शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

ग्रामीण भागात उन्हाळ्याऐवजी पाऊसकाळ जास्त जोखमीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 03:57 IST

अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे.

अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे. त्याप्रमाणे चौकशांचा फार्स सुरु झाला आहे. पण, त्यातून मुलांचे गेलेले प्राण परत येणार का? या घटनेच्या प्राथमिक चौकशीतच निकृष्ट बांधकामामुळे ही खोली पडली हे समोर आले आहे. या शाळेचे बांधकाम कोणी केले ती फाईल शोधण्याचे काम घटनेनंतर सुरू झाले. हे बांधकाम आरसीसी नव्हते. लोडबेअरिंग पद्धतीने ८८ हजार रुपयात १९९७-९८ साली ही खोली बांधली गेली. म्हणजे २० वर्षही बांधकाम टिकले नाही. आपल्या राज्यकारभात प्राधान्यक्रम कशाला आहे? हा प्रश्न यातून उपस्थित होतो. राष्टÑीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर होणे आवश्यक आहे हे कोठारी आयोग सांगतो. प्रत्यक्षात एवढे पैसे कधीच मिळत नाहीत. देशात हा खर्च तीन टक्केच्या पुढे गेलेला दिसत नाही. त्यामुळे पाया असा कच्चा राहतो. सर्व शिक्षा नावाचे अभियान केंद्र सरकारने सुरू केले. पण, गत दोन वर्षे या अभियानात शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधीच मिळाला नाही. अशा परिस्थितीत शाळांचे वर्ग भरवायचे कुठे? आलेल्या निधीतील सिमेंट, वाळू कुठे जाते, हा आणखी वेगळा भाग आहे. घटना घडल्या की मग समाज पेटून उठतो. पण, शासकीय इमारतींचे बांधकाम सुरू असताना किती ग्रामस्थ जागरुक असतात. केवळ शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवून गावांनाही आता जबाबदारी ढकलता येणार नाही. सरपंच, ग्रामसेवक काय करतात? याचीही चिकित्सा आवश्यक आहे. अखेरीस गावातील विकास कामांवर देखरेख करण्यात ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? याचे उत्तर जिल्हा प्रशासनानेही यानिमित्ताने द्यायला हवे. वेधशाळेने या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. अशावेळी दुर्गम व अडचणीच्या शाळांना सुटी देण्याचा निर्णय का होत नाही? उन्हाळ्यात दुपारची शाळा नको म्हणून शिक्षक संघटना जिल्हा परिषदेत येऊन भांडतात. निवेदने देतात. या शिक्षक संघटना पावसाळ्यात कोठे जातात? इंग्रजांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांची पद्धत सुरु केली. तीच परंपरा आम्ही पुढे रेटतो आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याऐवजी पाऊसकाळ जास्त जोखमीचा असतो. तो जीवघेणा असतो. मात्र, या काळात शाळांची वेळ बदलावी, त्यांना सुटी द्यावी, असा विचारच पुढे येताना दिसत नाही. निंबोडीची घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरु होता. पावसामुळे मुलांना घरी सोडता येत नव्हते. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत मुलांना बसविणे अपरिहार्य ठरले. या घटनेतून राज्याने काहीतरी बोध घ्यायला हवा.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा