शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

सावज दमलं की वाघ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:09 IST

सावज दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते.

प्रिय साहेब, जय महाराष्ट्रआपली मुलाखत वाचली. सुधाकरराव नाईक यांची आठवण काढून आपण त्यांचा किस्सा सांगितला ते भारी वाटलं. सावज टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही, असं ते म्हणायचे. मात्र आपल्या एका वाक्याचा अर्थ कितीही डोकं खाजवलं तरी समजेना झालाय. आपण म्हणालात, शिकार करायची गरजच नाही, कारण आता सावज दमलंय... ते दमलंय की आपण दमलोय हे आधी तपासून पाहा, असं वांद्रात राहणारे शेलारमामा म्हणत होते. खरं काय ते कळेना साहेब... म्हणून हे पत्र लिहायला घेतलं.सावज दमवून दमवून वाघ शिकार करतो हे खरंय पण सावज दमलंय, त्याला जरा थोडा श्वास घेऊ दे, निवांत होऊ दे, मग शिकार करु असं कधी म्हणत नाही तो... सापडला तावडीत की पंजा मारून मोकळा होतो... मग आपण का त्याच्या स्वत:हून मरणाची वाट पाहू लागलो...? शिकार करायची गरजच उरणार नाही, सावज दमलंय... याचा अर्थ ते आपोआप मरून जाईल आणि मग आपण शिकारीवर ताव मारू, असं तर नाही ना साहेब. कारण दमलेल्या सावजाची शिकार म्हातारा झालेलाच वाघ करतो असं पुस्तकात वाचलं होतं म्हणून विचारलं... आम्हाला कळेना म्हणून शेलारमामांना विचारलं तर ते म्हणाले, वाघ दमला की सावज, मला नाही माहिती. मी नागपुरात सावजी खाऊन दमलोय.आज परत आपली मुलाखत वाचली. आपण म्हणालात, उद्याच्या सत्तेची रंगीत तालीम सुरूय... आम्ही पुन्हा कोड्यात पडलो ना साहेब. आजकाल सगळे आपल्याला सत्तेत राहणारे विरोधक म्हणतात. आपण सरकारमध्ये राहूनही मतदान करायची वेळ आली की तटस्थ रहातो. कुणी काही म्हणो, आपण विरोधातच बोलतो. पोटनिवडणुका आल्या की आपण त्यांनाच असा काही ठोकून काढतो की विचारता सोय नाही आणि निकाल लागले की पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून आपलेच नेते चर्चा करत बसतात. ही जर सत्तेची रंगीत तालीम असेल आणि त्यातून आपली सत्ता आली तर तेव्हा देखील आपण असेच वागणार? सत्तेतही आणि विरोधात आपणच राहणार का? एकदम भारी काम होईल. म्हणजे एकदा एका ग्लासातला घोट घ्यायचा, चियर्स म्हणायचं, नंतर दुसऱ्या ग्लासातला घोट घ्यायचा आणि चियर्स म्हणायचं... असचं ना... भारी मजा येईल साहेब. दोन्हीकडे पण आपलेच लोक... एकदम भारी रंगीत तालीम आहे साहेब ही... चालू द्या, चालू द्या...!साहेब, आपल्या मंत्र्यांनी राजीनामे टाईप केले, खिशात ठेवून सगळे वर्षावर गेले, पण द्यायचे राहून गेले, कुणी म्हणालं मध्यंतरी आलेल्या पावसात वाहून गेले असतील राजीनामे... खरं खोटं आपल्यालाच माहिती. पण साहेब, राजीनामा कसा लिहायचा, कसा द्यायचा... हा देखील रंगीत तालमीचाच भाग होता का? सहज सुचलं म्हणून विचारलं...असो. पण मुलाखतीत आपले राऊत साहेब, कधी कधी शरद पवारांच्या प्रेमात पडल्यासारखे का बोलतात हो... आणि परवा दिल्लीत भाजपाच्या कार्यालयात टाईप केलेला तो ‘व्हीप’ ज्याने कोणी काढला होता त्याचा शोध लागला का हो...? साहेब, राजीनामे टाईप करायला दिल्लीत आपलं एकही कार्यालय नाही...?- अतुल कुलकर्णी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा