शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुन्हा विकासाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:04 IST

राज्यात २५ ते २८ वर्षांपूर्वी कोकणातील एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राजकारण रंगले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती

- नारायण जाधवराज्यात २५ ते २८ वर्षांपूर्वी कोकणातील एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राजकारण रंगले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती, परंतु त्यांची संचालक असलेली रिबेका मार्क मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटल्यानंतर, समुद्रात बुडविलेल्या एन्रॉनचे काम रखडत सुरू झाले. त्याने अद्यापही पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेले नाही. असाच प्रकार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत घडला. शिवसेनेने कोकणच्या अस्मितेच्या नावाखाली त्यास विरोध केला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मतही ‘मातोश्री’ने विचारात घेतले नाही. आता कोकण प्रांतातील नाणार येथील तेल शुद्धिकरण प्रकल्पावरून सर्वच राजकीय पक्षांत सुंदोपसुंदी सुरू आहे.नाणार प्रकल्पामुळे कोकणचे पर्यावरण धोक्यात येईल, कोकणचे सौंदर्य नाहीसे होईल, कोकणी माणूस देशोधडीला लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना, काँगे्रस-राष्ट्रवादी, मनसे आणि नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पास विरोध केला आहे. राज्यात सत्ताधारी भाजपाच या प्रकल्पाच्या बाजूने असून, प्रकल्पामुळे कोकणचा कसा विकास होईल, हे सांगत आहे. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा किल्ला लढविताना दिसत आहेत.नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धिकरण प्रकल्पाच्या मुद्द्यावर सामान्यांच्या मनाचा ठाव घेतला, तर प्रकल्प पाहिजे, असे फार कुणी सांगत नाही. अगदी मुंबईतील कोकणी माणूसही अपवाद नाही. कोकण म्हटले म्हणजे निसर्ग, समुद्र, गडकोट, किल्ले. कोकणात पर्यटन उद्योगाची वाढ व्हावी, याकरिता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. केवळ त्याबाबतच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा होत आहेत. उलट, कोकणाच्या माथी प्रदूषणकारी प्रकल्प मारले जात आहेत. याच मानसिकतेतून नाणारला विरोध होत आहे. पर्यावरणवाद्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवला, तर त्यात तथ्य वाटते.एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्प आला, तेव्हा त्यालाही कोकणात विरोध झाला होता. अरबी समुद्रात प्रकल्प बुडविण्याच्या गर्जना पुढे जादूची कांडी फिरल्यासारख्या मावळून गेल्या. प्रकल्पाचे भूत कोकणाच्या मानगुटीवर बसले. हजारो कोटी रुपये त्यावरखर्च झाले. राज्य वीजमंडळयामुळे कायमचे विकलांग झाले.त्यानंतर, झाला तो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद. यात विरोधकरणाऱ्यांवर गोळीबार झाला. एका तरुणास गोळीबारात प्राणही गमावावे लागले.विरोधाचे मागचे राजकारणआता तसाच विरोध नाणारच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पाला होत आहे. हा आशियातील सर्वात मोठा तेल शुद्धिकरण प्रकल्प असणार आहे. त्यासाठी १५ हजार एकर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, १४ गावांना तो गिळंकृत करणार आहे. याशिवाय, प्रकल्पासाठी वापरल्या जाणाºया जमिनीवर १२ लाख ६४ हजार हापूसची, सहा लाख १३ हजारकाजू, नारळ, सुपारी यांची झाडेआहेत. ४५ हजार नागरिकांच्यासाडेआठ हजार कुटुंबांवर विस्थापनाचा बुलडोझर चालणार आहे, तसेचसाडेपाच हजार घरेगोठे नाहीसे होणार आहेत. यामुळे या प्रकल्पास विरोधहोऊ लागला आहे, तसेच कोकणचे पर्यावरणही यामुळे धोक्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प