शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

इतिहासही दयाळू नसावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 08:25 IST

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश शोकव्याकुळ झालेला असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वादाला तोंड फुटणे क्लेशकारक आहे...

वर्तमानाची असहिष्णुता अनुभवलेल्या डॉ. मनमोहन सिंगांनी ‘हिस्ट्री विल बी काइंडर टू मी’, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, इतिहासही एवढा दयाळू नसावा! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश शोकव्याकुळ झालेला असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वादाला तोंड फुटणे क्लेशकारक आहे. ज्या नेत्याने भारताला अवघड वळणावर सावरले, त्या नेत्याच्या निधनानंतर असे वाद झडणे अपेक्षित तर नाहीच, पण भारताच्या परंपरेला ते शोभणारे नाही. 

माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचे निधन झाले, तेव्हा सरकार काँग्रेसचे होते. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खास जागा दिली गेली आणि तिथेच त्यांचे स्मारकही उभे राहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर शिवाजी पार्कात त्यांचे अंत्यसंस्कार झाले, तेव्हाही बाळासाहेबांच्या विरोधातले सरकार राज्यात आणि केंद्रातही होते. ही आपली परंपरा असताना अशा प्रकारचा वाद होणेच अपेक्षित नव्हते. तरीही ते झाले. अखेर सरकारने भविष्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकार ते करेलही. मात्र, हा वाद अनाठायी आहे. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर परवा रात्री दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार तासांनंतर राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले- निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून केंद्र सरकारने त्यांचा अपमान केला आहे. ‘मनमोहन यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी हजार यार्ड जमीनही भाजप देऊ शकत नाही’, असे अरविंद केजरीवालही म्हणाले. २७ डिसेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराची जागा मागितली की जिथे स्मारक बांधता येईल. प्रियांका गांधी यांनी डॉ. सिंग यांचे स्मारक शक्तिस्थळ किंवा वीरभूमीजवळ बांधण्याची सूचना केली होती. डॉ. मनमोहन सिंग हे पंडित नेहरूंनंतरचे अत्यंत महत्त्वाचे पंतप्रधान. त्यामुळे इंदिरा गांधींच्या स्मारकाजवळ अथवा राजीव गांधींच्या स्मारकाजवळ त्यांची समाधी असावी, असे वाटणे अगदीच स्वाभाविक. 

जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलातही भारताला आपला सूर सापडला, तो डॉ. मनमोहनसिंग यांच्यामुळे. जगाला हेवा वाटावा, अशा या स्कॉलर नेत्याला त्याच्या बदल्यात तेव्हा काय मिळाले? हेटाळणी, अवमान आणि उपहास. अशा या उत्तुंग नेत्याला मृत्यूनंतरही अशा अवहेलनेला तोंंड द्यावे लावे लागणे अधिक व्याकूळ करणारे आहे. यावर भाजपचा मुद्दा वेगळाच आहे. ‘काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांना कधीच आदर दिला नाही. त्यांच्या हातात सत्ता कधीच नव्हती. रिमोट कंट्रोल वेगळेच होते’, असे भाजपने म्हटले आहे. खरे तर, २०१८ मध्ये सोनिया गांधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या- ‘मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे माझ्यापेक्षा चांगले पंतप्रधान बनतील हे मला ठाऊक होते.’ त्यामुळेच पक्षाने त्यांना दोनवेळा हे पद दिले. सरदार वल्लभभाई पटेल हे नेते काँग्रेसचे, पण भाजपचेच त्यांच्यावर खूप ‘प्रेम’! 

सध्याही लालकृष्ण अडवाणींविषयी काँग्रेसलाच अधिक उमाळा दाटून येतो. तसाच भाजपला रावांविषयी. मुळात, रावांनी पुढे जे आर्थिक बदल केले, त्याची सुरुवात केली ती राजीव गांधींनीच. ‘तुमची ऑपरेटिंग सिस्टीम २० वर्षे जुनी असेल आणि ती दहा वर्षांपूर्वीच कालबाह्य झाली असेल, तर जगासोबत तुम्हाला चालता येणार नाही’, असे ज्या राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये सांगितले होते आणि त्यासाठी तसे मूलभूत बदल आरंभले होते, त्यांना कोणतेही श्रेय द्यायचे नाही आणि, थेट रावांना नायकत्व बहाल करायचे, असा हा डाव असतो. राव पंतप्रधान झाले ते सोनियांमुळेच. कोणत्या तरी मठात जाऊन वेदाध्ययन करत निवृत्तीचा काळ व्यतीत करण्याची इच्छा असणारे राव अनपेक्षितपणे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक असेच काम केले. पण, काँग्रेसला त्यांचे विस्मरण झाले, या आक्षेपाला काही अर्थ नाही. उलटपक्षी, या आर्थिक सुधारणांचे खरे शिल्पकार जे होते, त्या डॉ. मनमोहन सिंग यांना काँग्रेसने पंतप्रधान केले. देशाचा आणि आपल्या आदर्शवादाचा चेहरा म्हणून महात्मा गांधी-नेहरू-इंदिरा-राजीव यांना जे स्थान आहे, तेच स्थान डॉ. मनमोहन सिंगांना मिळायला हवे, ही मागणी अनाठायी नव्हती. भविष्यात मनमोहन सिंगांचे भव्य स्मारक उभे राहील आणि अवघ्या जगाला हा इतिहास प्रेरणा देईल, एवढीच अपेक्षा आज आपण व्यक्त करू शकतो! 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा