शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

...म्हणून सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 07:04 IST

‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे.

वेगवान ‘मास कॉन्टॅक्ट’ हे सोशल मीडियाचे बलस्थान; पण त्यालाही प्रामाणिकता, आशय आणि विश्वासार्हतेची जोड नसेल, तर हेच शस्त्र उलटल्याशिवाय राहत नाही. ज्या वेगाने हा मीडिया शिखरावर नेतो, त्याच वेगाने तो जमीनदोस्तही करतो. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघाचे नियंत्रण असल्याचे सांगत काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी संसदीय चौकशीची मागणी केली. त्यावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधींना ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ची आठवण करून दिली. हा विषय राजकीय बनला; कारण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर या आभासी विश्वात आज देशच नव्हे, तर विश्व बुडाल्याची वस्तुस्थिती या सगळ्याच्या तळाशी आहे. ‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे. सोशल मीडियाच्या आधारे जनमत बनविणे, बदलविणे, वाकविणे या तिन्ही गोष्टी शक्य असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचा पराक्रम, नरेंद्र मोदी यांनी खंडप्राय आणि अफाट लोकसंख्येच्या भारतात सलग दोनदा विजय मिळविण्याचा चमत्कार, युरोपातून बाहेर पडण्याचा ग्रेट ब्रिटनचा ‘ब्रेक्झिट’चा निर्णय किंवा त्याआधीची २०११ची इजिप्तमधली ‘अरब स्प्रिंग’ क्रांती या ठळक घटनांमध्ये सोशल मीडियाचा वाटा निर्णायक राहिलेला आहे. गेल्या शतकात वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट ही प्रचार, प्रसार, जनसंपर्काची साधने होती.

नव्या शतकातल्या पहिल्याच दशकात या सर्व पारंपरिक साधनांना सोशल मीडिया या अजस्र आणि अतिवेगवान राक्षसाने बघता बघता कालबाह्य ठरविले. सोशल मीडियाचा वेग आणि पसारा शब्दश: विश्वव्यापी आहे. अर्थातच शस्त्र कोणतेही असो, ते चालविणा-या हातांमागचा मेंदू महत्त्वाचा असतो. सोशल मीडियाच्या बाबतीत हे विधान जास्त खरे; कारण या माध्यमाचा वरपांगी चेहरा हा अनियंत्रित आणि मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे; पण वास्तवात हे माध्यम वापरकर्त्याला ‘ग्राहक’ बनविणारे आहे. वापरकर्त्याच्या आवडीनिवडी जोखून त्याला तेच-ते खाद्य देत राहण्याची आजवरच्या कोणत्याही माध्यमाकडे नसलेली अचूकता सोशल मीडियाकडे आहे. त्यामुळेच इतर कोणत्याही पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत सोशल मीडिया अधिक पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे जनमत खेळवू शकतो. मोबाईल, पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून व्यक्तीच्या थेट मनात प्रवेश करून हवी ती विचारसरणी त्याच्या मनावर बिंबवत राहायचे, हे सोशल मीडियाचे अनोखे कौशल्य आहे. म्हणूनच राहुल गांधींचा आरोप बिनबुडाचा नाही. इतकेच की, त्यांच्या विधानात व्यावहारिक तथ्याची भली मोठी चूक आहे. फेसबुक ही बहुराष्ट्रीय आणि त्यातही पुन्हा अमेरिकी कंपनी आहे, जिला फक्त नफा-तोटा कळतो. कोणाच्या बाजूला राहण्यात व्यावसायिक हित अधिक आहे, हे फेसबुकसाठी महत्त्वाचे. आज सत्तेत भाजप असल्याने त्यांचे झुकते माप त्या बाजूला पडले असेल, तर उद्या काँग्रेस सत्ताधारी झाली तर त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची ठरेल. या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे सामान्य वापरकर्ता. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्या भारतीयांची संख्या प्रचंड म्हणजे ४० कोटी आहे.
सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणे फेसबुकसाठी महत्त्वाचे ठरते ते या संख्येमुळे. अंबानींच्या डिजिटल कंपनीत फेसबुक थेट ४४ हजार कोटी रुपये गुंतविणार असेल, तर सत्ताधाºयांशी जुळवून घेणे आणखीनच महत्त्वाचे ठरते. अन्यथा गुगल, फेसबुकसारख्या बलाढ्य कंपन्यांना चीनने जसे झटके दिले, तसेच अडथळे भारतातल्या सत्ताधाºयांनी आणले, तर चाळीस कोटी एवढे अफाट ग्राहक संपूर्ण युरोपात किंवा अमेरिकेतही मिळणे मुश्कील. महत्त्वाचा प्रश्न असा, की, राहुल म्हणतात त्याप्रमाणे फेसबुक जर भाजप नियंत्रित होणार असेल, तरी त्यांचे ४० कोटी ग्राहकसुद्धा त्यांचेच अंकित होतील का, हा आहे. असे घडणार असेल तर हे अपयश येथील राजकीय व्यवस्थेचे असेल, ज्याची मोठी जबाबदारी या देशातल्या सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाकडेच जाईल. सोशल मीडियामुळे चाळीस कोटी लोकांच्या घरात पोहोचता येईल; पण त्यांना सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही, हेही भाजप आणि काँग्रेस या दोघांनी ध्यानात घ्यावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSocial Mediaसोशल मीडिया