शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

तिरंग्याचा सन्मान राखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 00:27 IST

स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू होते. नागपुरातील तरुणाईचा समावेश असलेल्या एका संघटनेकडून मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सप्ताहात ‘तिरंगा सन्मान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू होते. नागपुरातील तरुणाईचा समावेश असलेल्या एका संघटनेकडून मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सप्ताहात ‘तिरंगा सन्मान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. चौकाचौकांमध्ये, रस्त्यांवर पडलेले, अनवधानाने फाटलेले किंवा चुरगळल्या गेलेले कागदी झेंडे गोळा करण्याचे काम या संघटनेकडून करण्यात येईल. वरकरणी हे वृत्त फार मोठे वाटत नसले तरी व्यापक पातळीवर याचे महत्त्व फार मोठे आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी एखाद्या संघटनेला समोर यावे लागते हे समाजातील कृतिहीनता व असंवेदनशील वाढली असल्याचेच द्योतक आहे. ज्या तिरंग्याला घडविण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक, सैन्याचे जवानांनी स्वत:च्या जीवाचे बलिदान केले, त्याचे मोलच उरले नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. स्वातंत्र्यदिनी जागोजागी तिरंग्याचा सार्वजनिकपणे अपमान होताना दिसतो. गाड्यांवर लावण्यासाठी, मोटारसायकल रॅलीवर मिरविण्यासाठी तिरंगे उत्साहाने घेतले जातात. मात्र अतिउत्साहात तिरंग्याचा अपमान होत असल्याची जाणदेखील राहत नाही. भरधाव वेगाने मोटारसायकल दामटत असताना तिरंगा कधी रस्त्यावर पडतो हे कळतदेखील नाही. रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला तरी त्याला उचलण्याची तसदी फारच कमी नागरिक घेतात. रस्त्यांवर पडलेल्या कागदी झेंड्यावरून चालताना किंवा वाहन चालविताना थोडीदेखील लाज वाटत नाही. मुळात आपण चुकतो आहे, अशी भावनादेखील अनेकांच्या मनात येत नाही. मागील काही वर्षांपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भरीस भर म्हणजे प्रशासनाकडूनदेखील यासंदर्भात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आपला देश राष्ट्रीय अस्मितेला जागविणाऱ्या महान देशभक्तांच्या संस्कारांनी घडलेला आहे. मात्र आज त्याच संस्कारांवर असंवेदनशीलतेची माती लोकांकडून टाकण्यात येत आहे. ही स्थिती केवळ नागपुरातच नव्हे तर देशातील प्रत्येक भागात दिसून येते. तिरंग्याला जर जिव्हा असती तरी त्याने त्याच्यासाठी झटलेल्या देशभक्तांच्या वेदना नक्की बोलून दाखविल्या असत्या. आपल्या देशाची संस्कृती, शौर्य, धैर्य व त्याग यांचे राष्ट्रध्वज तिरंगा प्रतीक आहे. तिरंग्याचा सन्मान राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाने स्वत: यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. पुढील पिढ्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी व सन्मानाची भावना जागविण्यासाठी आज यासाठी पाऊल उचलले गेलेच पाहिजे.

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या