शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

पुन्हा विकासाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:04 IST

राज्यात २५ ते २८ वर्षांपूर्वी कोकणातील एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राजकारण रंगले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती

- नारायण जाधवराज्यात २५ ते २८ वर्षांपूर्वी कोकणातील एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राजकारण रंगले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती, परंतु त्यांची संचालक असलेली रिबेका मार्क मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटल्यानंतर, समुद्रात बुडविलेल्या एन्रॉनचे काम रखडत सुरू झाले. त्याने अद्यापही पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेले नाही. असाच प्रकार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत घडला. शिवसेनेने कोकणच्या अस्मितेच्या नावाखाली त्यास विरोध केला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मतही ‘मातोश्री’ने विचारात घेतले नाही. आता कोकण प्रांतातील नाणार येथील तेल शुद्धिकरण प्रकल्पावरून सर्वच राजकीय पक्षांत सुंदोपसुंदी सुरू आहे.नाणार प्रकल्पामुळे कोकणचे पर्यावरण धोक्यात येईल, कोकणचे सौंदर्य नाहीसे होईल, कोकणी माणूस देशोधडीला लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना, काँगे्रस-राष्ट्रवादी, मनसे आणि नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पास विरोध केला आहे. राज्यात सत्ताधारी भाजपाच या प्रकल्पाच्या बाजूने असून, प्रकल्पामुळे कोकणचा कसा विकास होईल, हे सांगत आहे. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा किल्ला लढविताना दिसत आहेत.नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धिकरण प्रकल्पाच्या मुद्द्यावर सामान्यांच्या मनाचा ठाव घेतला, तर प्रकल्प पाहिजे, असे फार कुणी सांगत नाही. अगदी मुंबईतील कोकणी माणूसही अपवाद नाही. कोकण म्हटले म्हणजे निसर्ग, समुद्र, गडकोट, किल्ले. कोकणात पर्यटन उद्योगाची वाढ व्हावी, याकरिता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. केवळ त्याबाबतच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा होत आहेत. उलट, कोकणाच्या माथी प्रदूषणकारी प्रकल्प मारले जात आहेत. याच मानसिकतेतून नाणारला विरोध होत आहे. पर्यावरणवाद्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवला, तर त्यात तथ्य वाटते.एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्प आला, तेव्हा त्यालाही कोकणात विरोध झाला होता. अरबी समुद्रात प्रकल्प बुडविण्याच्या गर्जना पुढे जादूची कांडी फिरल्यासारख्या मावळून गेल्या. प्रकल्पाचे भूत कोकणाच्या मानगुटीवर बसले. हजारो कोटी रुपये त्यावरखर्च झाले. राज्य वीजमंडळयामुळे कायमचे विकलांग झाले.त्यानंतर, झाला तो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद. यात विरोधकरणाऱ्यांवर गोळीबार झाला. एका तरुणास गोळीबारात प्राणही गमावावे लागले.विरोधाचे मागचे राजकारणआता तसाच विरोध नाणारच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पाला होत आहे. हा आशियातील सर्वात मोठा तेल शुद्धिकरण प्रकल्प असणार आहे. त्यासाठी १५ हजार एकर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, १४ गावांना तो गिळंकृत करणार आहे. याशिवाय, प्रकल्पासाठी वापरल्या जाणाºया जमिनीवर १२ लाख ६४ हजार हापूसची, सहा लाख १३ हजारकाजू, नारळ, सुपारी यांची झाडेआहेत. ४५ हजार नागरिकांच्यासाडेआठ हजार कुटुंबांवर विस्थापनाचा बुलडोझर चालणार आहे, तसेचसाडेपाच हजार घरेगोठे नाहीसे होणार आहेत. यामुळे या प्रकल्पास विरोधहोऊ लागला आहे, तसेच कोकणचे पर्यावरणही यामुळे धोक्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प