शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘भारत की संतान’ने राष्ट्रीय एकात्मतेला बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 17:15 IST

देशातील १८ भाषांमध्ये भारत की संतान या गीताद्वारे एकात्मतेचा संदेश देणारे सुब्बाराव अर्थात भाईजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.

धर्मराज हल्लाळे

थोर समाजसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव. वय वर्षे ९०. देशाच्या कानाकोपऱ्यात तरूण, विशेषत: लहान मुलांमध्ये जाऊन राष्ट्रीय एकात्मता आणि एकात्मतेचे बीजारोपण करणारे एक शक्ती देणारे रसायन. देशातील १८ भाषांमध्ये भारत की संतान या गीताद्वारे एकात्मतेचा संदेश देणारे सुब्बाराव अर्थात भाईजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. निमित्त आहे ते लातूर येथील गोल्ड क्रेस्ट हाय मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे. या सोहळ्यात सुमारे २० राज्यातील मुले सहभागी होणार आहेत. मुलांसाठी हा आनंद सोहळा आहे. खूप काही शिकायला मिळेल. चार भिंतींच्या बाहेरील संस्कारक्षम शिक्षण मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. तिथे शिकवायला शिक्षक असणार नाहीत. मुलेच स्वत:हून शिकतील. २२ दालने आहेत. नानाविध उपक्रम होतील. या सर्व आनंदयात्रेबरोबरच मुलांवर सद्भावनेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मूक संस्कारही होणार आहे.

डॉ. एस.एन. सुब्बाराव हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. महाविद्यालयाबाहेर असणाºया तरूणांना राष्ट्रीय युवा योजनेचे व्यासपीठ त्यांनी देशपातळीवर उपलब्ध करून दिले आहे. दुर्गम, दुर्लक्षित भागात त्यांची शिबीरे होतात. तिथे श्रमसंस्कार मिळतात. श्रमदानातून नवनिर्माण उभे केले जाते. भारत जोडोचा नारा तरूणांच्या मनावर ठसा उमटवितो अन् ते आयुष्यभर त्या संस्कारात वाढतात. देशाच्या जडणघडणीत योगदान देतात. बाल महोत्सवातही राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना शांती यात्रा निघते. ज्याचा समारोप भारत की संतान या आगळ्या वेगळ्या सोहळ्याने होतो. महाराष्ट्रात तोही मराठवाड्यात लातूर येथे हा महोत्सव १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. आज प्रांत वाद, भाषा वाद, धर्म व जातीयवादाने मने दुभंगतील अशी स्थिती आहे. प्रत्येकाचा नारा वेगळा आहे. खांद्यावरील झेंडे वेगळे आहेत. समाज, धर्म आणि जातीच्या बेड्यांनी देश दुभंगून जाईल की काय असा सूर विचारवंत मांडत असतात. अशावेळी डॉ़ एस.एन. सुब्बाराव यांच्यासारखे कृतीवंत माणसे देश जोडायला खंबीरपणे उभे आहेत. नानाविध १८ भाषांमधील भारत की संतान हा गीताद्वारे सादर केलेला कार्यक्रम विविधतेत एकतेचा नारा देतो. 

विविध प्रांत आहेत. नानाविध भाषा आहेत. राज्या राज्याची संस्कृती वेगळी आहे. वेशभूषा विभिन्न आहे. मात्र आपण सर्वजण भारतीय आहोत याची जाण बालमनावर कोरणारा हा महोत्सव आहे. प्रांतवादावरून होणारी भांडणे, जाती-धर्मावरून होणाऱ्या दंगली, बालमनावर कोणते परिणाम करतात ? आज मुले आपल्या आई-वडिलांना आपण कोणत्या जातीचे आहोत हे विचारू लागले आहेत. हे असे का घडले आणि तसे का घडले हा बालमनाला पडलेला प्रश्न भेदाभेद निर्माण करणारा आहे. अशावेळी सद्भावना आणि शांतीयात्रेची नितांत गरज आहे. किंबहुना विकासाच्या बाता करणारे सरकार मग ते कोणतेही असो, सर्वात पहिल्यांदा या देशाची एकात्मता, सहिष्णुता आणि सद्भावना टिकवणे हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. सुरक्षितता नसेल आणि ज्यामुळे एकात्मता, शांतता भंग होत असेल तिथे विकासही नांदू शकत नाही. अर्थात प्रगतीच्या दारातील सर्वात पहिले पाऊल हे शांततेचे आहे. ती नांदत असेल तरच घरात, गावात, राज्यात अन् देशात विकासाची फळे येतील. अन्यथा कोणाच्या तरी वेशभूषेवरून, आहार पद्धतीवरून दंगे भडकायला वेळ लागणार नाही. हे थांबवायचे असेल वा घडूच द्यायचे नसेल तर राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवासारखे आयोजन हा सर्वोत्तम उपाय आहे. परंतू, सरकार अशा सोहळ्यांना मदत करताना दिसत नाही. या महोत्सवासाठी देशभरातून येणाऱ्या मुलांसाठी कुठल्याही सवलती द्याव्यात सरकारला वाटत नाही. खरे तर समाज दुभंगल्यानंतर त्यात एकता निर्माण करण्यासाठी जे परिश्रम आणि जो पैसा खर्च करावा लागणार आहे. त्या तुलनेत अशा महोत्सवासाठी लागणारी तरतूद सरकारच्या दृष्टीने नगण्य आहे. परंतू, डॉ. सुब्बारावजी यांना देशातील कानाकोपऱ्यात होणारे असे महोत्सव आणि शिबीरे हे स्थानिक संस्थांच्या मदतीने घ्यावे लागतात. महाराष्ट्रात लातूर येथे होणाऱ्या महोत्सवासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशनने सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे जवळपास १ हजार मुले आणि शेकडो शिक्षकांचा सहभाग असलेला हा महोत्सव देशातील बाल पाहुण्यांमुळे लक्षवेधी ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रsocial workerसमाजसेवक