शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राणेंना सेनेने तूर्त रोखले, पुढे काय?

By यदू जोशी | Updated: November 27, 2017 00:46 IST

भाजपासोबत येऊन अवघे काही दिवस नाही होत तोच नारायण राणे हे युतीतील तणावाचे कारण ठरले आहेत. त्यांना मंत्री करण्यावरून विस्ताराचेच घोडे अडल्यासारखे आहे. ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’, अशी युतीतील दोन पक्षांची अवस्था आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले की ते आता सरकारमधून बाहेर पडणारच असे वाटू लागते. पण भाषण संपता संपता ते ‘सरकारला साथही देऊ अन् लाथही देऊ’ असे सांगतात. मग शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याऐवजी शिवसैनिकच सभा संपवून बाहेर पडतात. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत’, असे शरद पवार म्हणतात ते काही खोटे नाही. विदेशीच्या मुद्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर व १९९९ च्या विधानसभा निकालानंतर राष्ट्रवादीचे पायही सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकले होतेच ना! ते त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये तणाव, कुरघोडीचे अनेक प्रसंग आले, पण फेव्हिकॉलचा जोड पक्का राहिला. उद्धव ठाकरेंना मानले पाहिजे.राणेंना आमदार होण्यापासून त्यांनी रोखले आणि मंत्री होण्यापासून रोखण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तारच त्यांनी रोखून धरल्याचे आजचे तरी चित्र आहे. भविष्यात राणेंना घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल. ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उपयोग करीत राणेंना मंत्री करताना त्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. अनेक वर्षे राणे शिवसेनेतच राहिलेले असल्याने त्यांची शक्ती आणि उपद्रवमूल्य या दोन्हींची शिवसेनेला चांगलीच जाणीव आहे. शिवाय, भाजपाचे बळ मिळाल्यास कोकणात राणे आपल्याला धक्के देऊ शकतात हेही मातोश्री ओळखून आहे. म्हणूनच राणे कोणत्याही परिस्थितीत नकोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. युतीच्या वादात आणि शिवसेनेने विषय प्रतिष्ठेचा केल्याने राणेंची मात्र तूर्त चांगलीच कुचंबणा होत आहे. गुजरातच्या निवडणूक निकालावर बरेच काही अवलंबून असेल. तेथे भाजपाला सत्ता मिळाली तर प्रसंगी शिवसेनेचा विरोध पत्करून राणेंना मंत्री करण्याची जोखीम भाजपा पत्करू शकेल. समजा गुजरातमध्ये भाजपाची सत्ता गेली तर शिवसेनेशी जुळवून घेण्याची भूमिका घेताना राणेंना बाजूला ठेवणे भाजपाला भाग पडेल, असे दिसते. युतीच्या भांडणाचा फायदा घेत सध्या शरद पवारांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राज्य पिंजून काढत आहेत. भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.संवेदनशीलता अशीहीनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे सादरीकरण एमएसआरडीसीने पत्रकारांसमोर केले. त्यावेळी या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी उपस्थित होते. प्रकल्प गतिमानतेने पूर्ण करण्यासाठी काय काय करणार, हे एमएसआरडीसीचे अधिकारी सांगत होते. एका पत्रकाराने प्रश्न केला, ‘प्रकल्प पारदर्शकरीत्या पूर्ण व्हावा म्हणून काय करणार? संवेदनशील गगराणी यांनी पारदर्शकतेसाठी काय काय करता येईल, यासंदर्भात लगेच दुसºया दिवशी त्या पत्रकाराकडून लेखी सूचना मागविल्या आणि त्यानंतर १५ दिवसांतच प्रकल्पाच्या पारदर्शकतेसाठी कुठल्या उपाययोजना करणार, ते त्या पत्रकाराला लेखी कळविले. गगराणींची संवेदनशीलता बघून पत्रकारही अवाक् झाला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र