शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 07:04 IST

‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे.

वेगवान ‘मास कॉन्टॅक्ट’ हे सोशल मीडियाचे बलस्थान; पण त्यालाही प्रामाणिकता, आशय आणि विश्वासार्हतेची जोड नसेल, तर हेच शस्त्र उलटल्याशिवाय राहत नाही. ज्या वेगाने हा मीडिया शिखरावर नेतो, त्याच वेगाने तो जमीनदोस्तही करतो. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघाचे नियंत्रण असल्याचे सांगत काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी संसदीय चौकशीची मागणी केली. त्यावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधींना ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ची आठवण करून दिली. हा विषय राजकीय बनला; कारण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर या आभासी विश्वात आज देशच नव्हे, तर विश्व बुडाल्याची वस्तुस्थिती या सगळ्याच्या तळाशी आहे. ‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे. सोशल मीडियाच्या आधारे जनमत बनविणे, बदलविणे, वाकविणे या तिन्ही गोष्टी शक्य असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचा पराक्रम, नरेंद्र मोदी यांनी खंडप्राय आणि अफाट लोकसंख्येच्या भारतात सलग दोनदा विजय मिळविण्याचा चमत्कार, युरोपातून बाहेर पडण्याचा ग्रेट ब्रिटनचा ‘ब्रेक्झिट’चा निर्णय किंवा त्याआधीची २०११ची इजिप्तमधली ‘अरब स्प्रिंग’ क्रांती या ठळक घटनांमध्ये सोशल मीडियाचा वाटा निर्णायक राहिलेला आहे. गेल्या शतकात वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट ही प्रचार, प्रसार, जनसंपर्काची साधने होती.

नव्या शतकातल्या पहिल्याच दशकात या सर्व पारंपरिक साधनांना सोशल मीडिया या अजस्र आणि अतिवेगवान राक्षसाने बघता बघता कालबाह्य ठरविले. सोशल मीडियाचा वेग आणि पसारा शब्दश: विश्वव्यापी आहे. अर्थातच शस्त्र कोणतेही असो, ते चालविणा-या हातांमागचा मेंदू महत्त्वाचा असतो. सोशल मीडियाच्या बाबतीत हे विधान जास्त खरे; कारण या माध्यमाचा वरपांगी चेहरा हा अनियंत्रित आणि मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे; पण वास्तवात हे माध्यम वापरकर्त्याला ‘ग्राहक’ बनविणारे आहे. वापरकर्त्याच्या आवडीनिवडी जोखून त्याला तेच-ते खाद्य देत राहण्याची आजवरच्या कोणत्याही माध्यमाकडे नसलेली अचूकता सोशल मीडियाकडे आहे. त्यामुळेच इतर कोणत्याही पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत सोशल मीडिया अधिक पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे जनमत खेळवू शकतो. मोबाईल, पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून व्यक्तीच्या थेट मनात प्रवेश करून हवी ती विचारसरणी त्याच्या मनावर बिंबवत राहायचे, हे सोशल मीडियाचे अनोखे कौशल्य आहे. म्हणूनच राहुल गांधींचा आरोप बिनबुडाचा नाही. इतकेच की, त्यांच्या विधानात व्यावहारिक तथ्याची भली मोठी चूक आहे. फेसबुक ही बहुराष्ट्रीय आणि त्यातही पुन्हा अमेरिकी कंपनी आहे, जिला फक्त नफा-तोटा कळतो. कोणाच्या बाजूला राहण्यात व्यावसायिक हित अधिक आहे, हे फेसबुकसाठी महत्त्वाचे. आज सत्तेत भाजप असल्याने त्यांचे झुकते माप त्या बाजूला पडले असेल, तर उद्या काँग्रेस सत्ताधारी झाली तर त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची ठरेल. या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे सामान्य वापरकर्ता. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्या भारतीयांची संख्या प्रचंड म्हणजे ४० कोटी आहे.
सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणे फेसबुकसाठी महत्त्वाचे ठरते ते या संख्येमुळे. अंबानींच्या डिजिटल कंपनीत फेसबुक थेट ४४ हजार कोटी रुपये गुंतविणार असेल, तर सत्ताधाºयांशी जुळवून घेणे आणखीनच महत्त्वाचे ठरते. अन्यथा गुगल, फेसबुकसारख्या बलाढ्य कंपन्यांना चीनने जसे झटके दिले, तसेच अडथळे भारतातल्या सत्ताधाºयांनी आणले, तर चाळीस कोटी एवढे अफाट ग्राहक संपूर्ण युरोपात किंवा अमेरिकेतही मिळणे मुश्कील. महत्त्वाचा प्रश्न असा, की, राहुल म्हणतात त्याप्रमाणे फेसबुक जर भाजप नियंत्रित होणार असेल, तरी त्यांचे ४० कोटी ग्राहकसुद्धा त्यांचेच अंकित होतील का, हा आहे. असे घडणार असेल तर हे अपयश येथील राजकीय व्यवस्थेचे असेल, ज्याची मोठी जबाबदारी या देशातल्या सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाकडेच जाईल. सोशल मीडियामुळे चाळीस कोटी लोकांच्या घरात पोहोचता येईल; पण त्यांना सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही, हेही भाजप आणि काँग्रेस या दोघांनी ध्यानात घ्यावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSocial Mediaसोशल मीडिया