणे वापरता आला नाही, त्यामुळे पालक, ज्येष्ठ नागरिक व मुले यांच्यातील संपत्तीबाबतचे संघर्ष, वादविवाद मागील दशकात प्रकर्षाने पुढे आले आहेत. दिल्ली हायकोर्टाने एका निर्णयात स्पष्ट केले की, वडिलांच्या मालमत्तेवर पूर्णपणे मुलाचाच हक्क नसतो. कारण आई अजून जिवंत आहे आणि मालमत्तेवर मुलीचाही तेवढाच हक्क आहे. वडिलांच्या संपत्तीचा वारसदार मुलगाच असतो, या प्रस्थापित समजाला धक्का देणारा हा निर्णय होता. २००५ मध्ये कायद्यात सुधारणा झाली, त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे, असं निश्चित झालं.(नॉमिनेशन ) ही एक तात्पुरती सोय आहे. नॉमिनी हा मालक होऊ शकत नाही, असाही निर्णय कोर्टाने दिला आहे. मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू पुरुषाच्या मालमत्तांचे मरणोत्तर वाटप करताना, त्या व्यक्तीचा सावत्र मुलगा इतर कुटुंबीयांसोबत संपत्तीत वाटा मागू शकत नाही, असा एक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. बरेचदा आई-वडील नको, पण त्यांची संपत्ती हवी, अशी मनोवृत्ती असलेल्या (प्रामुख्याने) शहरी मानसिकतेला न्यायालयांच्या निर्णयांनी माणुसकीप्रधान वळण लावण्याची जबाबदार भूमिका पार पाडल्याचे दिसते. कायदा प्रवाही असावा, जिवंत माणसांच्या प्रश्नांची उकल करणारा व जीवन सुखकर करणारा असावा, ही अपेक्षा उच्च व सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश पूर्ण करीत आहेत, हे महत्त्वाचे!!asim.human@gmail.com

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट