शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

पक्ष गारठला

By admin | Updated: January 19, 2015 22:47 IST

काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे.

काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सपशेल नाकारल्यानंतरही काँग्रेस पक्ष यातून कुठलाही धडा घ्यायला तयार नाही़ काँग्रेससाठी पराभव नवीन नाही़ सव्वाशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या या पक्षाने यापूर्वीही अनेक पराभव बघितले आणि पचवलेही आहेत़ अशा संकटांमधून पुन्हा उभ्या राहिलेल्या काँग्रेसने नंतरच्या काळात देशाला खंबीर नेतृत्वही दिले आहे़ यावेळची परिस्थिती मात्र वेगळी आहे़ काँग्रेसशी एकनिष्ठ असलेला पारंपरिक मतदार या पक्षापासून आता दुरावलेला आहे. दलित-मुस्लीम मतदार नव्या पर्यायाच्या शोधात आहे. राहुल गांधींना खूप तळमळ आहे, पण नेमके काय करावे, याच संभ्रमावस्थेत ते सतत चाचपडत असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची ही दयनीय अवस्था या पक्षाचा कार्यकर्ता प्रथमच हताशपणे पाहात आहे. विदर्भात तर काँग्रेस नामशेष झाली की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत आहे़ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या असंतोषाची दखल घ्यायला पक्षनेतृत्वाला सवड नाही आणि प्रदेशाध्यक्ष नट्टा-पट्ट्यातून बाहेर पडायला तयार नाहीत़ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या परवाच्या चंद्रपूरच्या सभेत एका महिला कार्यकर्त्याने माणिकरावांना सुनावलेले खडे बोल हा कार्यकर्त्यांच्या मनातील प्रातिनिधिक संताप आहे़ चंद्रपूरच्या सभेप्रमाणेच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने माणिकरावांनी नंतरची यवतमाळातील सभा वेळेवर रद्द केली. कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्याचे बळ देण्याचा हा काळ आहे आणि अशावेळी प्रदेशाध्यक्ष त्याला पाठ दाखवून पळ काढतात? खरे तर माणिकरावांना पदावर राहण्याचा कवडीचाही नैतिक अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या तिकिटासाठी राजीनाम्याची माणिकरावांनी धमकी दिली त्याच दिवशी त्यांनी तो अधिकार गमावला होता.देशात, राज्यात सत्ता गेल्यानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना विश्वासाने सोबत घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. पण तसे होत नाही. स्वत:च्या शिक्षण संस्था, सहकारी सोसायट्यांच्या पलीकडे विचार न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या कुटुंबीयांव्यतिरिक्त सामान्यांचे नेतृत्व पुढे येऊ दिले नाही़ सामान्य कार्यकर्त्यांतून नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी राहुल गांधींनी युवक काँग्रेसच्या निवडणुकांची नवी रचना अमलात आणली. पण शेवटी काय साध्य झाले? युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कोण निवडून आले. अकोल्याचे महेश गणगणे (माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे सुपुत्र), चंद्रपूरचे राहुल पुगलिया (माजी खासदार नरेश पुगलिया यांचे सुपुत्र), नागपूरचे कुणाल राऊत (माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र) राहुल गांधींना अपेक्षित असलेले नेतृत्व या निवडणुकीतून समोर आलेच नाही. काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनात पक्षाने काढलेल्या मोर्चात त्याला जावेसे वाटले नाही, शेवटी भाड्याने माणसे आणावी लागली, त्यातही नेत्यांचा कद्रूपणा एवढा की भाड्याने कार्यकर्ते जमवतानाही त्यांनी कंजुषी केली. कशीबशी पाच हजार माणसे आलीत. वर्धा जिल्ह्यात तर या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही़ अकोला, वाशिम जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही़. नागपुरात विलास मुत्तेमवारांच्या वैयक्तिक अहंकारापोटी काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. संकटात सापडलेल्या काँग्रेसला विदर्भाने नेहमीच बळ दिले आहे. या पक्षाने विदर्भातील काँग्रेस नेत्यांनाही खूप काही दिले आहे. शिक्षण संस्था, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, कंत्राटदारी, बायको-मुलांना सरपंचापासून आमदारकी इत्यादी इत्यादी...पण आज पक्षाला काही देण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस नेत्यांची अवस्था समुद्रात भरकटलेल्या जहाजावरच्या उंदरांसारखी झाली आहे.- गजानन जानभोर