शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

लहान तोंडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:39 IST

सत्तेतले लहानसेही पद मिळाले की काहींना ज्ञानाची नसलेली शिंगे फुटू लागतात. मग अशी माणसे आपला आवाका लक्षात न घेता भल्याभल्यांनाच नव्हे तर मोठमोठ्या क्षेत्रांनाही उपदेशाचे धडे ऐकवू लागतात. काही वर्षांपूर्वी असेच एका नव्या पदाधिकाºयाने आपले वय व क्षमता विसरून ‘डॉ. मनमोहनसिंगांना अर्थशास्त्र कळत नाही’ असे ‘ज्ञानोद्गार’ काढले होते.

सत्तेतले लहानसेही पद मिळाले की काहींना ज्ञानाची नसलेली शिंगे फुटू लागतात. मग अशी माणसे आपला आवाका लक्षात न घेता भल्याभल्यांनाच नव्हे तर मोठमोठ्या क्षेत्रांनाही उपदेशाचे धडे ऐकवू लागतात. काही वर्षांपूर्वी असेच एका नव्या पदाधिकाºयाने आपले वय व क्षमता विसरून ‘डॉ. मनमोहनसिंगांना अर्थशास्त्र कळत नाही’ असे ‘ज्ञानोद्गार’ काढले होते. त्यावेळी याच स्तंभातून त्याला त्याचा व डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थक्षेत्रातील अधिकार समजावून सांगण्याचे कटू कार्य आम्हाला करावे लागले होते. आता पुन्हा तीच वेळ भाजपच्या प्रथमच लोकसभेत प्रवेशकर्त्या झालेल्या पूनम महाजन या खासदार महिलेने आमच्यासकट देशातील अनेक संपादकांवर आणली आहे. आपले वडील व भाजपचे एकेकाळचे कमालीचे वजनदार नेते स्व. प्रमोद महाजन यांचे नाव वाजपेयी आणि अडवाणी यांच्यानंतर त्यांच्या पक्षात घेतले जात असतानाही त्यांनी जो अगोचरपणा केला नाही तो त्यांच्या या सुविद्य कन्येने आता केला आहे. मत व अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य देणारे या देशात साहित्यिकांनी व विचारवंतांनी कोणत्या विषयावर लिहावे आणि कशावर लिहू नये हे सांगण्याचे न पेलणारे औद्धत्य त्यांनी केले आहे. बडोद्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना संमेलनाध्यक्षांनी आजच्या घटकेला होत असलेल्या मतस्वातंत्र्याच्या शासकीय व राजकीय गळचेपीबाबत मत व्यक्त करून ‘राजा’ला काही खडे बोल सुनावले. लेखकांनी काय लिहावे, कवींनी कोणत्या रचना कराव्या, चित्रकारांनी कशी चित्रे काढावी, संगीतकारांनी कसे संगीत उभे करावे आणि गायकांनी कसे गावे हे ठरविणे हा त्यांचा घटनादत्तच नव्हे तर जन्मसिद्ध अधिकार आहे. विचारांना राजकारणाचे क्षेत्र वर्ज्य नाही. किंबहुना सारा विचारच राजकारणापासून सुरू झाला अशी आताची स्थिती आहे. काही समाजशास्त्रज्ञांच्या मते ‘पाळण्यापासून समाधीपर्यंत आणि त्याहीपुढे’ राजकारणाचे मानवी जीवनावरचे नियंत्रण कायम असते. साहित्य व संस्कृतीचे क्षेत्रही तेच आणि तेवढेच व्यापक आहे. त्यामुळे ‘तुम्ही आमच्या क्षेत्राताला शिवू नका’ असे एखादा राजकारणी माणूस वा स्त्री साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील अभ्यासकांना व विचारवंतांना म्हणत असेल तर ते त्याच्या किंवा तिच्या अजून राहिलेल्या कच्चेपणाचे लक्षण समजले पाहिजे. लहान तोंडी मोठा घास घेता येतो पण गिळता येत नाही. राजकारणातली माणसे साहित्याच्या व्यासपीठावर जातात. त्यात काँग्रेसपासून भाजपपर्यंतची सारी पुढारी माणसे समाविष्ट असते. प्रसंगी ही माणसे त्या व्यासपीठावर नको तसे बोलतही असतात. त्यांनी तेथे जाऊ नये असे म्हणण्याचा प्रयत्न काही काळापूर्वी झाला. पण तो दोन्ही पक्षी फारसा मनावर घेतला गेला नाही. राजकारणानी केलेल्या गळचेपीविरुद्ध लिहून तुरुंगवासापासून मृत्युदंडापर्यंतच्या सगळ्या शिक्षा ओढवून घेणारे थोर साहित्यिक जगात झाले. समाजकारणातील राजकीय धुरीणांचे रोष ओढवून मृत्यू पत्करणारी माणसे महाराष्ट्रात व कर्नाटकात अलीकडेच झाली. रशिया, चीन, मंगोलिया, अरब देश, द. आफ्रिकेतील राष्टÑे, अनेक हुकूमशाह्या व लष्करशाह्या यातील किती साहित्यिकांनी व कवींनी मानवी जीवनाच्या राजकीय गळचेपीविरुद्ध लिहून स्वत:ला जाचात टाकले याचा इतिहास व त्या इतिहासाने विस्तारलेले राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याचे क्षेत्र हे नव्या राजकारण्यांनी अभ्यासण्याजोगे आहे. या गळचेपीविरुद्ध लढूनच या देशाने स्वातंत्र्य मिळविले. या गळचेपीविरुद्ध लढा उभारूनच १९७५ ची आणीबाणी देशातून हटविली गेली. या लढ्यात राजकीय नेत्यांएवढेच साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातील लोकांचे योगदानही महनीय आहे. हे लक्षात न घेता उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे कुणी करीत असेल तर तो वा ती आपल्या प्रतिमेएवढी आपल्या पक्षाची व सरकारचीही प्रतिमा डागाळत असते हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे. राजकारणात येऊन जरड झालेल्यांना हे सांगण्यात फारसा अर्थ नाही. मात्र त्यातील नवोदितांनी तरी हे वास्तव ध्यानात घेतलेच पाहिजे. अधिकार नसताना केलेले वाचाळपण हे नुसते हास्यास्पदच नाही तर तिरस्करणीय होते हेही त्यांनी समजून घेतले पाहिजे.

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनBJPभाजपा