शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सजा झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 5:02 AM

डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत

डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तशाच स्वरूपाचे गुन्हे बंदर खात्याचे, मेरिटाइम बोर्डाचे, सागरी पोलीस दलाचे आणि महसूलचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्धही दाखल झाले पाहिजेत; आणि हे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोर सजाही झाली पाहिजे. सागरी पोलिसांच्या स्पीड बोटी नादुरुस्त होत्या. परिणामी त्या वापरता आल्या नाहीत. त्यामुळे बचावकार्य उशिरा सुरू झाले. त्याची किंमत तीन विद्यार्थिनींना जीव देऊन मोजावी लागली. या बोटी सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? कुणी हलगर्जी केली? याचा सखोल तपास व्हायला हवा. महसूलची यंत्रणा पूर्वी ठाणे जिल्हा असताना दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी जेवढा वेळ घ्यायची तेवढाच वेळ तिने पालघर जिल्हा झाल्यानंतरही पालघरहून घटनास्थळी येण्यासाठी घेतला. यालाही जबाबदार जे कुणी असतील त्यांच्याविरुद्धसुद्धा कायद्याचा फास आवळला पाहिजे. बोटी मिळाल्यात; पण त्यांच्या वापरासाठी लागणारे डिझेल, पेट्रोल, चालक, देखभालीसाठी तंत्रज्ञ यांचा पत्ताच नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद नाही. आवश्यक ते परवाने आणि सुरक्षात्मक यंत्रणा, सुविधा आहेत की नाही याची खातरजमा कुणी करीत नाही, हे सारेच भयानक आहे. मुंबईवरील हल्ला झाल्यानंतरही ही बेफिकिरीची स्थिती कायम आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर मुंबई परिसरातील सर्वच टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. परंतु नव्या मुंबईतून आरडीएक्सचा साठा सुरत आणि अहमदाबादमध्ये गेला तो ठाणे, भिवंडी, वाडामार्गे हे कळाल्यावर तेथील टोलनाक्यांवरील फूटेज तपासणीसाठी मागविले असता कळाले की, या फूटेजचे रेकॉर्डिंग करणारी, ते साठवणारी, ते हवे तेव्हा उपलब्ध करून देणारी ‘मास्टर कंट्रोल रूम’च साकारली गेलेली नव्हती. अशी बेफिकिरी याही बाबतीत दाखविली गेली आहे. त्याचे मोल तीन विद्यार्थिनींना आपला जीव देऊन मोजावे लागले आहे. सेल्फी काढताना बोट कलंडून दुर्घटना घडल्याचे चालकाचे म्हणणे आहे. मुलांनी अशा ठिकाणी जबाबदारीने वागले पाहिजे. पालकांनीही त्यांना तशी जाणीव करून द्यायला हवी. कमला मिल दुर्घटनेनंतर बेकायदा हॉटेलवर कारवाई करण्यात आली. मोजोज्, वन अबव्हच्या मालकांना बेड्या ठोकल्या गेल्या. दबावापोटी ही वेगवान कारवाई करण्यात आली. तसाच वेग डहाणू बोटीच्या दुर्घटनेविषयीदेखील हवा. तरच अशा दुर्घटना भविष्यात टाळू शकू.