शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

विखे-थोरातांचा बिनकनातीचा तमाशा अन् सेनेची नसती उठाठेव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:24 AM

यावेळच्या तमाशाचे खास वैशिष्ट्य असे की, विखे-थोरात यांच्यातील सवाल- जबाबात शिवसेनेने नाहक आपला बाण ताणला आहे.

- सुधीर लंके‘बिनकनातीचा’ तमाशा हा शब्दप्रयोग ग्रामीण भागात परिचित आहे. पूर्वी तमाशाला खास रंगमंच नसायचा. तो कोठेही सुरू व्हायचा आणि लोकांचे मनोरंजन करायचा. राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व शिवसेना यांनी सध्या असाच तमाशा आरंभला आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना निष्ठावान कोण व लाचार कोण? यावर यांचे वगनाट्य सुरूझाले आहे. यावेळच्या तमाशाचे खास वैशिष्ट्य असे की, विखे-थोरात यांच्यातील सवाल- जबाबात शिवसेनेने नाहक आपला बाण ताणला आहे.थोरात-विखे हा वाद राज्याला नवा नाही. मध्यंतरी या दोघांना ‘टॉम अँड जेरी’ची उपमा दिली गेली होती. हे दोघेही दीर्घकाळ काँग्रेस या एकाच पक्षात होते. दोघेही साखर कारखानदार व एकाच जिल्ह्यातील. मतदारसंघही एकमेकाला लागून. तरीही त्यांचे पटत नाही. ते सोयीने भांडतात व सोयीने वेळप्रसंगी एकत्रही येतात. (हो, ते एकत्र येतात. कारण आजवर या दोघांनी कधीही विधानसभा निवडणुकीत एकमेकाला अडचणीत आणलेले नाही.) या दोघांचे राजकारण समजून, उमजून आपापल्या सोयीने पद्धतशीर सुरूअसते. तिसऱ्या माणसाला ते लवकर कळत नाही. त्यामुळे त्यांच्यात जो पडतो तोच मुर्खात निघतो.

सध्या थोरात महाविकास आघाडीत मंत्री आहेत, तर विखे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये. ‘आपण एवढी वर्षे काँग्रेसमध्ये होतो; पण सत्तेसाठी लाचार झालेला प्रदेशाध्यक्ष आपण पाहिला नाही,’ अशी टीका विखेंनी थोरातांवर केली. त्यावर थोरात यांनीही प्रत्युत्तर दिले. ‘विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे यांना आपण अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना पाहिले,’ असे ते म्हणाले. म्हणजे विखे हे सतत देवेंद्र फडणवीस यांचे उंबरठे झिजवत होते, असे त्यांना म्हणायचे आहे. या दोघांमध्ये हा सवाल-जबाब नेहमी सुरूच असतो. विखे आपल्या शैलीप्रमाणे आक्रमक बोलतात, तर थोरात मवाळपणे; पण साखरेतूनही कडू गोळी देण्यात थोरात माहीर आहेत. या दोघांचीही ही भांडणे जनतेला आता सरावाची झाली आहेत. त्यांच्या या भांडणात शिवसेनेला नावीन्य का वाटले? हे आश्चर्य आहे.विखेंनी थोरातांवर केलेली टीका त्यांच्यापेक्षाही शिवसेनेला अधिक झोंबलेली दिसते. म्हणून त्यांनी आपल्या मुखपत्रातून ‘विखेंची टुरटुर’ या अग्रलेखातून विखे यांचे वाभाडे काढले. विखे सतत पक्षांतर करीत असल्याने सेनेने त्यांना ‘टूर्स अँड ट्रॅव्हल’ कंपनीची उपमा दिली. वास्तविकत: युती सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे व त्यांचे वडील बाळासाहेब यांना सेनेत प्रवेश देऊन सेनेनेही या कंपनीशी भागीदारी केली होती. अगदी अलीकडे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे संगमनेर या थोरातांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हाही ठाकरे यांनी ‘मातोश्री’वरून आणलेली ओंजळभर फुले राधाकृष्ण विखेंवर उधळली होती. ‘थोरात यांनी आता घरी बसायला हरकत नाही’ असे उद्धव त्यावेळी म्हणाले होते. ‘तुम्ही आमच्यासोबत आलात ते बरे झाले. कारण, तिकडे कर्मदरिद्री लोक आहेत. आज मला बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेब विखे या दोघांचीही आठवण येते’ असेही उद्धव हे विखे यांना म्हणाले होते. म्हणजे विखे यांनी काँग्रेसमधून भाजपत जे पक्षांतर केले, त्याचे ठाकरे यांनी समर्थन केले होते. त्यांच्याच मुखपत्राने आज विखे यांना सततच्या पक्षांतरामुळे ‘टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी’ म्हणून संबोधले. ‘थोरात यांनी घरी बसावे’ असा सल्ला देणारा पक्ष आज थोरात यांच्यामुळेच सत्ता उपभोगतो आहे. त्यामुळे विखे जशा भूमिका बदलतात, तशी शिवसेनाही भूमिका बदलते हे या सर्व पुराणावरून ध्यानात येते. शिवसेनेच्या मुखपत्रातून झालेल्या टीकेनंतर विखे यांनी खासदार संजय राऊत यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सेनेऐवजी व्यक्तिगत राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘राऊत यांची छाती फोडून पाहिली तर एकाच वेळी उद्धव ठाकरे व शरद पवार असे दोघेही नेते दिसतील’ असे विखे पत्रात म्हणतात. राऊत हे ‘मातोश्री’शी निष्ठावान नाहीत. तसेच त्यांचे बोलविते धनी पवार असावेत, असेही विखे या पत्रातून ध्वनीत करू इच्छितात.
राज्य कोरोनात होरपळत असताना ही टीकाटिपण्णी जनतेचे काय भले करणार? शाळा, कॉलेज बंद असताना ‘बालिश बहु बायकांत बडबडला हा’ हा अनुप्रास अलंकार ही मंडळी कोणाला शिकवू पाहत आहेत. विखे हे दुसऱ्यांचे वाकून पाहतात अशी टीका सेनेने केली आहे; पण नगर जिल्ह्यात अनेक शिवसैनिक विखेंच्या ताटाखालचे मांजर आहेत. जिल्ह्यात अनेक शिवसैनिक हे विखे सैनिक म्हणूनच ओळखले जातात, हे सेनेला ठाऊक नसावे का? विखे-थोरातांच्या या बिनकनातीच्या तमाशात सेनेची नसती उठाठेव कशासाठी? हे अनेकांना उलगडलेले नाही. विखे-थोरात वाद राज्याला नवीन नाही. हे नेते सोयीने भांडतात व सोयीने एकत्रही येतात. या दोघांच्या तमाशात यावेळी शिवसेनेने एंट्री का मारली आहे? हे सैनिकांनाही उमगले नसेल.

(आवृत्तीप्रमुख, लोकमत, अहमदनगर)

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील