शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शेतकऱ्यांना बँकांपेक्षा सावकार जवळचा वाटतो !

By गजानन दिवाण | Updated: December 14, 2018 14:06 IST

शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी मदत लागते ते किती? खरीप हातून गेला. रबीसाठी थोडीफार तयारी करायला लागणारे दोन-चार हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नाहीत.

- गजानन दिवाण

अडीअचणीच्या वेळी शेतकऱ्याला पैसे लागतात तरी किती? दोन-चार हजार रुपयांचे कर्ज बँक देत नसेल तर शेतकऱ्यांनी पैशांसाठी जायचे कोणाकडे ? भले पाच टक्के घेत असला तरी अशा अडचणीच्या वेळी मदतीला धावणारा सावकार शेतकऱ्यांना म्हणूनच जवळचा वाटतो. 

१९७२ च्या दुष्काळात खायला अन्न नव्हते. यंदा प्यायला पाणी आणि जनावरांना चारा भेटणार नाही. पावसाअभावी मराठवाड्यात खरीपाने दगा दिला. परतीचा पाऊसही न झाल्याने रबीने हात दाखविला. आता वर्षभर कसे जगायचे?  कुटुंबियांना कसे जगवायचे? प्यायचे पाणी कोठून आणायचे? जनावरांचे हाल तर विचारायलाच नको. अशा स्थितीत मराठवाड्यातील शेतकरी जगत आहे. चर्चा या दुष्काळस्थितीतून मार्ग काढण्याची व्हायला हवी. ते सोडून सरकार राम मंदिर निर्मीतीची हवा करण्यात व्यस्त आहे. 

शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी मदत लागते ते किती? खरीप हातून गेला. रबीसाठी थोडीफार तयारी करायला लागणारे दोन-चार हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नाहीत. ते पैसे वेळीच बँकांनी कर्ज म्हणून दिले तर शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जाण्याची गरज राहत नाही. प्रत्यक्षात तसे घडत नाही. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील घटनेने बँकांची मनमानी पुन्हा एकदा समोर आणली आहे.  मराठवाड्यात २० टक्क्यांपेक्षाही कमी कर्ज वाटप झालेले आहे. मग शेतकऱ्यांनी पैसा आणायचा कोठून ?

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कर्जाच्या मागणीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर उपोषणास बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे (३५) यांचा मृत्यू झाला.  त्यांनी अडीच महिन्यांपूर्वी रबीसाठी ४० हजारांच्या कर्जाची मागणी केली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना २० हजार रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात खडकूही दिला नाही. बँकेच्या या मनमानीला कंटाळून त्यांनी बँकेसमोरच उपोषणाचे हत्यार उपसले. दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. 

मरडसगाव (जि. परभणी) हे तुकाराम काळे यांचे गाव. इतर अल्पभधारक शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांचीही घरची परिस्थिती हलाखीचीच. त्यामुळेच त्यांनी पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. त्यांना मरडसगाव शिवारात दीड एकर शेती असून उदरनिर्वाहसाठी शेतीशिवाय दुसरे कुठलेही साधन नाही. राहायला पत्र्याचे घर. शेतात काम नसल्याने मोलमजुरी करुन ते पोट भरायचे. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार.

या सदस्यांचे आता काय होणार? जगण्याचे बळ त्यांना कोण देणार? काळे यांच्या कुटूंबियांना भारतीय स्टेट बँकेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांनी आता दिले आहे़ तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रस्ताव दाखल करून तो मंजूर करून घेऊन, असे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी व्ही़एल़ कोळी यांनी दिले आहे. काळे जीवंत असतानाच बँकेने ४० हजारांचे कर्ज दिले असते तर त्यांचा जीव वाचला असता आणि कुटुंबाचे छत्रही कायम राहिले असते. बँकांच्या अशा मनमानीने अनेक शेतकऱ्यांना संपविले आहे. दूर्दैव म्हणजे काही हजारांसाठी बळीराजाचे असे बळी जात आहेत. कृषीप्रधान म्हणवून घेणाऱ्या आपल्या देशात हे असे किती दिवस चालणार? अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दोन-चार हजारांची मदत करायची नाही आणि त्याने आत्महत्या केल्यावर छत्र हरवलेल्या त्याच्या कुटुंबियांना लाखाची मदत द्यायची या प्रकाराला म्हणायचे तरी काय ? 

तेलंगणाला जमले ते आपल्याला का नाही?आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणाने कर्जमाफीचा नेहमीचा मार्ग सोडून रयतू-बंधू योजना आणली. या योजनेतून शेतकऱ्यांना बी-बियाणासाठी खरीप आणि रबी मोसमाच्या अगोदर एकरी ४ हजार रुपये दिले जातात. अगदी बी भरणाच्या वेळेस दिली जाणारी ही मदत शेतकऱ्यासाठी लाखमोलाची ठरते. यासाठी त्या  राज्याने केवळ १२ हजार कोटी रुपयांची अल्प तरतूद केली आहे. छोट्याशा तेलंगणाला जमले ते आमच्या महाराष्ट्राला का जमत नाही ?

टॅग्स :agricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याfundsनिधीbankबँक