शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

साईशताब्दी शिर्डीपुरती मर्यादित नको

By सुधीर लंके | Published: October 12, 2017 12:50 AM

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो.

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. शिर्डीच्या महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात मुंबईत बैठक घेऊन तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या बैठकीला केवळ नगर जिल्ह्यातील तेही शिर्डीच्या आसपासच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जो आराखडा ठरला त्याचीही अंमलबजावणी सुरू नाही.वास्तविकत: शिर्डीत देशभर व जगभरातून भाविक येतात. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा, नाशिक, औरंगाबाद ही शहरे जोडता येणे शक्य होते. शिर्डीला येणारे बहुतांश भाविक हे औरंगाबाद, नाशिकवरूनच शिर्डीत येतात. मुंबईहून साईभक्तांच्या ज्या पदयात्रा येतात त्या नाशिकमधूनच पुढे मार्गस्थ होतात. हैद्राबादचे भाविकही औरंगाबादमार्गे येतात. त्यामुळे साईशताब्दीचा विचार करताना याही शहरांना सोबत व विचारात घेऊन पर्यटन विकासाचे पदर रुंदावता येणे शक्य आहे. तो विचार प्रशासकीय पातळीवर अजूनतरी झालेला दिसत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्याचे नियोजन करताना नाशिकसोबतच आसपासची तीर्थस्थळे व पर्यटन केंद्रांचा विचार होतो. शिर्डी विकसित करतानाही हा दृष्टिकोन समोर ठेवायला हवा. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, नगर शहराबाबत साईशताब्दीच्या आराखड्यात काहीच उल्लेख नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत आग्रही दिसत नाहीत. उत्तर महाराष्टÑात नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार हे जिल्हे आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उत्तर महाराष्टÑ पातळीवर एकत्रित बैठक घेता येणे शक्य आहे. परंतु हे जिल्हे केवळ कागदावर प्रशासकीयदृष्ट्या एकत्र आहेत. विकासासाठी जो आंतरिक संवाद व्हायला हवा तोच नाही. शिर्डीतून विमानांची उड्डाणे सुरू झाली. शिर्डीच नव्हे उत्तर महाराष्टÑात प्रत्यक्षात कार्यरत झालेले हे पहिले विमानतळ आहे. कारण, नाशिक व जळगावला विमानतळ आहे. मात्र तेथून उड्डाणेच होत नाहीत. शिर्डीतून मुंबई, हैद्राबाद ही सेवा सुरू झाली आहे. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणेही होणार आहेत. या विमानतळाचा फायदा नाशिककरांनाही होऊ शकतो. शिर्डीत कार्गो हब झाले तर नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ती उपलब्धी ठरेल. पूर्वी खासदारकीच्या निमित्ताने नगर व नाशिक जिल्ह्यातील तालुके एकत्र होते. अजूनही उत्तर महाराष्टÑाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ एकच आहे. पण, मतदानाच्या पलीकडे हे आदानप्रदान जाणार आहे का? यावर या प्रदेशातील सुविधांचा फायदा एकमेकांना कसा होईल हे ठरेल. तूर्तास तरी संवाद म्हणावा तसा दिसत नाही. साईशताब्दीच्या निमित्ताने तसा प्रयत्न करता येऊ शकेल. सार्इंची पालखी शिर्डीपुरती नको. जयंत ससाणे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असताना नाशिक, नगर, औरंगाबाद हा पर्यटनाचा ‘त्रिकोण’ तयार करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यास मूर्त स्वरूप मिळाले नाही. मुंबईही अकोले, भंडारदरामार्गे शिर्डीशी जोडणे शक्य आहे.sudhir.lanke@lokmat.com