शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

असंवेदनशील राज्यकर्त्यांपासून राज्य वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 00:30 IST

- चंद्रकांत पाटील कोरोना महामारीच्या फैलावानंतर महाराष्ट्रात जे चित्र बघायला मिळत आहे, ते अत्यंत भयानक आहे. लॉकडाऊनच्या आदेशाची कडक ...

- चंद्रकांत पाटीलकोरोना महामारीच्या फैलावानंतर महाराष्ट्रात जे चित्र बघायला मिळत आहे, ते अत्यंत भयानक आहे. लॉकडाऊनच्या आदेशाची कडक अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, कुणाचा पायपोस कुणाला नाही. त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत म्हणून या सरकारने आता तरी जागे होऊन कारभार करावा, यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘महाराष्ट्र बचाओ’ हे आंदोलन राज्यभर केले.

दोन महिन्यांहून अधिक काळ आपण राज्य सरकारचे काम बघत आहोत. या काळात ‘सरकार’ नावाची चीज अस्तित्वात असल्याचे चित्र कुठेही न दिसल्याने आपल्याला सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन करावे लागले. सरकारवर वचक ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कामच असते. गेल्या दोन महिन्यांत विविध माध्यमांतून आम्ही राज्य सरकारला कारभारातील चुका आणि त्रुटी दाखवत आहोत. मात्र, त्यातून हेसरकार काहीच बोध घेताना दिसत नाही, असेच चित्र दिसते आहे. मुंबईतील चित्र तर अत्यंत भयानक आहे. कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयांत जागाच नाही.

‘ही वेळ आंदोलनाची नाही,’ असे तोंड वर करून सांगताना राज्यकर्त्यांना थोडीही चाड राहिलेली नाही. सरकारमधील एका मंत्र्याच्या घरात नेऊन विरोधी मत व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण केली जाते, यावरून राज्यकर्ते कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा अनुभव जनता घेते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच अन्य माध्यमांतून सरकारला वेगवेगळ्या सूचना केल्या. डॅशबोर्ड बनवून कोणत्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती जनतेला द्यावी, यांसारख्या सूचना फडणवीस यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीतही आम्ही विविध सूचना केल्या. या सूचनांवर काहीच कार्यवाही केली नाही म्हणून आम्हाला सरकारला इशारा देण्यासाठी आंदोलन करावे लागले. सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि चुका, त्रुटी दाखविणे हे विरोधकांचे कर्तव्य असते.

राज्यात शेतमालाची खरेदी थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. राज्य सरकारकडून शेतकºयांच्या कापसाची खरेदी केली जात नाही. शेतकºयांच्या बांधावर जाऊन सात-बारा कोरा करू म्हणत शेतकºयांचा विश्वासघात या सरकारने केला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप नाही. रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नाही. केंद्र सरकारने शेतकºयांसाठी कापूस खरेदी केंद्रे (सीसीआय) सुरू केली आहेत; परंतु नोंदणीकृत सर्व शेतकºयांचा कापूस खरेदी करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने कापूस खरेदी केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. असे असताना राज्य सरकार त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.

ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना तत्काळ पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. देशातील छोट्या-छोट्या राज्यांनीसुद्धा पॅकेज जाहीर करण्यात पुढाकार घेतला. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकसुद्धा पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे. फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकºयांना मदतीचा हात नाही. बांधकाम कामगारांना हक्काचे अनुदान नाही. नाभिकबांधव किंवा गटई कामगार यांना सरकारने वाºयावर सोडले आहे. हातावर पोट असणाºया लहान व्यावसायिकांना तसेच हमाल, मापाडी प्रवर्गात काम करणाºयांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत सरकारकडून झालेली नाही. ना कोणत्या घटकाला मदत, ना कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी. मृतदेहांशेजारी उपचार, एका खाटेवर दोन रुग्ण! कोविड योद्धयांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नाही. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांवरील उपचारांची स्थितीसुद्धा अतिशय वाईट बनली आहे.

आमचे पोलिसबांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्यातील सुमारे १४०० पोलिसांना लागण, त्यांच्याही उपचारांची काळजी नाही. अतिशय वेदनादायी चित्र आहे. केवळ रुग्णवाहिका नाही म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. राज्यातले सत्ताधारी केंद्र सरकारच्या पॅकेजवर टीका करतात; पण केंद्राने बँकेत जनधन खाते असलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. गोरगरिबांसाठी अन्नधान्य पाठविले आहे. लाखो गोरगरिबांना उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस दिला जात आहे.

भाजपचे हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी आहे. रुग्णसंख्या ४० हजारांवर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील. सरकारने आपला कारभार सुधारला नाही, तर भारतीय जनता पक्षाला यापुढील काळात आणखी मोठे आंदोलन करावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार