शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सावज दमलं की वाघ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:09 IST

सावज दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते.

प्रिय साहेब, जय महाराष्ट्रआपली मुलाखत वाचली. सुधाकरराव नाईक यांची आठवण काढून आपण त्यांचा किस्सा सांगितला ते भारी वाटलं. सावज टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही, असं ते म्हणायचे. मात्र आपल्या एका वाक्याचा अर्थ कितीही डोकं खाजवलं तरी समजेना झालाय. आपण म्हणालात, शिकार करायची गरजच नाही, कारण आता सावज दमलंय... ते दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते. खरं काय ते कळेना साहेब... म्हणून हे पत्र लिहायला घेतलं.सावज दमवून दमवून वाघ शिकार करतो हे खरंय पण सावज दमलंय, त्याला जरा थोडा श्वास घेऊ दे, निवांत होऊ दे, मग शिकार करु असं कधी म्हणत नाही तो... सापडला तावडीत की पंजा मारून मोकळा होतो... मग आपण का त्याच्या स्वत:हून मरणाची वाट पाहू लागलो...? शिकार करायची गरजच उरणार नाही, सावज दमलंय... याचा अर्थ ते आपोआप मरून जाईल आणि मग आपण शिकारीवर ताव मारू, असं तर नाही ना साहेब. कारण दमलेल्या सावजाची शिकार म्हातारा झालेलाच वाघ करतो असं पुस्तकात वाचलं होतं म्हणून विचारलं... आम्हाला कळेना म्हणून शेलारमामांना विचारलं तर ते म्हणाले, वाघ दमला की सावज, मला नाही माहिती. मी नागपुरात सावजी खाऊन दमलोय.आज परत आपली मुलाखत वाचली. आपण म्हणालात, उद्याच्या सत्तेची रंगीत तालीम सुरूय... आम्ही पुन्हा कोड्यात पडलो ना साहेब. आजकाल सगळे आपल्याला सत्तेत राहणारे विरोधक म्हणतात. आपण सरकारमध्ये राहूनही मतदान करायची वेळ आली की तटस्थ रहातो. कुणी काही म्हणो, आपण विरोधातच बोलतो. पोटनिवडणुका आल्या की आपण त्यांनाच असा काही ठोकून काढतो की विचारता सोय नाही आणि निकाल लागले की पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून आपलेच नेते चर्चा करत बसतात. ही जर सत्तेची रंगीत तालीम असेल आणि त्यातून आपली सत्ता आली तर तेव्हा देखील आपण असेच वागणार? सत्तेतही आणि विरोधात आपणच राहणार का? एकदम भारी काम होईल. म्हणजे एकदा एका ग्लासातला घोट घ्यायचा, चियर्स म्हणायचं, नंतर दुसऱ्या ग्लासातला घोट घ्यायचा आणि चियर्स म्हणायचं... असचं ना... भारी मजा येईल साहेब. दोन्हीकडे पण आपलेच लोक... एकदम भारी रंगीत तालीम आहे साहेब ही... चालू द्या, चालू द्या...!साहेब, आपल्या मंत्र्यांनी राजीनामे टाईप केले, खिशात ठेवून सगळे वर्षावर गेले, पण द्यायचे राहून गेले, कुणी म्हणालं मध्यंतरी आलेल्या पावसात वाहून गेले असतील राजीनामे... खरं खोटं आपल्यालाच माहिती. पण साहेब, राजीनामा कसा लिहायचा, कसा द्यायचा... हा देखील रंगीत तालमीचाच भाग होता का? सहज सुचलं म्हणून विचारलं...असो. पण मुलाखतीत आपले राऊत साहेब, कधी कधी शरद पवारांच्या प्रेमात पडल्यासारखे का बोलतात हो... आणि परवा दिल्लीत भाजपाच्या कार्यालयात टाईप केलेला तो ‘व्हीप’ ज्याने कोणी काढला होता त्याचा शोध लागला का हो...? साहेब, राजीनामे टाईप करायला दिल्लीत आपलं एकही कार्यालय नाही...?- अतुल कुलकर्णी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा