शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

श्रमदानापेक्षा सेल्फी छान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 09:38 IST

मदानापेक्षा या अभिनेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईचे ओंगळवाणे प्रदर्शन.

- मिलिंद कुलकर्णी

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने संवेदनशील अभिनेता आमीर खान, पत्नी किरण राव व अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत दोन दिवस खान्देशात आले होतो. चार गावांमध्ये त्यांनी ४५ अंश तापमानाची तमा न बाळगता श्रमदान केले. चित्रीकरण केले. ग्रामस्थांशी संवाद साधला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना आमीर खान यांनी दिलेले प्राधान्य, लोकसहभागातून उभारलेली मोठी चळवळ ही खरोखर कौतुकास्पद आहे. राज्य शासन, भारतीय जैन संघटना यांनीही वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना संपूर्ण सहकार्य देऊ केले. भारतीय जैन संघटनेने तर जेसीबी, पोकलँड मशीन मोफत उपलब्ध करुन दिले. जलसंधारण चळवळीचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसह बहुसंख्य शासकीय अधिकाऱ्यांनी स्वत: श्रमदान करीत अन्य सर्व प्रकारची मदत या गावांना केली. ‘तुफान आलंया’ या बोधवाक्याप्रमाणे खरोखर मोठी स्पर्धा गावागावांमध्ये दिसून आली.

आमीर खान, किरण राव यांच्यासारख्या कलावंतांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील समस्येला भिडावे आणि त्यासाठी जलसंधारणासारखे ठोस उपाय हाती घ्यावे, हे आदर्शवत असे उदाहरण आहे. ‘सेलिब्रिटी’ असल्याने त्यांच्या कृतीकडे तरुणाईसह संपूर्ण समाजाचे लक्ष असते. त्यांनी ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून हाती घेतलेल्या कार्याला समाजाकडून लाभलेल्या उदंड प्रतिसादावरुन या कलावंतांची लोकप्रियता आणि त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाची अपरिहार्यता अशा दोन्ही गोष्टी अधोरेखित होत आहेत.

चांगल्या कामात खोडा घालण्याची मानवी प्रवृत्ती असते, त्याचा प्रत्यय अशा उपक्रमांमध्येही येतोच. श्रमदानासाठी गाव राबत असताना त्याचे कौतुक करण्याऐवजी काही मंडळींनी आयुष्यभर ज्यांच्या श्रमाचे शोषण झाले, त्यांचे काय ? असा सवाल उपस्थित करुन या उपक्रमाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. शोषणाचा प्रश्न आहेच, त्याबद्दल दुमत नाही. त्यासंबंधी कायदे, नियम आहेत, त्याची अंमलबजावणी होत नसेल तर दाद मागता येऊ शकते. परंतु श्रमदानासारख्या विधायक उपक्रमाच्यावेळी असे विषय उपस्थित करुन काय साधले जाते?

दुसरा विषय श्रमदानापेक्षा या अभिनेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईचे ओंगळवाणे प्रदर्शन. ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी समस्या सोडविण्याच्या तळमळ आणि कळकळीने भौतिकदृष्टया संपन्न असलेला अभिनेता ४५ अंश तापमानात खेडोपाडी फिरत असताना श्रमदान करण्याऐवजी आमची तरुणाई सेल्फी काढण्यात गर्क दिसली. व्हॉटस अ‍ॅप, फेसबूक, ट्विटरवर आमीर, रणबीर सोबतचे फोटो सगळ्यांनी टाकले होते. पण कुणाच्या हाती कुदळ, फावडा, पाटी घेतलेला फोटो दिसला नाही. पाणीटंचाईसाठी सरकारला जबाबदार धरणारे आम्ही, उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला असताना खांद्याला खांदा लावून श्रमदानास तयार होत नाही, हेच विदारक चित्र या काळात दिसून आले. आमीरचे वैशिष्टय म्हणजे, श्रमदान टाळून ‘सेल्फी छान’ म्हणणाऱ्या तरुणाईला त्याने नाराज केले नाही.