शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:37 IST

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले, प्रत्येकी एक यकृत पुणे व मुंबईला पाठविण्यात आले, तर एक हृदय मुंबईला पाठविण्यात आले. शिवाय नागपूर व अमरावतीत प्रत्येकी दोन ‘कार्निया’चे (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) यशस्वीरीत्या रोपण करण्यात आले. दोन ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या अतुलनीय औदार्यामुळे एकूण ११ रुग्णांना नवे जीवन लाभले वा त्यांच्या जीवनात प्रकाश उजळला! नागपुरात २०१३ पासून आजवर एकूण २६ अवयव रोपण पार पडले आहेत. शिवाय उपराजधानीने या वर्षात आजवर मुंबई, पुणे व दिल्लीतील गरजू रुग्णांसाठी एकूण चार हृदय व अकरा यकृत पुरविले आहेत. नागपूरपाठोपाठ आता अमरावती शहरानेही अवयव दानाच्या मानवतावादी कार्यात पुढाकार घेतला आहे. गत काही वर्षांपासून भारतात अवयवदानाने गती घेतली असली, तरी जागतिक आकडेवारीशी तुलना केल्यास आपण अजूनही जगाच्या बरेच मागे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दर तासाला सरासरी १४.५ अवयवांचे रोपण होते. भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी दोन लाख रुग्णांना यकृताची, तर पन्नास हजार रुग्णांना हृदयाची गरज असते. शिवाय दीड लाख रुग्णांना मूत्रपिंडाची प्रतीक्षा असते; मात्र त्यापैकी जेमतेम पाच हजार भाग्यशाली रुग्णांनाच ते सध्याच्या घडीला लाभू शकते. या क्षेत्रात आपल्याला अजून किती मोठी मजल मारायची आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येते. इथे नील आर्मस्ट्राँग या चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाºया अंतराळवीराचे बोल आठवतात. चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता, ‘‘मनुष्यासाठी हे खूप छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.’’ आज अवयवदानाच्या क्षेत्रातील आपले पाऊल छोटे भासत असले, तरी उद्या त्या बळावरच आपण खूप मोठी झेप घेऊ शकणार आहोत. भारतातील बहुसंख्य लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात दानाचे अपरंपार महत्त्व आहे. तेव्हा अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती घडवून आणल्यास, त्याचे महत्त्व आणि गरज नागरिकांच्या मनावर बिंबविल्यास, सध्या ज्या रुग्णांना अवयव उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागतो, त्यांना नवे आयुष्य लाभू शकेल!

टॅग्स :Organ donationअवयव दानIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार