शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:37 IST

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले, प्रत्येकी एक यकृत पुणे व मुंबईला पाठविण्यात आले, तर एक हृदय मुंबईला पाठविण्यात आले. शिवाय नागपूर व अमरावतीत प्रत्येकी दोन ‘कार्निया’चे (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) यशस्वीरीत्या रोपण करण्यात आले. दोन ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या अतुलनीय औदार्यामुळे एकूण ११ रुग्णांना नवे जीवन लाभले वा त्यांच्या जीवनात प्रकाश उजळला! नागपुरात २०१३ पासून आजवर एकूण २६ अवयव रोपण पार पडले आहेत. शिवाय उपराजधानीने या वर्षात आजवर मुंबई, पुणे व दिल्लीतील गरजू रुग्णांसाठी एकूण चार हृदय व अकरा यकृत पुरविले आहेत. नागपूरपाठोपाठ आता अमरावती शहरानेही अवयव दानाच्या मानवतावादी कार्यात पुढाकार घेतला आहे. गत काही वर्षांपासून भारतात अवयवदानाने गती घेतली असली, तरी जागतिक आकडेवारीशी तुलना केल्यास आपण अजूनही जगाच्या बरेच मागे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दर तासाला सरासरी १४.५ अवयवांचे रोपण होते. भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी दोन लाख रुग्णांना यकृताची, तर पन्नास हजार रुग्णांना हृदयाची गरज असते. शिवाय दीड लाख रुग्णांना मूत्रपिंडाची प्रतीक्षा असते; मात्र त्यापैकी जेमतेम पाच हजार भाग्यशाली रुग्णांनाच ते सध्याच्या घडीला लाभू शकते. या क्षेत्रात आपल्याला अजून किती मोठी मजल मारायची आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येते. इथे नील आर्मस्ट्राँग या चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाºया अंतराळवीराचे बोल आठवतात. चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता, ‘‘मनुष्यासाठी हे खूप छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.’’ आज अवयवदानाच्या क्षेत्रातील आपले पाऊल छोटे भासत असले, तरी उद्या त्या बळावरच आपण खूप मोठी झेप घेऊ शकणार आहोत. भारतातील बहुसंख्य लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात दानाचे अपरंपार महत्त्व आहे. तेव्हा अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती घडवून आणल्यास, त्याचे महत्त्व आणि गरज नागरिकांच्या मनावर बिंबविल्यास, सध्या ज्या रुग्णांना अवयव उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागतो, त्यांना नवे आयुष्य लाभू शकेल!

टॅग्स :Organ donationअवयव दानIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार