शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

सावज दमलं की वाघ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:09 IST

सावज दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते.

प्रिय साहेब, जय महाराष्ट्रआपली मुलाखत वाचली. सुधाकरराव नाईक यांची आठवण काढून आपण त्यांचा किस्सा सांगितला ते भारी वाटलं. सावज टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही, असं ते म्हणायचे. मात्र आपल्या एका वाक्याचा अर्थ कितीही डोकं खाजवलं तरी समजेना झालाय. आपण म्हणालात, शिकार करायची गरजच नाही, कारण आता सावज दमलंय... ते दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते. खरं काय ते कळेना साहेब... म्हणून हे पत्र लिहायला घेतलं.सावज दमवून दमवून वाघ शिकार करतो हे खरंय पण सावज दमलंय, त्याला जरा थोडा श्वास घेऊ दे, निवांत होऊ दे, मग शिकार करु असं कधी म्हणत नाही तो... सापडला तावडीत की पंजा मारून मोकळा होतो... मग आपण का त्याच्या स्वत:हून मरणाची वाट पाहू लागलो...? शिकार करायची गरजच उरणार नाही, सावज दमलंय... याचा अर्थ ते आपोआप मरून जाईल आणि मग आपण शिकारीवर ताव मारू, असं तर नाही ना साहेब. कारण दमलेल्या सावजाची शिकार म्हातारा झालेलाच वाघ करतो असं पुस्तकात वाचलं होतं म्हणून विचारलं... आम्हाला कळेना म्हणून शेलारमामांना विचारलं तर ते म्हणाले, वाघ दमला की सावज, मला नाही माहिती. मी नागपुरात सावजी खाऊन दमलोय.आज परत आपली मुलाखत वाचली. आपण म्हणालात, उद्याच्या सत्तेची रंगीत तालीम सुरूय... आम्ही पुन्हा कोड्यात पडलो ना साहेब. आजकाल सगळे आपल्याला सत्तेत राहणारे विरोधक म्हणतात. आपण सरकारमध्ये राहूनही मतदान करायची वेळ आली की तटस्थ रहातो. कुणी काही म्हणो, आपण विरोधातच बोलतो. पोटनिवडणुका आल्या की आपण त्यांनाच असा काही ठोकून काढतो की विचारता सोय नाही आणि निकाल लागले की पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून आपलेच नेते चर्चा करत बसतात. ही जर सत्तेची रंगीत तालीम असेल आणि त्यातून आपली सत्ता आली तर तेव्हा देखील आपण असेच वागणार? सत्तेतही आणि विरोधात आपणच राहणार का? एकदम भारी काम होईल. म्हणजे एकदा एका ग्लासातला घोट घ्यायचा, चियर्स म्हणायचं, नंतर दुसऱ्या ग्लासातला घोट घ्यायचा आणि चियर्स म्हणायचं... असचं ना... भारी मजा येईल साहेब. दोन्हीकडे पण आपलेच लोक... एकदम भारी रंगीत तालीम आहे साहेब ही... चालू द्या, चालू द्या...!साहेब, आपल्या मंत्र्यांनी राजीनामे टाईप केले, खिशात ठेवून सगळे वर्षावर गेले, पण द्यायचे राहून गेले, कुणी म्हणालं मध्यंतरी आलेल्या पावसात वाहून गेले असतील राजीनामे... खरं खोटं आपल्यालाच माहिती. पण साहेब, राजीनामा कसा लिहायचा, कसा द्यायचा... हा देखील रंगीत तालमीचाच भाग होता का? सहज सुचलं म्हणून विचारलं...असो. पण मुलाखतीत आपले राऊत साहेब, कधी कधी शरद पवारांच्या प्रेमात पडल्यासारखे का बोलतात हो... आणि परवा दिल्लीत भाजपाच्या कार्यालयात टाईप केलेला तो ‘व्हीप’ ज्याने कोणी काढला होता त्याचा शोध लागला का हो...? साहेब, राजीनामे टाईप करायला दिल्लीत आपलं एकही कार्यालय नाही...?- अतुल कुलकर्णी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा