शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे सद्गुरू श्री वामनराव पै !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:58 IST

थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांनी समाजात  वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्त विशेष लेख..

आत्मसाक्षात्कारी संत असूनही श्री वामनराव पै हे आयुष्यभर सर्वसामान्यांप्रमाणे वावरले. मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांनी सरकारी नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांना समाजातले अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद, दैववाद, भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता पाहून वाईट वाटू लागलं. ‘बुडती हे जन न देखवे डोळा म्हणोनि कळवळा येत असे’ अशी अवस्था फक्त संतांच्याच ठायी होते. 

वामनराव पै यांनादेखील लोकांसाठी काही तरी शाश्वत असे कार्य करायचे होते. म्हणूनच अज्ञानाच्या आहारी गेलेल्या समाजामध्ये वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी जीवनविद्या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा विचार जनमानसात रुजवला. 

त्यांनी सांगितलेले विचार आचरणात आणल्याने आजवर अनेक विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेत स्वतःचा उत्कर्ष साधला आहे, अनेकांची व्यसने सुटली आहेत, अनेकांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या आहेत, घरात महिलांना आदराची आणि सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे, अनेकांचे मोडलेले संसार सावरले गेले आहेत. जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या सावलीत आलेल्या प्रत्येकाला आजवर जणू सुखी जीवन जगण्याचा राजमार्गच सापडला आहे. या सुखी आणि समाधानी झालेल्या लोकांनीच मग कृतज्ञतेने वामनराव पै यांना ‘सद्गुरू’ असं म्हणण्यास सुरुवात केली. ज्यामुळे पुढे वामनराव पै हे ‘सर्वसामान्य जनतेचे सर्वमान्य सद्गुरू’ म्हणून ओळखले जाऊ लागले.जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून त्यांनी जगभरात हजारो प्रवचने केली; मात्र त्यासाठी कोणाकडून कधीही बिदागी घेतली नाही. जीवनविद्या तत्त्वज्ञानावर आधारित २७ ग्रंथांचे लेखन केले, मात्र त्यासाठी कधीही रॉयल्टी घेतली नाही. लाखो लोकांना अनुग्रह दिला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही गुरुदक्षिणा स्वीकारली नाही. संसार आणि परमार्थाची सुरेख सांगड घालत असं निरपेक्ष कार्य अखंड करणारे सद्गुरू वामनराव पै हे या जगातील एकमेवाद्वितीय सद्गुरू होते म्हटलं तरी वावगं ठरू नये. 

श्रीसद्गुरुंनी एप्रिल २०१२मध्ये कर्जत येथे जीवनविद्या ज्ञानपीठाची निर्मिती केली. आज या ज्ञानपीठात विविध कोर्सेसच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन केले जाते. या  वास्तूला सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट स्ट्रक्चरचा बहुमानदेखील  मिळाला आहे. दि. २९ मे २०१२ रोजी श्रीसद्गुरुंचे महानिर्वाण झाले. श्रीसदगुरुंच्या महानिर्वाणानंतर त्यांच्याच मार्गदर्शनानुसार, संस्थेच्या विश्वस्तांच्या सहकार्याने व लाखो नामधारकांच्या आग्रहात्सव सद्गुरूंचे चिंरजीव, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनविद्या मिशनचं नेतृत्व स्वीकारलं. आज प्रल्हाद पै यांच्या नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशनच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार अधिक वेगाने होत आहे.श्री प्रल्हाद पै हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी मुंबईतील नामांकित शिक्षण संस्था आयआयटी पवईमधून बी.टेक केलेलं आहे, जमनालाल बजाज या शिक्षणसंस्थेतून मास्टर्स इन मॅनेजमेंट केलेलं आहे, जपानमधून “टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट”चं शिक्षण घेतलेलं आहे.  प्रल्हाद पै यांच्या नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशन, जीवनविद्या फाउंडेशन आणि जीवनविद्या सेंटर ऑफ अमेरिका या तीन संस्थाच्या माध्यमातून आज या कार्याचा प्रचार-प्रसार सुरू आहे. 

सद्गुरूंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घरोघरी विश्वप्रार्थना या उपक्रमाद्वारे ५००,००० कुटुंबापर्यंत हे तत्त्वज्ञान पोहोचविण्याचा संकल्प प्रल्हाद पैंच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने केला आहे. तसेच आपल्या प्रत्येक उपक्रमाद्वारे प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची हा संस्कारही लोकांच्या मनावर बिंबवत जनमानसामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे. या दोन व्यापक संकल्पाद्वारे वैचारिक क्रांती घडवत, विश्वशांतीचे वैश्विक ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीत आपल्या श्रीसद्गुरूंना खऱ्या अर्थाने ‘गुरुदक्षिणा’ यंदा जीवनविद्येची शिष्यमंडळी देणार आहेत.    

टॅग्स :Wamanrao Paiवामनराव पै