शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:37 IST

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले, प्रत्येकी एक यकृत पुणे व मुंबईला पाठविण्यात आले, तर एक हृदय मुंबईला पाठविण्यात आले. शिवाय नागपूर व अमरावतीत प्रत्येकी दोन ‘कार्निया’चे (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) यशस्वीरीत्या रोपण करण्यात आले. दोन ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या अतुलनीय औदार्यामुळे एकूण ११ रुग्णांना नवे जीवन लाभले वा त्यांच्या जीवनात प्रकाश उजळला! नागपुरात २०१३ पासून आजवर एकूण २६ अवयव रोपण पार पडले आहेत. शिवाय उपराजधानीने या वर्षात आजवर मुंबई, पुणे व दिल्लीतील गरजू रुग्णांसाठी एकूण चार हृदय व अकरा यकृत पुरविले आहेत. नागपूरपाठोपाठ आता अमरावती शहरानेही अवयव दानाच्या मानवतावादी कार्यात पुढाकार घेतला आहे. गत काही वर्षांपासून भारतात अवयवदानाने गती घेतली असली, तरी जागतिक आकडेवारीशी तुलना केल्यास आपण अजूनही जगाच्या बरेच मागे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दर तासाला सरासरी १४.५ अवयवांचे रोपण होते. भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी दोन लाख रुग्णांना यकृताची, तर पन्नास हजार रुग्णांना हृदयाची गरज असते. शिवाय दीड लाख रुग्णांना मूत्रपिंडाची प्रतीक्षा असते; मात्र त्यापैकी जेमतेम पाच हजार भाग्यशाली रुग्णांनाच ते सध्याच्या घडीला लाभू शकते. या क्षेत्रात आपल्याला अजून किती मोठी मजल मारायची आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येते. इथे नील आर्मस्ट्राँग या चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाºया अंतराळवीराचे बोल आठवतात. चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता, ‘‘मनुष्यासाठी हे खूप छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.’’ आज अवयवदानाच्या क्षेत्रातील आपले पाऊल छोटे भासत असले, तरी उद्या त्या बळावरच आपण खूप मोठी झेप घेऊ शकणार आहोत. भारतातील बहुसंख्य लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात दानाचे अपरंपार महत्त्व आहे. तेव्हा अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती घडवून आणल्यास, त्याचे महत्त्व आणि गरज नागरिकांच्या मनावर बिंबविल्यास, सध्या ज्या रुग्णांना अवयव उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागतो, त्यांना नवे आयुष्य लाभू शकेल!

टॅग्स :Organ donationअवयव दानIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार