शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:24 IST

फेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे.

- संतोष देसाईमाजी सीईओ फ्यूचर ब्रॅण्ड्सफेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विचारांचे ध्रुवीकरण झाले असल्याने प्रत्येकाला घडलेल्या घटनेचे स्वत:चे आकलन हेच योग्य असल्याचे वाटते!फेक न्यूजचा स्वीकार करण्याचे प्रमाणही जे वाढले आहे, त्याची अनेक कारणे आहेत. बातमीचे स्वरूप निश्चित असते, हा समजच चुकीचा ठरला आहे. लोक बातमीपेक्षा त्यामागे काय असावे, हे जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. त्यामुळे आहे तशी बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. त्यांच्यापुढे जे वास्तव सादर होते ते रचलेले आहे असे त्यांना वाटून, त्यांना काय वाटते ते त्या बातमीशी जोडतात. येणारी प्रत्येक बातमी मीडियाकडून वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्यात येते. ही मांडणी त्या त्या मीडियाचे संबंध आणि हिताला धरून केलेली असते. ही बातमी कोण पुरवतो आणि पूर्वी त्याविषयी कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नव्हते, ते आजच का उपस्थित केले जातात?मीडियाने प्रयत्नपूर्वक स्वत:भोवती अधिकाराची आभा निर्माण केलेली आहे. त्यासाठी अनेक साधनांचा वापर करण्यात आला आहे. काही वृत्तपत्रांच्या नावात किंवा त्यांच्या संपादकांच्या नावाभोवती आभा निर्माण होते. त्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या आणि भाषेच्या अचूक वापराबद्दल लोकांना विश्वास वाटतो. वास्तविक मीडिया हा कधीच वस्तुनिष्ठ असू शकत नसला तरी, त्या संस्थेभोवती जे वलय निर्माण होते तेच त्या संस्थेला ताकद आणि विश्वासार्हता देत असते. तिने पत्रकारितेच्या मूल्यांची निर्मितीही केलेली असते.पण डिजिटल मीडियाच्या आगमनानंतर बातम्यांविषयी अविश्वासाची भावना निर्माण झाली आणि वृत्तपत्रांभोवती असलेले वलय कोसळू लागले. बातमीच्या वस्तुनिष्ठतेविषयीची भावना पंक्चर झाल्यामुळे वस्तुस्थितीची भिन्न भिन्न रूपे पाहायला मिळू लागली. जगाकडे विशिष्ट नजरेने बघण्याची दृष्टी ‘तयार’ करण्यात आली. बातम्यांचे पावित्र्य नष्ट झाल्याने स्वत:ची भूमिका मांडणाऱ्या बातम्यांचा लोकांकडून अधिक स्वीकार होऊ लागला!खरी समस्या आणखी गंभीर आहे. मनुष्य या नात्याने सत्याला आपल्या लेखी काही किंमत उरली नाही. वस्तुस्थितीला तोंड देण्यापलीकडे आपल्याला अनेक गरजांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्वत:चे समाधान करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. तसेच नकोशा वाटणाºया गोष्टींविषयी आपण संताप व्यक्त करीत असतो. त्यामुळे आपण जे ऐकतो आहोत तेच खरे आहे याविषयी खात्री मिळावी, अशी आपली अपेक्षा असते. कधी कधी ते खरे नाही हे आपणास ठाऊक असते, तरीही आपण ते खरे असल्याची समजूत करून घेतो. आपण आपल्याच आयुष्याकडे बघितले तर कोणत्याही घटनेच्या दोन वर्णनात साम्य आढळणार नाही किंवा आपण आठवणीतून लिहिलेल्या दोन संवादांतही सारखेपणा नसतो. प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून त्या घटनेचे वर्णन करीत असतो. त्यात स्वत:ची भर घालून ते अधिक रोचक करीत असतो. प्रत्येक वेळी सत्यापासून दूर जाण्याचाच आपला प्रयत्न असतो. सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे दुरापास्तच असते!पत्रकाराचा स्पर्श न झालेली बातमी ही एखाद्या घटनेभोवती गुंडाळलेल्या झग्यासारखी असते. थोडी काव्यात्म, थोडी गद्यात्मक, अवास्तवात गुंडाळलेली ती असते. त्याचे बाह्य जगावर काय परिणाम होतील, याची कुणी काळजी करीत नाही. मग स्वत:ला आवडेल तशा स्वरूपात बातमी सादर होते. काश्मीरमध्ये काय सुरू आहे, हे समजल्याने आपल्या दैनंदिन जीवनात कोणता फरक पडतो? मग ज्यामुळे आपले समाधान होते तेच बातमीचे स्वरूप स्वीकारले जाते! घटनेचे यथातथ्य चित्रण म्हणजे बातमी, हे पत्रकारांचे संशोधन आहे. आजच्या काळात मनोरंजन आणि गुन्हेगारी यांना अधिक मागणी आहे. तपशिलापेक्षा सादरीकरण महत्त्वाचे झाले आहे.डिजिटलच्या आगमनापूर्वीच हा प्रवाह दिसू लागला होता. पण सोशल मीडिया हा लाखो लोकांच्या नेटवर्कशी जुळलेला आहे. त्यातून प्रत्येक जण आपली भूमिका मांडू लागला आहे. या नव्या विकेंद्रित जगात पत्रकारही वाहवत गेले आहेत. तपशील महत्त्वाचा आहे ही पत्रकारांनी वर्षानुवर्षे जपलेली वस्तुस्थिती, त्यांनी स्वत:च त्यागली असून त्यांनी आपल्या व्यवसायाशी तडजोड करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हताच संपुष्टात आली आहे. आता ते केवळ नट म्हणून शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच त्यांचे ध्येय उरले आहे. त्याचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे वस्तुनिष्ठ बातम्यांपासून ते दूर जाऊ लागले आहेत. बातम्यांतील तथ्य तपासण्यासाठी तपासनीस नेमावे लागत असतील तर पत्रकारिता ही संस्था कशासाठी निर्माण झाली होती?फेक न्यूजसंबंधी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, लोकांना तो प्रश्नच वाटत नाही! आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग सरकारही खोटी आकडेवारी तयार करू लागते, चॅनेल्स बनावट घटना तयार करतात, त्यामुळे वृत्त-तपासनीस हे अनावश्यक बोअर वाटू लागतात. ग्राहक या नात्याने वाचक आणि दर्शक खूश आहेत ना, एवढेच बघितले जाते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019