शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
3
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
5
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
6
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
7
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
8
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
9
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
10
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
11
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
12
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
13
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
14
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
15
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
16
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
17
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
18
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
19
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
20
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात

सामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वांना नियम सारखेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 06:49 IST

विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासाठी कोणत्याही विशेष विमानाची वा रेल्वेची सोय केली गेली नाही.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, हे स्थलांतरित मजुरांना न जाऊ देण्याचे कारण होते. राज्यघटनेची पूर्तता करणे हा मुख्य न्यायाधीशांच्या प्रवासामागचा हेतू आहे; पण याहूनही विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासाठी कोणत्याही विशेष विमानाची वा रेल्वेची सोय केली गेली नाही.संपूर्ण जगात थैैमान घालणारा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करतानाही लहान -मोठा असा कोणताही भेदभाव न केला जाणे कौतुकास्पद आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वांना या नियमांचे सारखेच पालन करावे लागत आहे व त्रासही सारखाच सोसावा लागत आहे. मुंबई, मेघालय व ओडिशा या तीन उच्च न्यायालयांवर नेमलेल्या मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ घेण्यासाठी हजारो कि.मी.चा खडतर प्रवास रस्त्यांमार्गे करावा लागणे हे याचेच ताजे उदाहरण आहे. न्या. दीपांकर दत्ता कोलकाताहून २,१५९ कि.मी. मोटार चालवत मुंबईला आले. त्याचप्रमाणे न्या. विश्वनाथ सोमद्देर यांनाही अलाहाबाद ते शिलाँग हा १,३४० कि.मी.चा प्रवास रस्त्यानेच करावा लागला. योगायोग असा की, न्या. दत्ता व न्या. सोमद्देर हे दोघेही मूळचे कोलकाता उच्च न्यायालयातील आहेत व दोघांचीही २२ जून २००६ या एकाच दिवशी तेथे नेमणूक झाली होती. दोघांनाही मुख्य न्यायाधीश म्हणून बढतीही एकाच दिवशी मिळाली व ‘लॉकडाऊन’चा त्रासही सारखाच सोसावा लागला. तिसरे मुख्य न्यायाधीश न्या. मोहम्मद रफिक १,५३५ कि.मी.चा प्रवास मोटारीने करून शिलाँगहून भुवनेश्वरला गेले. यापैकी मेघालयचे मुख्य न्यायाधीशपद हे बहुधा कोणालाच नकोसे असलेले पद असावे असे वाटते. तेथील आधीचे मुख्य न्यायाधीश न्या. ए. के. मित्तल यांची गेल्यावर्षी मध्यप्रदेशला बदली झाल्यावर मूळच्या मुंबईच्या असलेल्या न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांना मद्रासहून त्यांच्या जागी नेमले गेले; परंतु मद्रासच्या तुलनेत मेघालय उच्च न्यायालय खूपच लहान असल्याने शिलाँगला न जाता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा दिला. मग मेघालयमध्ये न्या. रफिक यांना पाठविले गेले. पण त्यांनाही ते पद नकोसे झाल्याने त्यांना आता तेथून ओडिशाला पाठवून त्यांच्याजागी न्या. सोमद्देर यांना पाठविले गेले. मिळालेले पद आवडो वा ना आवडो राष्ट्रपतींनी एकदा नियुक्तीचा आदेश काढल्यावर या तिघांनाही नव्या पदांवर रूजू होणे भाग होते. मुख्य न्यायाधीश असल्याने वाटेत तिघांचीही सरकारी डाक बंगल्यांवर निवास आणि आरामाची सोय केली गेली असणार हे जरी गृहित धरले तरी वाटेत कुठेही काही मिळण्याची सोय नसताना मोटारीत अवघडलेल्या अवस्थेत बसून ४०-४५ तास प्रवास करणे हे नक्कीच त्रासदायक आहे.

खासकरून न्या. दत्ता यांचे विशेष कौतुक वाटते. इतर दोघांप्रमाणे सोबत सरकारी चालक न घेता त्यांनी व त्यांच्या मुलाने आलटून-पालटून मोटार चालवत हा प्रवास पूर्ण केला. ‘लॉकडाऊन’ नसते तर हे तिघेही मुख्य न्यायाधीश विमानाने भुर्रकन काही तासांत इच्छितस्थळी पोहोचले असते व त्यांच्या या साहसी वाटाव्या अशा प्रवासाची चर्चाही झाली नसती. विमानाने न आल्याने त्यांना वाटेत पाच-सहा राज्यांमधील निसर्गाची निरनिराळी रूपे पाहता आली. देशातील विविधतेचा अनुभव घेता आला, ही यातील म्हटले तर जमेची बाजू आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हेही विमाने बंद झाल्याने गेल्या ९ मार्चपासून अमेरिकेत अडकून पडले आहेत. ते तेथून व्हिडिओ लिंकने आयोगाचे काम करत आहेत. ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यावर विविध राज्यांतून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे शेकडो कि.मी. चालत सहकुटुंब घराकडे निघाल्याचे चित्र पाहून देश हळहळला होता. ती हळहळ अवाजवी नक्कीच नव्हती; पण या मुख्य न्यायाधीशांच्या प्रवासाच्या बातम्या वाचल्यावर काही तिरकस मंडळींनी नाके मुरडली. त्यांचे म्हणणे असे की, जो तो आपापल्या ऐपतीनुसार प्रवास करतो. सरकारने स्थलांतरित मजुरांना जाऊ दिले नाही;
पण या मुख्य न्यायाधीशांच्या मोटार प्रवासाची सोय केली. मात्र, यातील फरक लक्षात घ्यायला हवा. कोरोनाचा प्रसार होऊ नये, हे स्थलांतरित मजुरांना न जाऊ देण्याचे कारण होते, तर राज्यघटनेची पूर्तता करणे हा मुख्य न्यायाधीशांच्या प्रवासामागचा हेतू आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या उच्चपदांकडे पाहून त्यांच्यासाठी विशेष विमानाची अथवा रेल्वेची सोय केली गेली नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस