शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शापातून मुक्ती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:04 IST

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांचा शाप लाभलेल्या विदर्भासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भागाला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्त करायचे असेल, तर सिंचनाच्या सोयी वाढविण्याशिवाय तरणोपाय नाही. दुर्दैवाने आतापर्यंत सिंचन सुविधा वाढविण्यासाठी घोषणाबाजी खूप झाली; पण प्रत्यक्षात नगण्य कामे झाली. परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष वाढताच राहिला. सुदैवाने सध्या केंद्र सरकारचे जल संधारण मंत्रालय आणि राज्याचे मुख्यमंत्री पद, विकासाची दूरदृष्टी, कल्पकता आणि धडाडी असलेल्या विदर्भाच्या दोन सुपुत्रांकडे आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि विदर्भाच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसल्या जाईल, अशी आशा करण्यास हरकत नाही; मात्र विदर्भातील सिंचन प्रकल्पांची आजवरची वाटचाल बघून, मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांच्या घोषणा झाल्या नाहीत, असे अजिबात नाही. अनेक लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांचे स्वप्न विदर्भाला वेळोवेळी दाखविण्यात आले. दुर्दैवाने गोसेखुर्द, जिगाव, निम्न पैनगंगासारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे, घोषणेस दोन-तीन दशके उलटूनही पूर्णत्वास गेली नाहीत. मोठे प्रकल्प तर सोडाच; पण अनेक लघु प्रकल्पही, विहित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या किमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत. त्यामधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चवीने चघळल्या जातात. गेल्याच आठवड्यात सिंचन घोटाळ्यांशी संबंधित आणखी चार प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाले. एकीकडे जुन्या सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी सुरू होत असताना, दुसरीकडे रखडलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याची कामे सुरू होत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न व्हायचे ते होत राहील; पण आता तरी कालमर्यादा निश्चित करून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि या भूमीला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्ती द्या, एवढीच फडणवीस-गडकरी जोडगोळीकडून अपेक्षा आहे!

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या