शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

निकालाचा फुगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 05:39 IST

दहावीचा यंदाचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा १८.२० टक्क्यांनी वाढला म्हणून फार हुरळण्याचे कारण नाही. कोणतेही यश अंतिम नसते, किंबहुना यशाचा प्रत्येक टप्पा जबाबदारी वाढविणारा असतो, हे भान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बाळगले की झाले.

अलीकडच्या अनेक वर्षांमधले धमाकेदार यश असे यंदाच्या दहावीच्या निकालाचे वर्णन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या परीक्षेत तब्बल ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागात तर ९८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातल्या पावणे सोळा लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यापैकी पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांचे अभिनंदन. ज्यांना दहावीची पायरी ओलांडता आली नाही त्यांनी नाउमेद होवू नये. पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने कुठलेही आकाश कोसळलेले नाही हे प्रथम लक्षात घ्यावे आणि ‘पुढच्या वेळी यश आपलेच’ हा विश्वास बाळगून पुन्हा उमेदीने तयारीला लागावे.

आता चर्चा सुरू आहे ती निकाल एवढा उच्चांकी कसा लागला यावरून. खरेतर कोरोनाच्या संकटकाळात चांगली वार्ता आल्याचे समाधान वाटायला हवे होते; पण या यशातही काही खोट असणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात उद्भलेल्या कोरोनाच्या साथीमुळे भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला असे म्हटले जाते. लेखी परीक्षेचे ८० आणि तोंडी परीक्षेचे २० गुण अशा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल फुगला. गेल्यावर्षी हा ८०-२० चा पॅटर्न नव्हता. यंदा तो पुन्हा चालू करण्यात आला. त्यामुळे भारंभार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या दोन्हींत तथ्य जरूर असेल. पण त्यानंतरही यशाचे मोल कमी होत नाही. कारण मुळातच दहावी परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला अंतिम टप्पा नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. म्हणूनच दहावी परीक्षेतल्या यशाने फार हुरळून जाण्याची गरज नाही, तसे अपयशाने खचण्याचीही आवश्यकता नाही. पुढच्या टप्प्यावर कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, कोणत्या शिक्षणाची निवड करावी हा कल समजण्यासाठी मात्र या परीक्षेचा मोठा उपयोग होतो. त्यादृष्टीने या निकालाकडे पाहिले पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाने ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनोत्तर’ अशी जगाची उभी विभागणी अवघ्या चार-सहा महिन्यांत करून ठेवली आहे. त्यामुळे तथाकथित ‘फुगलेल्या’ यशाचे पेढे फारवेळ चघळत न बसता कोरोनानंतरच्या जगात या गुणांचा उपयोग कसा होऊ शकेल, याचा विचार व्हायला हवा. नोकरी मिळविण्यासाठी, स्वत:चा व्यवसाय-उद्योग चालू करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी, स्वत:ला सुसंस्कृत माणूस म्हणून घडविण्यासाठी शाळा-विद्यापीठांमधले शिक्षण असते.

दहावीच्या गुणांचा फुलोरा यातल्या कोणत्या कारणासाठी कसा कामी लावायचा, यावर आता विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षण क्षेत्राने लक्ष केंद्रित केले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, संशोधन, कला, भाषा या पारंपरिक शिक्षणाची गरज तर सदैव असणारच आहे. त्याच जोडीने कोरोनापश्चात जगात कौशल्याधारित शिक्षणाचेही महत्त्व वाढणार आहे. गेल्या दशकात ‘खेडे’ बनलेले जग चार महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’ने ‘आॅनलाईन’वर आणले. या बदलाला सामोरे जाणारे नवे शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने आजच जाहीर केले आहे. ते धोरण कसे आहे, याची चर्चा पुढील काळात होईल. मात्र, त्यामध्ये नव्या युगाशी सुसंगत संधींचा विचार केलेला असेल, अशी आशा आहे. त्या संधी साधण्यासाठी दहावीनंतर काय, याचे उत्तर नव्या शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत शोधावे लागेल. राज्य सरकारने या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. कारण आजच्या इंटरनेट युगातही खासकरून ग्रामीण भागातले विद्यार्थी तितके ‘अपडेट’ नसतात. त्यामुळे शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वाट चुकण्याचा धोका असतो. केवळ परीक्षेतल्या गुणांवर विसंबून पुढे जात राहिले तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात निराशा येण्याची भीती असते. त्याऐवजी आवड, कल आणि क्षमता यांची जाणीव वेळीच झाली, तर भविष्यात काय करायचे याचा निर्णय घेणे सोपे जाते. दहावीच्या गुणांचा उपयोग त्यासाठी व्हावा.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल