शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

आत्मसाक्षात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:32 IST

बरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना.

- सद्गुरू जग्गी वासुदेवबरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना. इच्छारहित, विरक्तीच्या शिकवणी आल्या आहेत. कारण दुसºयात गुंतल्यामुळे नेहमीच वेदना आणि दु:ख माणसाच्या वाट्याला येते. म्हणून कोणीतरी हा मूर्ख उपाय शोधून काढला - अलिप्त राहा.त्यांच्यानुसार, जीवनावरील तोडगा म्हणजे जीवन टाळणे! कोणाला जर जगणे टाळायचे आहे, तर त्यांनी मृत्यू निवडावा. हे खूपच सोपे आहे. जर तुम्हाला जगायचे आहे, तर तुम्ही त्यात समरस झाले पाहिजे. म्हणून ‘जोडलं जाण्याचा’ संकोच करू नका. विरक्तीबद्धलच्या कोणत्याही शिकवणुकींचे पालन करू नका. ‘संलग्न होणे हे वाईट असते’, अशा प्रकारच्या उपदेशांमुळे, तुम्ही आत्ता समरस व्हायला संकोच करता. तुम्ही स्वत:ला विरक्त ठेवलेय, म्हणून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही जेव्हा सर्वकाही आपलाच भाग म्हणून तुमच्या आत सामावून घ्याल, तेव्हाच मुक्तता अनुभवाल. तुम्ही जर सर्वकाही आपलाच एक भाग म्हणून स्वत:मध्ये सामील केलेत की, तुमची वेगळी अशी ओळख राहणार नाही, यालाच ‘योग’ म्हणतात. ‘योग’ म्हणजे जोडले जाणे. जेव्हा तुम्ही संपूर्ण अस्तित्वाशी जोडले जाता, तेव्हा तुम्ही योगात असता किंवा जेव्हा तुम्हाला ही जाणीव होते की, तुम्ही या अस्तित्वाशी किती अविभाज्यपणे एकरूप आहात, तेच तुमचे विश्वरूप-वैश्विकता. तुमच्या वात्सल्यात कुठल्याच प्रकारचा भेदभाव नको. तोच तुम्हाला परमानंद देईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक