शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:37 IST

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले, प्रत्येकी एक यकृत पुणे व मुंबईला पाठविण्यात आले, तर एक हृदय मुंबईला पाठविण्यात आले. शिवाय नागपूर व अमरावतीत प्रत्येकी दोन ‘कार्निया’चे (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) यशस्वीरीत्या रोपण करण्यात आले. दोन ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या अतुलनीय औदार्यामुळे एकूण ११ रुग्णांना नवे जीवन लाभले वा त्यांच्या जीवनात प्रकाश उजळला! नागपुरात २०१३ पासून आजवर एकूण २६ अवयव रोपण पार पडले आहेत. शिवाय उपराजधानीने या वर्षात आजवर मुंबई, पुणे व दिल्लीतील गरजू रुग्णांसाठी एकूण चार हृदय व अकरा यकृत पुरविले आहेत. नागपूरपाठोपाठ आता अमरावती शहरानेही अवयव दानाच्या मानवतावादी कार्यात पुढाकार घेतला आहे. गत काही वर्षांपासून भारतात अवयवदानाने गती घेतली असली, तरी जागतिक आकडेवारीशी तुलना केल्यास आपण अजूनही जगाच्या बरेच मागे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दर तासाला सरासरी १४.५ अवयवांचे रोपण होते. भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी दोन लाख रुग्णांना यकृताची, तर पन्नास हजार रुग्णांना हृदयाची गरज असते. शिवाय दीड लाख रुग्णांना मूत्रपिंडाची प्रतीक्षा असते; मात्र त्यापैकी जेमतेम पाच हजार भाग्यशाली रुग्णांनाच ते सध्याच्या घडीला लाभू शकते. या क्षेत्रात आपल्याला अजून किती मोठी मजल मारायची आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येते. इथे नील आर्मस्ट्राँग या चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाºया अंतराळवीराचे बोल आठवतात. चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता, ‘‘मनुष्यासाठी हे खूप छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.’’ आज अवयवदानाच्या क्षेत्रातील आपले पाऊल छोटे भासत असले, तरी उद्या त्या बळावरच आपण खूप मोठी झेप घेऊ शकणार आहोत. भारतातील बहुसंख्य लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात दानाचे अपरंपार महत्त्व आहे. तेव्हा अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती घडवून आणल्यास, त्याचे महत्त्व आणि गरज नागरिकांच्या मनावर बिंबविल्यास, सध्या ज्या रुग्णांना अवयव उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागतो, त्यांना नवे आयुष्य लाभू शकेल!

टॅग्स :Organ donationअवयव दानIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार