शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शापातून मुक्ती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:04 IST

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांचा शाप लाभलेल्या विदर्भासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भागाला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्त करायचे असेल, तर सिंचनाच्या सोयी वाढविण्याशिवाय तरणोपाय नाही. दुर्दैवाने आतापर्यंत सिंचन सुविधा वाढविण्यासाठी घोषणाबाजी खूप झाली; पण प्रत्यक्षात नगण्य कामे झाली. परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष वाढताच राहिला. सुदैवाने सध्या केंद्र सरकारचे जल संधारण मंत्रालय आणि राज्याचे मुख्यमंत्री पद, विकासाची दूरदृष्टी, कल्पकता आणि धडाडी असलेल्या विदर्भाच्या दोन सुपुत्रांकडे आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि विदर्भाच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसल्या जाईल, अशी आशा करण्यास हरकत नाही; मात्र विदर्भातील सिंचन प्रकल्पांची आजवरची वाटचाल बघून, मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांच्या घोषणा झाल्या नाहीत, असे अजिबात नाही. अनेक लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांचे स्वप्न विदर्भाला वेळोवेळी दाखविण्यात आले. दुर्दैवाने गोसेखुर्द, जिगाव, निम्न पैनगंगासारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे, घोषणेस दोन-तीन दशके उलटूनही पूर्णत्वास गेली नाहीत. मोठे प्रकल्प तर सोडाच; पण अनेक लघु प्रकल्पही, विहित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या किमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत. त्यामधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चवीने चघळल्या जातात. गेल्याच आठवड्यात सिंचन घोटाळ्यांशी संबंधित आणखी चार प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाले. एकीकडे जुन्या सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी सुरू होत असताना, दुसरीकडे रखडलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याची कामे सुरू होत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न व्हायचे ते होत राहील; पण आता तरी कालमर्यादा निश्चित करून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि या भूमीला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्ती द्या, एवढीच फडणवीस-गडकरी जोडगोळीकडून अपेक्षा आहे!

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या