शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

निकालाचा फुगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 05:39 IST

दहावीचा यंदाचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा १८.२० टक्क्यांनी वाढला म्हणून फार हुरळण्याचे कारण नाही. कोणतेही यश अंतिम नसते, किंबहुना यशाचा प्रत्येक टप्पा जबाबदारी वाढविणारा असतो, हे भान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बाळगले की झाले.

अलीकडच्या अनेक वर्षांमधले धमाकेदार यश असे यंदाच्या दहावीच्या निकालाचे वर्णन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या परीक्षेत तब्बल ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागात तर ९८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातल्या पावणे सोळा लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यापैकी पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांचे अभिनंदन. ज्यांना दहावीची पायरी ओलांडता आली नाही त्यांनी नाउमेद होवू नये. पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने कुठलेही आकाश कोसळलेले नाही हे प्रथम लक्षात घ्यावे आणि ‘पुढच्या वेळी यश आपलेच’ हा विश्वास बाळगून पुन्हा उमेदीने तयारीला लागावे.

आता चर्चा सुरू आहे ती निकाल एवढा उच्चांकी कसा लागला यावरून. खरेतर कोरोनाच्या संकटकाळात चांगली वार्ता आल्याचे समाधान वाटायला हवे होते; पण या यशातही काही खोट असणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात उद्भलेल्या कोरोनाच्या साथीमुळे भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला असे म्हटले जाते. लेखी परीक्षेचे ८० आणि तोंडी परीक्षेचे २० गुण अशा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल फुगला. गेल्यावर्षी हा ८०-२० चा पॅटर्न नव्हता. यंदा तो पुन्हा चालू करण्यात आला. त्यामुळे भारंभार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या दोन्हींत तथ्य जरूर असेल. पण त्यानंतरही यशाचे मोल कमी होत नाही. कारण मुळातच दहावी परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला अंतिम टप्पा नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. म्हणूनच दहावी परीक्षेतल्या यशाने फार हुरळून जाण्याची गरज नाही, तसे अपयशाने खचण्याचीही आवश्यकता नाही. पुढच्या टप्प्यावर कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, कोणत्या शिक्षणाची निवड करावी हा कल समजण्यासाठी मात्र या परीक्षेचा मोठा उपयोग होतो. त्यादृष्टीने या निकालाकडे पाहिले पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाने ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनोत्तर’ अशी जगाची उभी विभागणी अवघ्या चार-सहा महिन्यांत करून ठेवली आहे. त्यामुळे तथाकथित ‘फुगलेल्या’ यशाचे पेढे फारवेळ चघळत न बसता कोरोनानंतरच्या जगात या गुणांचा उपयोग कसा होऊ शकेल, याचा विचार व्हायला हवा. नोकरी मिळविण्यासाठी, स्वत:चा व्यवसाय-उद्योग चालू करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी, स्वत:ला सुसंस्कृत माणूस म्हणून घडविण्यासाठी शाळा-विद्यापीठांमधले शिक्षण असते.

दहावीच्या गुणांचा फुलोरा यातल्या कोणत्या कारणासाठी कसा कामी लावायचा, यावर आता विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षण क्षेत्राने लक्ष केंद्रित केले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, संशोधन, कला, भाषा या पारंपरिक शिक्षणाची गरज तर सदैव असणारच आहे. त्याच जोडीने कोरोनापश्चात जगात कौशल्याधारित शिक्षणाचेही महत्त्व वाढणार आहे. गेल्या दशकात ‘खेडे’ बनलेले जग चार महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’ने ‘आॅनलाईन’वर आणले. या बदलाला सामोरे जाणारे नवे शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने आजच जाहीर केले आहे. ते धोरण कसे आहे, याची चर्चा पुढील काळात होईल. मात्र, त्यामध्ये नव्या युगाशी सुसंगत संधींचा विचार केलेला असेल, अशी आशा आहे. त्या संधी साधण्यासाठी दहावीनंतर काय, याचे उत्तर नव्या शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत शोधावे लागेल. राज्य सरकारने या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. कारण आजच्या इंटरनेट युगातही खासकरून ग्रामीण भागातले विद्यार्थी तितके ‘अपडेट’ नसतात. त्यामुळे शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वाट चुकण्याचा धोका असतो. केवळ परीक्षेतल्या गुणांवर विसंबून पुढे जात राहिले तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात निराशा येण्याची भीती असते. त्याऐवजी आवड, कल आणि क्षमता यांची जाणीव वेळीच झाली, तर भविष्यात काय करायचे याचा निर्णय घेणे सोपे जाते. दहावीच्या गुणांचा उपयोग त्यासाठी व्हावा.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल