शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

ग्रामीण भागात उन्हाळ्याऐवजी पाऊसकाळ जास्त जोखमीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 03:57 IST

अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे.

अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे. त्याप्रमाणे चौकशांचा फार्स सुरु झाला आहे. पण, त्यातून मुलांचे गेलेले प्राण परत येणार का? या घटनेच्या प्राथमिक चौकशीतच निकृष्ट बांधकामामुळे ही खोली पडली हे समोर आले आहे. या शाळेचे बांधकाम कोणी केले ती फाईल शोधण्याचे काम घटनेनंतर सुरू झाले. हे बांधकाम आरसीसी नव्हते. लोडबेअरिंग पद्धतीने ८८ हजार रुपयात १९९७-९८ साली ही खोली बांधली गेली. म्हणजे २० वर्षही बांधकाम टिकले नाही. आपल्या राज्यकारभात प्राधान्यक्रम कशाला आहे? हा प्रश्न यातून उपस्थित होतो. राष्टÑीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर होणे आवश्यक आहे हे कोठारी आयोग सांगतो. प्रत्यक्षात एवढे पैसे कधीच मिळत नाहीत. देशात हा खर्च तीन टक्केच्या पुढे गेलेला दिसत नाही. त्यामुळे पाया असा कच्चा राहतो. सर्व शिक्षा नावाचे अभियान केंद्र सरकारने सुरू केले. पण, गत दोन वर्षे या अभियानात शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधीच मिळाला नाही. अशा परिस्थितीत शाळांचे वर्ग भरवायचे कुठे? आलेल्या निधीतील सिमेंट, वाळू कुठे जाते, हा आणखी वेगळा भाग आहे. घटना घडल्या की मग समाज पेटून उठतो. पण, शासकीय इमारतींचे बांधकाम सुरू असताना किती ग्रामस्थ जागरुक असतात. केवळ शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवून गावांनाही आता जबाबदारी ढकलता येणार नाही. सरपंच, ग्रामसेवक काय करतात? याचीही चिकित्सा आवश्यक आहे. अखेरीस गावातील विकास कामांवर देखरेख करण्यात ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? याचे उत्तर जिल्हा प्रशासनानेही यानिमित्ताने द्यायला हवे. वेधशाळेने या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. अशावेळी दुर्गम व अडचणीच्या शाळांना सुटी देण्याचा निर्णय का होत नाही? उन्हाळ्यात दुपारची शाळा नको म्हणून शिक्षक संघटना जिल्हा परिषदेत येऊन भांडतात. निवेदने देतात. या शिक्षक संघटना पावसाळ्यात कोठे जातात? इंग्रजांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांची पद्धत सुरु केली. तीच परंपरा आम्ही पुढे रेटतो आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याऐवजी पाऊसकाळ जास्त जोखमीचा असतो. तो जीवघेणा असतो. मात्र, या काळात शाळांची वेळ बदलावी, त्यांना सुटी द्यावी, असा विचारच पुढे येताना दिसत नाही. निंबोडीची घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरु होता. पावसामुळे मुलांना घरी सोडता येत नव्हते. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत मुलांना बसविणे अपरिहार्य ठरले. या घटनेतून राज्याने काहीतरी बोध घ्यायला हवा.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा