शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

इतिहासही दयाळू नसावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 08:25 IST

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश शोकव्याकुळ झालेला असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वादाला तोंड फुटणे क्लेशकारक आहे...

वर्तमानाची असहिष्णुता अनुभवलेल्या डॉ. मनमोहन सिंगांनी ‘हिस्ट्री विल बी काइंडर टू मी’, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, इतिहासही एवढा दयाळू नसावा! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश शोकव्याकुळ झालेला असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वादाला तोंड फुटणे क्लेशकारक आहे. ज्या नेत्याने भारताला अवघड वळणावर सावरले, त्या नेत्याच्या निधनानंतर असे वाद झडणे अपेक्षित तर नाहीच, पण भारताच्या परंपरेला ते शोभणारे नाही. 

माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचे निधन झाले, तेव्हा सरकार काँग्रेसचे होते. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खास जागा दिली गेली आणि तिथेच त्यांचे स्मारकही उभे राहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर शिवाजी पार्कात त्यांचे अंत्यसंस्कार झाले, तेव्हाही बाळासाहेबांच्या विरोधातले सरकार राज्यात आणि केंद्रातही होते. ही आपली परंपरा असताना अशा प्रकारचा वाद होणेच अपेक्षित नव्हते. तरीही ते झाले. अखेर सरकारने भविष्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकार ते करेलही. मात्र, हा वाद अनाठायी आहे. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर परवा रात्री दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार तासांनंतर राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले- निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून केंद्र सरकारने त्यांचा अपमान केला आहे. ‘मनमोहन यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी हजार यार्ड जमीनही भाजप देऊ शकत नाही’, असे अरविंद केजरीवालही म्हणाले. २७ डिसेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराची जागा मागितली की जिथे स्मारक बांधता येईल. प्रियांका गांधी यांनी डॉ. सिंग यांचे स्मारक शक्तिस्थळ किंवा वीरभूमीजवळ बांधण्याची सूचना केली होती. डॉ. मनमोहन सिंग हे पंडित नेहरूंनंतरचे अत्यंत महत्त्वाचे पंतप्रधान. त्यामुळे इंदिरा गांधींच्या स्मारकाजवळ अथवा राजीव गांधींच्या स्मारकाजवळ त्यांची समाधी असावी, असे वाटणे अगदीच स्वाभाविक. 

जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलातही भारताला आपला सूर सापडला, तो डॉ. मनमोहनसिंग यांच्यामुळे. जगाला हेवा वाटावा, अशा या स्कॉलर नेत्याला त्याच्या बदल्यात तेव्हा काय मिळाले? हेटाळणी, अवमान आणि उपहास. अशा या उत्तुंग नेत्याला मृत्यूनंतरही अशा अवहेलनेला तोंंड द्यावे लावे लागणे अधिक व्याकूळ करणारे आहे. यावर भाजपचा मुद्दा वेगळाच आहे. ‘काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांना कधीच आदर दिला नाही. त्यांच्या हातात सत्ता कधीच नव्हती. रिमोट कंट्रोल वेगळेच होते’, असे भाजपने म्हटले आहे. खरे तर, २०१८ मध्ये सोनिया गांधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या- ‘मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे माझ्यापेक्षा चांगले पंतप्रधान बनतील हे मला ठाऊक होते.’ त्यामुळेच पक्षाने त्यांना दोनवेळा हे पद दिले. सरदार वल्लभभाई पटेल हे नेते काँग्रेसचे, पण भाजपचेच त्यांच्यावर खूप ‘प्रेम’! 

सध्याही लालकृष्ण अडवाणींविषयी काँग्रेसलाच अधिक उमाळा दाटून येतो. तसाच भाजपला रावांविषयी. मुळात, रावांनी पुढे जे आर्थिक बदल केले, त्याची सुरुवात केली ती राजीव गांधींनीच. ‘तुमची ऑपरेटिंग सिस्टीम २० वर्षे जुनी असेल आणि ती दहा वर्षांपूर्वीच कालबाह्य झाली असेल, तर जगासोबत तुम्हाला चालता येणार नाही’, असे ज्या राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये सांगितले होते आणि त्यासाठी तसे मूलभूत बदल आरंभले होते, त्यांना कोणतेही श्रेय द्यायचे नाही आणि, थेट रावांना नायकत्व बहाल करायचे, असा हा डाव असतो. राव पंतप्रधान झाले ते सोनियांमुळेच. कोणत्या तरी मठात जाऊन वेदाध्ययन करत निवृत्तीचा काळ व्यतीत करण्याची इच्छा असणारे राव अनपेक्षितपणे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक असेच काम केले. पण, काँग्रेसला त्यांचे विस्मरण झाले, या आक्षेपाला काही अर्थ नाही. उलटपक्षी, या आर्थिक सुधारणांचे खरे शिल्पकार जे होते, त्या डॉ. मनमोहन सिंग यांना काँग्रेसने पंतप्रधान केले. देशाचा आणि आपल्या आदर्शवादाचा चेहरा म्हणून महात्मा गांधी-नेहरू-इंदिरा-राजीव यांना जे स्थान आहे, तेच स्थान डॉ. मनमोहन सिंगांना मिळायला हवे, ही मागणी अनाठायी नव्हती. भविष्यात मनमोहन सिंगांचे भव्य स्मारक उभे राहील आणि अवघ्या जगाला हा इतिहास प्रेरणा देईल, एवढीच अपेक्षा आज आपण व्यक्त करू शकतो! 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा