शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी
2
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
4
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
5
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
6
एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
7
देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 
8
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
9
Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
10
बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे
11
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
12
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
13
"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
14
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
15
"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर
16
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
17
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
18
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
19
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
20
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
Daily Top 2Weekly Top 5

एकांतवास हाच आत्मावलोकन घडविणारा..

By किरण अग्रवाल | Updated: September 24, 2020 11:23 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयसोलेशन हाच सर्वोत्तम उपाय ठरत असल्याचे दिसून येत आहे.

-  किरण अग्रवालसंकटेच शिकायची संधी देतात हेच खरे, कारण आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांनी आजवर जीव तोडून एकांतवासाचे महत्त्व विशद केले असले तरी त्यावाटेने जाणारे अपवादात्मकच राहिले आहेत. आयुष्याच्या रहाटगाडग्यात जगण्यासाठीची धावपळ व कोलाहल इतका काही अंगवळणी पडून गेला आहे, की त्यापासून दूर होऊन राहणे हे अनेकांना जमतच नाही. भौतिकतेतील हे गुरफटलेपणच मनुष्याला एकांत लाभू देत नाही. त्यामुळे तो आत्मचिंतनापासूनही दूर राहतो. पण सध्याच्या जागतिक पातळीवर चिंतेच्या ठरलेल्या कोरोनाच्या महामारीपासून बचावण्यासाठी आता याच एकांतवासाकडे वळणे सर्वांसाठी गरजेचे व सुरक्षेचे खात्रीशीर साधन ठरून गेले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयसोलेशन हाच सर्वोत्तम उपाय ठरत असल्याचे दिसून येत आहे. बाधितापासून होऊ शकणारा संसर्ग रोखायचा असेल किंवा तो फैलावू नये असे वाटत असेल तर संबंधित बाधिताचे विलगीकरण करणे आवश्यक असते. असे विलगीकरण रुग्णालयातही केले जाते किंवा घरच्या घरीसुद्धा होऊ शकते. हे विलगीकरण म्हणजेच त्या रुग्णासाठीचा एकांतवास. पण याही बाबतीत तितकेसे गांभीर्य बाळगले जात नसल्याने संसर्ग बळावत चालल्याचे दिसून येत आहे. अर्थात, आपल्याकडील पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे लोकसंख्येची घनता ही इतर देशांपेक्षा अधिक आहे. आपल्याकडे कमी जागेत अधिक लोक राहतात. प्रारंभी मालेगावमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक झाला याचे कारण हेच होते. तेथे एका खोलीत आठ ते दहा लोकांचे कुटुंब वास्तव्यास असते. त्यामुळे त्यापैकी एक जरी बाधित झाला तरी त्या खोलीतील सर्वच सहकाऱ्यांना तो बाधित करण्यास पुरेसा ठरतो, ही साखळी तोडण्यासाठी विलगीकरण हाच यावर उत्तम उपाय ठरतो. तेव्हा या निमित्ताने का होईना, एकांतवासाचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले असून, यातून आत्मावलोकनाची संधी लाभून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

प्राचीन ऋषिमुनींनी एकांतवासातच घनघोर तपस्या व साधना केल्याचे असंख्य दाखले मिळतात. कसल्याही भौतिक सुखाच्या वा साधनांच्या आहारी न जाता ते आपल्या गुहेत राहिलेत, म्हणूनही त्यांना दीर्घायुष्य लाभले व ते मनावर नियंत्रण मिळवू शकले. एकटेपणात आपणच आपली सोबत करून आपल्याला जाणून घेणे व त्यातून आत्मानुभूती घडून येणे हे यात होते. अखिल मानव जातीपुढे आपल्या दिव्य ज्ञानाने प्रज्ञा, शील व करुणा या त्रिसूत्रीचे आचरण ठेवणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे कैवल्य ज्ञान याच एकांतवासाच्या मार्गाची फलश्रुती आहे. भगवान महावीर यांनीही अहिंसा, अपरिग्रह व एकांतवासाचा सिद्धांत मांडला, जो मनुष्याच्या संकटमुक्तीचा राजमार्ग ठरला. केवळ हिंदू, जैन, बौद्ध धर्मीयांतच हा एकांतवास आहे असे नाही, इस्लाममध्येही तो ऐतेकाफ म्हणून ओळखला जातो. ख्रिश्चनांमध्ये त्याचे धागेदोरे ईसा मसिहापर्यंत आढळतात. तेव्हा या एकांतवासाचे महत्त्व व आचरण असे प्राचीन काळापासून आहे, आज कोरोनामुळे त्याला वेगळ्या पद्धतीने उजाळा मिळून जात आहे.एकांतवासात मनाची एकाग्रता साधणे शक्य होते. त्यातून मनाची विचलित अवस्था टाळता येते. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करता येते. या एकाग्रतेतूनच आत्मचिंतन घडून येते. विचाराच्या, ज्ञानाच्या व जाणिवेच्याही कक्षा त्यामुळे रुंदावतात. ‘स्व’ला म्हणजे आपल्या अंतरात्म्याला ओळखण्याची प्रक्रिया यातून घडून येते. आत्मा ते परमात्मा असा आध्यत्मिक प्रवास यातून घडून येतो. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नसतो. इतरांना ओळखणे अगर जाणून घेणे हे तसे खूप सोपे असते; पण स्वत:ला ओळखणे महाअवघड. ते ज्याला जमले तो सिकंदर. आजचेही संत-माहात्मे असोत, की मोटिव्हेशनल स्पीकर्स; स्वत:ला जाणून घेण्यावरच तर भर देताना दिसून येतात. तेव्हा कोरोनाबाधितांना विलगीकरण म्हणजे एकांतवासानिमित्त तीच संधी लाभून गेली आहे. कारण, खास एकांतवास पत्करून कुणी आत्मावलोकन करण्याची शक्यता हल्ली नाही. सध्याच्या कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढायचे तर यापुढे अधिक वेगाने धावावे लागणार आहे. त्यात कुठे मिळणार एकांतवास? तेव्हा कोरोनामुळे लाभणारच असेल ही संधी तर स्वार्थात परमार्थ साधायला काय हरकत असावी?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या