शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

...म्हणून सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 07:04 IST

‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे.

वेगवान ‘मास कॉन्टॅक्ट’ हे सोशल मीडियाचे बलस्थान; पण त्यालाही प्रामाणिकता, आशय आणि विश्वासार्हतेची जोड नसेल, तर हेच शस्त्र उलटल्याशिवाय राहत नाही. ज्या वेगाने हा मीडिया शिखरावर नेतो, त्याच वेगाने तो जमीनदोस्तही करतो. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघाचे नियंत्रण असल्याचे सांगत काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी संसदीय चौकशीची मागणी केली. त्यावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधींना ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ची आठवण करून दिली. हा विषय राजकीय बनला; कारण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर या आभासी विश्वात आज देशच नव्हे, तर विश्व बुडाल्याची वस्तुस्थिती या सगळ्याच्या तळाशी आहे. ‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे. सोशल मीडियाच्या आधारे जनमत बनविणे, बदलविणे, वाकविणे या तिन्ही गोष्टी शक्य असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचा पराक्रम, नरेंद्र मोदी यांनी खंडप्राय आणि अफाट लोकसंख्येच्या भारतात सलग दोनदा विजय मिळविण्याचा चमत्कार, युरोपातून बाहेर पडण्याचा ग्रेट ब्रिटनचा ‘ब्रेक्झिट’चा निर्णय किंवा त्याआधीची २०११ची इजिप्तमधली ‘अरब स्प्रिंग’ क्रांती या ठळक घटनांमध्ये सोशल मीडियाचा वाटा निर्णायक राहिलेला आहे. गेल्या शतकात वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट ही प्रचार, प्रसार, जनसंपर्काची साधने होती.

नव्या शतकातल्या पहिल्याच दशकात या सर्व पारंपरिक साधनांना सोशल मीडिया या अजस्र आणि अतिवेगवान राक्षसाने बघता बघता कालबाह्य ठरविले. सोशल मीडियाचा वेग आणि पसारा शब्दश: विश्वव्यापी आहे. अर्थातच शस्त्र कोणतेही असो, ते चालविणा-या हातांमागचा मेंदू महत्त्वाचा असतो. सोशल मीडियाच्या बाबतीत हे विधान जास्त खरे; कारण या माध्यमाचा वरपांगी चेहरा हा अनियंत्रित आणि मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे; पण वास्तवात हे माध्यम वापरकर्त्याला ‘ग्राहक’ बनविणारे आहे. वापरकर्त्याच्या आवडीनिवडी जोखून त्याला तेच-ते खाद्य देत राहण्याची आजवरच्या कोणत्याही माध्यमाकडे नसलेली अचूकता सोशल मीडियाकडे आहे. त्यामुळेच इतर कोणत्याही पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत सोशल मीडिया अधिक पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे जनमत खेळवू शकतो. मोबाईल, पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून व्यक्तीच्या थेट मनात प्रवेश करून हवी ती विचारसरणी त्याच्या मनावर बिंबवत राहायचे, हे सोशल मीडियाचे अनोखे कौशल्य आहे. म्हणूनच राहुल गांधींचा आरोप बिनबुडाचा नाही. इतकेच की, त्यांच्या विधानात व्यावहारिक तथ्याची भली मोठी चूक आहे. फेसबुक ही बहुराष्ट्रीय आणि त्यातही पुन्हा अमेरिकी कंपनी आहे, जिला फक्त नफा-तोटा कळतो. कोणाच्या बाजूला राहण्यात व्यावसायिक हित अधिक आहे, हे फेसबुकसाठी महत्त्वाचे. आज सत्तेत भाजप असल्याने त्यांचे झुकते माप त्या बाजूला पडले असेल, तर उद्या काँग्रेस सत्ताधारी झाली तर त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची ठरेल. या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे सामान्य वापरकर्ता. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्या भारतीयांची संख्या प्रचंड म्हणजे ४० कोटी आहे.
सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणे फेसबुकसाठी महत्त्वाचे ठरते ते या संख्येमुळे. अंबानींच्या डिजिटल कंपनीत फेसबुक थेट ४४ हजार कोटी रुपये गुंतविणार असेल, तर सत्ताधाºयांशी जुळवून घेणे आणखीनच महत्त्वाचे ठरते. अन्यथा गुगल, फेसबुकसारख्या बलाढ्य कंपन्यांना चीनने जसे झटके दिले, तसेच अडथळे भारतातल्या सत्ताधाºयांनी आणले, तर चाळीस कोटी एवढे अफाट ग्राहक संपूर्ण युरोपात किंवा अमेरिकेतही मिळणे मुश्कील. महत्त्वाचा प्रश्न असा, की, राहुल म्हणतात त्याप्रमाणे फेसबुक जर भाजप नियंत्रित होणार असेल, तरी त्यांचे ४० कोटी ग्राहकसुद्धा त्यांचेच अंकित होतील का, हा आहे. असे घडणार असेल तर हे अपयश येथील राजकीय व्यवस्थेचे असेल, ज्याची मोठी जबाबदारी या देशातल्या सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाकडेच जाईल. सोशल मीडियामुळे चाळीस कोटी लोकांच्या घरात पोहोचता येईल; पण त्यांना सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही, हेही भाजप आणि काँग्रेस या दोघांनी ध्यानात घ्यावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSocial Mediaसोशल मीडिया