शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

सत्तेपेक्षा पाण्यासाठी एकजूट दाखवावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 07:06 IST

या आठवड्याचा माझा हा स्तंभ संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर असेल, असे तुम्हाला वाटले असेल. राज्यातील या सत्तासंघर्षात जबाबदार राजकीय पक्षांत ज्या प्रकारे एकमेकांना पाणी पाजण्याची स्पर्धा लागली आहे त्याचा विचार करून व या पक्षांच्या वर्तनाने मी खूपच व्यथित झालो आहे.

- विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)या आठवड्याचा माझा हा स्तंभ संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर असेल, असे तुम्हाला वाटले असेल. राज्यातील या सत्तासंघर्षात जबाबदार राजकीय पक्षांत ज्या प्रकारे एकमेकांना पाणी पाजण्याची स्पर्धा लागली आहे त्याचा विचार करून व या पक्षांच्या वर्तनाने मी खूपच व्यथित झालो आहे. अखेर हे पक्ष परस्परांना पाणी पाजणे कुठवर सुरू ठेवणार? निवडणुकीत जनतेने आपले कर्तव्य बजावले व सरकार स्थापन होईल, अशी अपेक्षा ठेवली. परंतु सत्तेच्या स्वार्थापुढे जनतेची सर्व गणिते फोल ठरली. राजकीय पक्षांचे एकमेकांना पाणी पाजणे सुरूच आहे.मग मी विचार केला की, पिण्याच्या पाण्याहून अधिक गंभीर समस्या कोणती असू शकते? त्यामुळे याच समस्येवर लिहावे, झोपी गेलेल्या शासनव्यवस्थेस जागे करावे. आपल्याकडे पाण्याला अमृत मानले जाते. पाणी अंतिम क्षणापर्यंतचा साथी असते. पाणी हा जीवनाचा आधार आहे. पाण्याविना सर्व व्यर्थ, असेही म्हटले जाते. असे असूनही या पाण्याची एवढी दुर्दशा का? आपले नदी, नाले व तलाव एवढे घाणेरडे का? जगातील अनेक देशांमध्ये तुम्ही नळाचे पाणी थेट पिऊ शकता. कारण तेथे सार्वजनिक नळाला येणारे पाणी स्वच्छ व शुद्ध असते़ आपल्याकडे नळाला येणारे पाणीही अशुद्ध असते. पैसे भरून लोक असे पाणी पितात व नानाविध आजारांनी आजारी पडतात. मग औषधोपचारांवरील खर्च वेगळाच. बहुतांश आजार दूषित पाण्याने होतात, हे सर्वज्ञात आहे. दूषित पाण्यामुळे देशात दरवर्षी सरासरी दोन लाख लोक प्राण गमावतात, हे जाणून तुम्ही नक्कीच दु:खी व्हाल. मृतांचा आकडा दोन लाख असेल तर आजारी पडणाऱ्यांची संख्या याहून किती जास्त असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. समस्या एवढी गंभीर असूनही सरकार त्याविषयी किती गंभीर आहे, असा प्रश्नही तुम्ही विचारू शकता.देशातील महानगरे व १७ राज्यांच्या राजधान्यांमध्ये नळाने पुरविल्या जाणाºया पाण्याची तपासणी करून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जो अहवाल प्रसिद्ध केला त्यातून समोर आलेली परिस्थिती भयावह आहे. ज्या २१ शहरांमधील पाण्याची चाचणी झाली त्यात फक्त मुंबईचे पाणी ‘भारतीय स्टँडर्ड ब्युरो’च्या कसोटीवर उतरणारे होते. शुद्धतेचे आंतरराष्ट्रीय निकष लावले तर मुंबईचे पाणीही त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होईल. भारतीय स्टँडर्ड ब्युरोने पिण्याच्या पाण्यासाठी जे ११ निकष ठरविले आहेत त्यापैकी १० निकषांत १७ राज्यांच्या राजधान्यांमधील पाणी नापास झाले! दिल्लीचे पाणी तर सर्वात जास्त दूषित असल्याचे दिसून आले. इतर शहरांचे पाणी त्या तुलनेत जरा कमी दूषित एवढाच काय तो फरक. पाण्यासाठी ठरविलेल्या या निकषांचे पालन करणे बंधनकारक नसल्याने नळाद्वारे दूषित पाणी पुरविले जात असूनही त्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई होताना दिसत नाही. अहवाल प्रसिद्ध करताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीच ही गोष्ट सांगितली आहे. प्रश्न एवढा गंभीर असूनही त्याकडे कोणी लक्ष का देत नाही? पाणीपट्टी आकारून सरकारी संस्थाच दूषित पाणी पुरवीत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पण तसा कायदाच नसेल तर शिक्षा तरी कशी होणार? शासन व्यवस्थेच्या बेपर्वाईचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतात फक्त ३० टक्के लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होते, असे आकडेवारी सांगते.वास्तविक लोक नाइलाज म्हणून दूषित पाणी पितात. आंतरराष्ट्रीय मापदंड तर दूरच राहोत, पण भारतीय मापदंड लावले तरी ग्रामीण भागात दररोज दरडोई किमान ४० लीटर व शहरी भागांत किमान ६० लीटर पाणी उपलब्ध व्हायला हवे. एवढे पाणी पालिकांकडून पुरविले जात नाही. त्यामुळे जेथे कुठे मिळेल ते पाणी लोक नाइलाजाने वापरतात. ज्यांना शक्य आहे व परवडते ते पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्रांचा उपयोग करतात. पण गरिबांनी काय करावे? त्यांना तर दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही.सन २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात निती आयोगाने स्पष्टपणे लिहिले होते की, देशातील सुमारे ६० कोटी लोक गंभीर जलसंकटाला तोंड देत आहेत. अहवालानुसार सध्या जेवढे पाणी पुरविले जाते त्याच्या दुप्पट पाण्याची गरज सन २०३० पर्यंत असेल. एवढे पाणी पुरविता आले नाही तर त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होईल. एवढेच नव्हे तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातही (जीडीपी) सहा टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. आपले ७० टक्के जलस्रोत दूषित झालेले आहेत. म्हणूनच जगाच्या पाणी गुणवत्ता निर्देशांकात १२२ देशांत भारताचा क्रमांक १२० वा आहे. पाण्याविषयी दीर्घकाळ उदासीनता दाखविल्याचा हा परिणाम आहे. अजूनही सर्व राजकीय पक्षांनी पाण्याच्या मुद्द्यावर एक व्हावे. सत्तेसाठी एकमेकांना पाणी पाजणे बस्स झाले. आता सामान्य माणसाला पुरेसे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या पक्षांनी एवढ्याच हिरिरीने लढावे. वेळ फार थोडा आहे. वेळीच सावध झालो नाही, तर वेळ निघून गेलेली असेल. सत्ता कोणाचीही असली तरी देशातील नागरिकांना पुरेसे व शुद्ध पाणी पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019