शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:23 IST

धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान केल्यास पुण्य मिळते, या भावनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गुप्तदान करणा-यांचीही वानवा नाही.

धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान केल्यास पुण्य मिळते, या  भावनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गुप्तदान करणा-यांचीही वानवा नाही. तिरुपती बालाजीपासून तर आपल्या शिर्डीच्या साईबाबापर्यंतची श्रीमंत मंदिरे याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. परंतु दान केवळ देव आणि मंदिरांपुरतेच मर्यादित असावे का? देव शोधायचा असेल तर माणसात शोधा, असे सा-याच महापुरुषांनी सांगितले आहे, मग रक्ताच्या एका थेंबासाठी माणूस मृत्युशय्येवर असताना त्याला रक्त का मिळत नाही? रक्त उपलब्ध नसल्याने जीवास मुकणा-यांची संख्या मोठी आहे. २५ ते ३० लाख लोकखंख्येच्या नागपुरात एक टक्का लोकही रक्तदान करीत नसल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपूर्ण देशाचे हेच चित्र आहे, असे का व्हावे? या देशात देवावर नितांत विश्वास असणारे आणि दान करणाºयांची संख्या कमी नसतानाही ही परिस्थिती का निर्माण व्हावी. रक्तदान हेच श्रेष्ठदान असे मोठ्या अभिमानाने म्हटले जाते. परंतु ते वास्तवात का उतरत नाही. आपण कुठे कमी पडतोय? एखाद्या रुग्णाला त्याची जितकी गरज आहे, तितकीच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असलेल्या सैनिकांनाही रक्ताची गरज भासते. देशभक्तीच्या भावनेने आपले मोबाईलचे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सोशल मीडियावरील संदेश ठासून भरलेले दिसून येतात, मग रक्तदान करण्याची इच्छा निर्माण का होत नाही. रक्ताला जात-धर्म नाही म्हणून तर नव्हे ना? रक्तालाही कदाचित जात-धर्म असता तर जाती-धर्मनिहाय रक्तदान शिबिरे झाली असती. परंतु या परिस्थितीतही अनेकजण मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढाकार घेतात. मात्र शासकीय व सेवाभावी ब्लड बँक सोडल्या तर अनेक रक्तपेढ्यांनी रक्ताचा धंदा उघडला आहे, त्यामुळेही अशा स्वेच्छेने रक्तदान करणाºयांच्याही उत्साहावर पाणी फेरले जात आहे. असो रक्ताचा रंग एकच आहे आणि त्याची सर्वांनाच गरज आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी शासनाला याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ती केलीही जात आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजातील जातीय, धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांचे समाज ऐकतो. अशा लोकांनीही स्वत: पुढाकार घेऊन आणि शासनानेही अशा लोकांच्या सहकार्याने रक्तदानासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, ही बाब प्रत्येकाच्या मनपटलावर कोरली जाईल, तेव्हाच खºया अर्थाने रक्तदानाची चळवळ ही लोकचळवळ होईल.

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र