शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निकालाचा फुगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 05:39 IST

दहावीचा यंदाचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा १८.२० टक्क्यांनी वाढला म्हणून फार हुरळण्याचे कारण नाही. कोणतेही यश अंतिम नसते, किंबहुना यशाचा प्रत्येक टप्पा जबाबदारी वाढविणारा असतो, हे भान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बाळगले की झाले.

अलीकडच्या अनेक वर्षांमधले धमाकेदार यश असे यंदाच्या दहावीच्या निकालाचे वर्णन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या परीक्षेत तब्बल ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागात तर ९८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातल्या पावणे सोळा लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यापैकी पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांचे अभिनंदन. ज्यांना दहावीची पायरी ओलांडता आली नाही त्यांनी नाउमेद होवू नये. पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने कुठलेही आकाश कोसळलेले नाही हे प्रथम लक्षात घ्यावे आणि ‘पुढच्या वेळी यश आपलेच’ हा विश्वास बाळगून पुन्हा उमेदीने तयारीला लागावे.

आता चर्चा सुरू आहे ती निकाल एवढा उच्चांकी कसा लागला यावरून. खरेतर कोरोनाच्या संकटकाळात चांगली वार्ता आल्याचे समाधान वाटायला हवे होते; पण या यशातही काही खोट असणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात उद्भलेल्या कोरोनाच्या साथीमुळे भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला असे म्हटले जाते. लेखी परीक्षेचे ८० आणि तोंडी परीक्षेचे २० गुण अशा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल फुगला. गेल्यावर्षी हा ८०-२० चा पॅटर्न नव्हता. यंदा तो पुन्हा चालू करण्यात आला. त्यामुळे भारंभार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या दोन्हींत तथ्य जरूर असेल. पण त्यानंतरही यशाचे मोल कमी होत नाही. कारण मुळातच दहावी परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला अंतिम टप्पा नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. म्हणूनच दहावी परीक्षेतल्या यशाने फार हुरळून जाण्याची गरज नाही, तसे अपयशाने खचण्याचीही आवश्यकता नाही. पुढच्या टप्प्यावर कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, कोणत्या शिक्षणाची निवड करावी हा कल समजण्यासाठी मात्र या परीक्षेचा मोठा उपयोग होतो. त्यादृष्टीने या निकालाकडे पाहिले पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाने ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनोत्तर’ अशी जगाची उभी विभागणी अवघ्या चार-सहा महिन्यांत करून ठेवली आहे. त्यामुळे तथाकथित ‘फुगलेल्या’ यशाचे पेढे फारवेळ चघळत न बसता कोरोनानंतरच्या जगात या गुणांचा उपयोग कसा होऊ शकेल, याचा विचार व्हायला हवा. नोकरी मिळविण्यासाठी, स्वत:चा व्यवसाय-उद्योग चालू करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी, स्वत:ला सुसंस्कृत माणूस म्हणून घडविण्यासाठी शाळा-विद्यापीठांमधले शिक्षण असते.

दहावीच्या गुणांचा फुलोरा यातल्या कोणत्या कारणासाठी कसा कामी लावायचा, यावर आता विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षण क्षेत्राने लक्ष केंद्रित केले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, संशोधन, कला, भाषा या पारंपरिक शिक्षणाची गरज तर सदैव असणारच आहे. त्याच जोडीने कोरोनापश्चात जगात कौशल्याधारित शिक्षणाचेही महत्त्व वाढणार आहे. गेल्या दशकात ‘खेडे’ बनलेले जग चार महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’ने ‘आॅनलाईन’वर आणले. या बदलाला सामोरे जाणारे नवे शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने आजच जाहीर केले आहे. ते धोरण कसे आहे, याची चर्चा पुढील काळात होईल. मात्र, त्यामध्ये नव्या युगाशी सुसंगत संधींचा विचार केलेला असेल, अशी आशा आहे. त्या संधी साधण्यासाठी दहावीनंतर काय, याचे उत्तर नव्या शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत शोधावे लागेल. राज्य सरकारने या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. कारण आजच्या इंटरनेट युगातही खासकरून ग्रामीण भागातले विद्यार्थी तितके ‘अपडेट’ नसतात. त्यामुळे शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वाट चुकण्याचा धोका असतो. केवळ परीक्षेतल्या गुणांवर विसंबून पुढे जात राहिले तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात निराशा येण्याची भीती असते. त्याऐवजी आवड, कल आणि क्षमता यांची जाणीव वेळीच झाली, तर भविष्यात काय करायचे याचा निर्णय घेणे सोपे जाते. दहावीच्या गुणांचा उपयोग त्यासाठी व्हावा.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल