शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

शापातून मुक्ती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:04 IST

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांचा शाप लाभलेल्या विदर्भासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भागाला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्त करायचे असेल, तर सिंचनाच्या सोयी वाढविण्याशिवाय तरणोपाय नाही. दुर्दैवाने आतापर्यंत सिंचन सुविधा वाढविण्यासाठी घोषणाबाजी खूप झाली; पण प्रत्यक्षात नगण्य कामे झाली. परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष वाढताच राहिला. सुदैवाने सध्या केंद्र सरकारचे जल संधारण मंत्रालय आणि राज्याचे मुख्यमंत्री पद, विकासाची दूरदृष्टी, कल्पकता आणि धडाडी असलेल्या विदर्भाच्या दोन सुपुत्रांकडे आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि विदर्भाच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसल्या जाईल, अशी आशा करण्यास हरकत नाही; मात्र विदर्भातील सिंचन प्रकल्पांची आजवरची वाटचाल बघून, मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांच्या घोषणा झाल्या नाहीत, असे अजिबात नाही. अनेक लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांचे स्वप्न विदर्भाला वेळोवेळी दाखविण्यात आले. दुर्दैवाने गोसेखुर्द, जिगाव, निम्न पैनगंगासारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे, घोषणेस दोन-तीन दशके उलटूनही पूर्णत्वास गेली नाहीत. मोठे प्रकल्प तर सोडाच; पण अनेक लघु प्रकल्पही, विहित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या किमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत. त्यामधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चवीने चघळल्या जातात. गेल्याच आठवड्यात सिंचन घोटाळ्यांशी संबंधित आणखी चार प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाले. एकीकडे जुन्या सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी सुरू होत असताना, दुसरीकडे रखडलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याची कामे सुरू होत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न व्हायचे ते होत राहील; पण आता तरी कालमर्यादा निश्चित करून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि या भूमीला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्ती द्या, एवढीच फडणवीस-गडकरी जोडगोळीकडून अपेक्षा आहे!

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या