शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

शिवसेनेचे चिंतन आणि चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:17 AM

वयाची पन्नाशी उलटल्यावर रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडण्याची भीती असते.

वयाची पन्नाशी उलटल्यावर रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे डोके शांत ठेवून पथ्यपाणी पाळून राहावे, असा सल्ला डॉक्टर देतात. अर्थात माणसाला जे लागू आहे ते राजकीय पक्षाला जसेच्या तसे लागू होत नाही. मात्र ५२ वा वर्धापन दिन साजरा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली भाषणे पाहिल्यावर शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता ही भाषा योग्य असली तरी वस्तुस्थिती बरीच भिन्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ते बोलणार असतील तर उद्धव व राज ठाकरे भाषण करीत नसत. आदित्य यांनी वडिलांचे भाषण होण्यापूर्वीच स्वबळाचा शंख फुंकून टाकला, हा शिवसेनेतील लक्षणीय बदल आहे. अर्थात आदित्य जेव्हा स्वबळाचा नारा देत होते तेव्हा समोर बसलेल्या मंत्री व आमदारांनी टाळ्या पिटल्या नाहीत. कारण स्वबळावर सत्ता प्राप्त करण्यापासून शिवसेना कित्येक कोस दूर आहे, याची जाणीव त्यांना आहे. उद्धव यांनीही स्वबळाचा नारा देत पुत्राची री ओढली. मात्र सध्या भाजपासोबत असलेली सत्ता बिलकूल सोडणार नाही हे जाहीर केले. सत्तेतून बाहेर पडा शिकवणारे हे कोण टिकोजीराव, असा त्यांचा विरोधकांबाबत सूर होता. महाराष्ट्रात भाजपा हा आपला मोठा भाऊ झाला आहे हे स्वीकारण्यास शिवसेनेचे मन तयार नाही. मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेपेक्षा अधिक यश मिळाले, याची सल कायम आहे. सत्ता सोडली तर शिवसेना फुटण्याची भीती आणि सत्तेत राहिलो तर बदनाम व अपमानित होण्याची अपरिहार्यता, अशा कात्रीत सापडलेल्या उद्धव यांनी आपल्याच सरकारविरोधात उच्चरवात टीका करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक मग ती कल्याण-डोंबिवली महापालिकेची असो की पालघरची लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढायची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांना चर्चेतून हद्दपार करायचे, अशी ही रणनीती आहे. स्वबळावर यश दिसले तर एकमेकांच्या उरावर बसायचे आणि विरोधकांची एकजूट दिसताच परस्परांच्या गळ्यात गळे घालायचे, असे हे संधिसाधू राजकारण शिवसेना-भाजपा करीत आहे. मात्र यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर असताना एकमेकांची धुणी धुतल्यामुळे नाराज मतदार मतदान केंद्रावर गेला नाही आणि त्यामुळे अवघ्या पाच वर्षांत युती सरकार अरबी समुद्रात बुडाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेनेला लवकरात लवकर ही कोंडी फोडावी लागेल व चिंतामुक्त व्हावे लागेल. मात्र खरा महत्त्वाचा मुद्दा प्रा. मनोहर जोशी यांनी उपस्थित केला. अन्य राज्यांत प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पण महाराष्ट्रात शिवसेनेला स्वबळावर सत्ता का मिळाली नाही, हा त्यांचा रास्त सवाल आहे. मुस्लीम लीगचा द्वेष करायचा आणि बनातवालांशी हातमिळवणी करायची, काँग्रेसविरोध खुंटीला अडकवून आणीबाणीला समर्थन द्यायचे, अशा चुकांमुळे शिवसेना संपूर्ण सत्ता हाती घेऊ शकली नाही, हेच जोशींच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आताही भाजपाबाबत शिवसेनेची भूमिका संदिग्ध आहे. भावनेचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे मतदार पक्ष नेतृत्वाने अचानक यू टर्न घेतला तर गोंधळतात, निराश होतात हे सांगायला खरे तर जोशीबुवांची गरज नाही.