शहरं
Join us  
Trending Stories
1
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
2
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
3
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
4
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
5
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
6
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
7
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
8
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
9
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
10
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
11
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
12
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
13
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
14
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
15
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
16
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
17
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
18
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
19
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
20
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा

पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:24 IST

फेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे.

- संतोष देसाईमाजी सीईओ फ्यूचर ब्रॅण्ड्सफेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विचारांचे ध्रुवीकरण झाले असल्याने प्रत्येकाला घडलेल्या घटनेचे स्वत:चे आकलन हेच योग्य असल्याचे वाटते!फेक न्यूजचा स्वीकार करण्याचे प्रमाणही जे वाढले आहे, त्याची अनेक कारणे आहेत. बातमीचे स्वरूप निश्चित असते, हा समजच चुकीचा ठरला आहे. लोक बातमीपेक्षा त्यामागे काय असावे, हे जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. त्यामुळे आहे तशी बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. त्यांच्यापुढे जे वास्तव सादर होते ते रचलेले आहे असे त्यांना वाटून, त्यांना काय वाटते ते त्या बातमीशी जोडतात. येणारी प्रत्येक बातमी मीडियाकडून वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्यात येते. ही मांडणी त्या त्या मीडियाचे संबंध आणि हिताला धरून केलेली असते. ही बातमी कोण पुरवतो आणि पूर्वी त्याविषयी कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नव्हते, ते आजच का उपस्थित केले जातात?मीडियाने प्रयत्नपूर्वक स्वत:भोवती अधिकाराची आभा निर्माण केलेली आहे. त्यासाठी अनेक साधनांचा वापर करण्यात आला आहे. काही वृत्तपत्रांच्या नावात किंवा त्यांच्या संपादकांच्या नावाभोवती आभा निर्माण होते. त्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या आणि भाषेच्या अचूक वापराबद्दल लोकांना विश्वास वाटतो. वास्तविक मीडिया हा कधीच वस्तुनिष्ठ असू शकत नसला तरी, त्या संस्थेभोवती जे वलय निर्माण होते तेच त्या संस्थेला ताकद आणि विश्वासार्हता देत असते. तिने पत्रकारितेच्या मूल्यांची निर्मितीही केलेली असते.पण डिजिटल मीडियाच्या आगमनानंतर बातम्यांविषयी अविश्वासाची भावना निर्माण झाली आणि वृत्तपत्रांभोवती असलेले वलय कोसळू लागले. बातमीच्या वस्तुनिष्ठतेविषयीची भावना पंक्चर झाल्यामुळे वस्तुस्थितीची भिन्न भिन्न रूपे पाहायला मिळू लागली. जगाकडे विशिष्ट नजरेने बघण्याची दृष्टी ‘तयार’ करण्यात आली. बातम्यांचे पावित्र्य नष्ट झाल्याने स्वत:ची भूमिका मांडणाऱ्या बातम्यांचा लोकांकडून अधिक स्वीकार होऊ लागला!खरी समस्या आणखी गंभीर आहे. मनुष्य या नात्याने सत्याला आपल्या लेखी काही किंमत उरली नाही. वस्तुस्थितीला तोंड देण्यापलीकडे आपल्याला अनेक गरजांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्वत:चे समाधान करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. तसेच नकोशा वाटणाºया गोष्टींविषयी आपण संताप व्यक्त करीत असतो. त्यामुळे आपण जे ऐकतो आहोत तेच खरे आहे याविषयी खात्री मिळावी, अशी आपली अपेक्षा असते. कधी कधी ते खरे नाही हे आपणास ठाऊक असते, तरीही आपण ते खरे असल्याची समजूत करून घेतो. आपण आपल्याच आयुष्याकडे बघितले तर कोणत्याही घटनेच्या दोन वर्णनात साम्य आढळणार नाही किंवा आपण आठवणीतून लिहिलेल्या दोन संवादांतही सारखेपणा नसतो. प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून त्या घटनेचे वर्णन करीत असतो. त्यात स्वत:ची भर घालून ते अधिक रोचक करीत असतो. प्रत्येक वेळी सत्यापासून दूर जाण्याचाच आपला प्रयत्न असतो. सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे दुरापास्तच असते!पत्रकाराचा स्पर्श न झालेली बातमी ही एखाद्या घटनेभोवती गुंडाळलेल्या झग्यासारखी असते. थोडी काव्यात्म, थोडी गद्यात्मक, अवास्तवात गुंडाळलेली ती असते. त्याचे बाह्य जगावर काय परिणाम होतील, याची कुणी काळजी करीत नाही. मग स्वत:ला आवडेल तशा स्वरूपात बातमी सादर होते. काश्मीरमध्ये काय सुरू आहे, हे समजल्याने आपल्या दैनंदिन जीवनात कोणता फरक पडतो? मग ज्यामुळे आपले समाधान होते तेच बातमीचे स्वरूप स्वीकारले जाते! घटनेचे यथातथ्य चित्रण म्हणजे बातमी, हे पत्रकारांचे संशोधन आहे. आजच्या काळात मनोरंजन आणि गुन्हेगारी यांना अधिक मागणी आहे. तपशिलापेक्षा सादरीकरण महत्त्वाचे झाले आहे.डिजिटलच्या आगमनापूर्वीच हा प्रवाह दिसू लागला होता. पण सोशल मीडिया हा लाखो लोकांच्या नेटवर्कशी जुळलेला आहे. त्यातून प्रत्येक जण आपली भूमिका मांडू लागला आहे. या नव्या विकेंद्रित जगात पत्रकारही वाहवत गेले आहेत. तपशील महत्त्वाचा आहे ही पत्रकारांनी वर्षानुवर्षे जपलेली वस्तुस्थिती, त्यांनी स्वत:च त्यागली असून त्यांनी आपल्या व्यवसायाशी तडजोड करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हताच संपुष्टात आली आहे. आता ते केवळ नट म्हणून शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच त्यांचे ध्येय उरले आहे. त्याचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे वस्तुनिष्ठ बातम्यांपासून ते दूर जाऊ लागले आहेत. बातम्यांतील तथ्य तपासण्यासाठी तपासनीस नेमावे लागत असतील तर पत्रकारिता ही संस्था कशासाठी निर्माण झाली होती?फेक न्यूजसंबंधी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, लोकांना तो प्रश्नच वाटत नाही! आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग सरकारही खोटी आकडेवारी तयार करू लागते, चॅनेल्स बनावट घटना तयार करतात, त्यामुळे वृत्त-तपासनीस हे अनावश्यक बोअर वाटू लागतात. ग्राहक या नात्याने वाचक आणि दर्शक खूश आहेत ना, एवढेच बघितले जाते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019